महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिंदी आणि मराठी भाषेचा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेत इयत्ता 1 ली पासून त्रिभाषा सूत्रीचा निर्णय घेत हिंदी भाषा सक्तीची करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विरोधकांनी केला होता. तसेच, या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरत विरोध केल्यानंतर सरकारने हा निर्णय माघारी घेतला आहे. दुसरीकडे केंद्र सरकारनेही काही दिवसांपूर्वी हिंदी भाषा केंद्राने सक्तीची केली नसून त्रिभाषासूत्री सक्तीची असल्याचे म्हटलं आहे. त्यानंतर, आता पुन्हा एकदा हिंदी भाषा सक्तीची नसल्याचे केंद्र सरकारने म्हटलं आहे. केंद्र सरकारसोबत पत्र व्यवहार करण्यासाठी हिंदी भाषा सक्तीची नसून पत्रव्यवहार करणाऱ्या राज्यांना त्यांच्या मातृभाषेत पत्रव्यवहार करता येणार आहे.
No comments:
Post a Comment