राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाल्यानंतर दोन्ही गटातून विस्तव जात नाही. तरी कार्यकर्त्यांवरील दादांची भुरळ काही कमी झालेली नाही याचं प्रत्यंतर पुन्हा आले आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या व्यासपीठावर जयंत पाटील यांचे भाषण सुरु असताना कार्यकर्त्यांपैकी एका अजितदादा झिंदाबाद अशी घोषणा अचानक झाली. त्यामुळे जयंत पाटील अवाक झाले. ते म्हणाले कोण आहे ते हातवर करा…असा पोरकटपणा करणार असेल तर सर्वांची भाषणे झाली आहेत,मी पुढच्या कार्यक्रमाला निघतो. मलाही वेळ नाही असेही जयंत पाटील यांनी म्हटले आणि चिडीचूप शांतता पसरली.
अजितदादा यांना इंडिया टुडेच्या कार्यक्रमात पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतणार का ? असा सवाल मुलाखतीत करण्यात आला तेव्हा ते म्हणाले की आता आम्ही खुप पुढे आलो आहोत. आता काहीही करुन सरकार स्थापन करायचं. पवार फॅमिली पुन्हा एकत्र येणार का ? या प्रश्नावर मात्र अजितदादांनी पुढचं कोणी पाहिलं आहे ? आम्ही काही भविष्य वर्तवणारे नाही अशी टिपण्णी केली होती
No comments:
Post a Comment