वेध माझा ऑनलाइन।
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात मोठी राजकीय कुस्ती पाहायला मिळत आहे. समरजितराजे घाटगे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेत अजित पवार गटात असलेल्या विद्यमान आमदार हसन मुश्रीफ याना आव्हान दिले. यानंतर आज हसन मुश्रीफ यांनी हे आव्हान स्वीकारत शरद पवारांशी वैर नाही, समरजित तुझी खैर नाही अशी गर्जना केली आहे. त्यामुळे कागलमध्ये यंदाच्या विधानसभेला काटे कि टक्कर पाहायला मिळेल.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, पवार साहेब माझे दैवत आहे. मी अजूनही त्यांचा आदर करतो. मग तरीही शरद पवार आणि जयंत पाटील हे माझ्यासारख्या अल्पसंख्याकांच्या मागे का लागले आहेत? हे मला माहित नाही. शरद पवार साहेबांनी कायम प्रजेचा आणि रयतेमधून आलेल्या सामान्य कार्यकर्त्यांचा प्रचार केलेला आहे. राजा विरोधात प्रजा अशी निवडणूक आहे आणि प्रजा कायमच जिंकत असते. जयंत पाटील दोन दिवसांपूर्वी आले, त्यांनी सभा घेतली. काल पवार साहेबांनी सभा घेतली, मला समजत नाही की ते माझ्यासारख्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांच्या मागे का लागले आहेत? पण तरीही मी एवढच म्हणेन कि शरद पवार साहेब, तुमच्याशी माझं वैर नाही, परंतु समरजित तुझी खैर नाही…
संकट काळात आमची साथ सोडुन गेले ; पवारांचा मुश्रिफ यांच्यावर हल्लाबोल ;
दरम्यान, कागल येथील जाहीर सभेत शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला. तुमच्या तालुक्यातील एका व्यक्तीला मी सगळं काही दिले, मंत्री केलं मात्र संकटाच्या काळात आमची साथ सोडून ते भलतीकडे गेले. त्यांच्यावर ईडी काही चौकशी सुरू झाल्यानंतर ते अस्वस्थ झाले . ज्यांनी त्रास दिला त्यांच्याच सोबत जाऊन ते बसले. खरं तर संकटातून पळून जाणे आणि लाचारी स्वीकारणे हा कागलचा इतिहास नाही, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम करा आणि धडा शिकवा असं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार घणाघात केला.
No comments:
Post a Comment