वेध माझा ऑनलाइन।
सध्या डेंग्यू, मलेरियासह सर्दी पडसं हे आजार डोकं वर काढतं आहेत. लहान मुलांना तर या संसर्गजन्य आजारांची भीती जास्त असते. अशातच आता डेंग्यू, मलेरियासह टायफॉईडचाही धोका वाढला आहे. मात्र त्याची लक्षणे आणि काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात…
काय आहेत टायफॉईडची लक्षणं? :
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील पावसाळ्यात टायफॉईडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. कारण या दिवसात हवेतील ओलावा शिजलेल्या अन्नाला लवकर नासवत असतो. यामुळे अन्नावर आणि पाण्यात साल्मोनेला टायफी नावाची बुरशी तयार होत असते. मात्र हे अन्न आणि पाणी शरिरात गेलं की ही बुरशी आतड्यांवर चढते आणि टायफॉईड या आजाराचा संसर्ग त्या व्यक्तीस होतो.
ताप येणे
उलट्या
जुलाब
अशक्तपणा
भूक कमी लागणे
नेमकी काय काळजी घ्यावी? :
– सर्वात महत्वाचं म्हणजे बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ चुकूनही खाऊ नका.
– दिवसभर भरपूर पाणी प्या. याशिवाय शक्यतो पाणी उकळून प्यावे.
– ताजे अन्न खावे. तसेच शिळे, उरलेले अन्नपदार्थ खाणं पूर्णपणे टाळा.
वाढत्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि रुग्णाला वरील लक्षणे आढळली तर लवकरात लवकर डॉक्टरांच्या सल्ल्यानं रक्ताच्या तपासण्या करून घ्याव्यात. तसेच एंजाइम लिंक्ड इम्यूनोसोर्बेंट टेस्ट, फ्लुरोसेंट एंटीबाडी टेस्ट, विडाल टेस्ट या तपासण्या देखील करून घ्याव्यात.
No comments:
Post a Comment