Friday, February 13, 2026

मंत्री हसन मुश्रीफ यांचे महत्त्वपूर्ण विधान ; राजकीय वर्तुळात चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन ।अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातातील निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वपूर्ण विधान करत राजकीय वर्तुळात चर्चा रंगवली आहे.

बारामती येथे घडलेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत अपघाताबाबत शंका मांडल्या तसेच सविस्तर सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या मनातील शंका दूर व्हाव्यात यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले होते. या संदर्भात हसन मुश्रीफ यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून तपास प्रक्रिया सुरू आहे.

रोहित पवारांना उद्देशून बोलताना मुश्रीफ म्हणाले की काकांच्या निधनामुळे त्यांना जसे दु:ख झाले आहे तसेच आम्हालाही वेदना झाल्या आहेत. अपघाताबाबत आम्हीही काही शंका मांडल्या आहेत; मात्र पक्षातील अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. रोहित पवार यांनी सध्या दिलेल्या माहितीसंदर्भात ते पाठपुरावा करत आहेत, हे समजू शकतो; पण पक्षाच्या अंतर्गत घडामोडींमध्ये सहभाग घेणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment