वेध माझा ऑनलाइन ।
संजय राऊत यांनी भाजपवर तीव्र शब्दांत टीका करत त्याला पक्ष नसून छळ छावणी असे संबोधले आहे. त्यांच्या मते, अजित पवार हे या छळ छावणीचे बळी आहेत. राऊत यांनी हिटलरच्या छळ छावण्यांची उपमा देत भाजपच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ते म्हणाले की,
जसे हिटलरने आपल्या विरोधकांसाठी छळ छावण्या निर्माण केल्या होत्या, तशाच प्रकारची ही भाजपची छळ छावणी आहे.
राऊत यांनी दावा केला की, अजित पवार हे महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री झाले असते. छगन भुजबळ आणि गणेश नाईक यांच्यासारखे नेतेही महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम होते, असे त्यांनी अधोरेखित केले. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना राऊत यांनी म्हटले की, शिंदे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल, काही काळ वाट पहावी लागेल आणि त्यानंतरच त्यांना कदाचित नव्याने उमेदवारी करावी लागेल. हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे.
No comments:
Post a Comment