Tuesday, September 8, 2026

वेध माझा ऑनलाईन।
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटावर गंभीर आरोप केला. शिंदेंचे दोन मंत्री आणि दोन प्रवक्ते आपले आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. मुंबईकडे निघाल्यानंतर मराठ्यांवर हल्ला करून मुख्यमंत्री फडणवीसांना बदनाम करण्याचा त्यांचा डाव आहे. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या माणसांचा पण हाच प्रयत्न आहे, असे जरांगे यांनी म्हटले आहे. 

मुंबईत एकाही मराठा आंदोलकाचे रक्त निघाले तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद झालाच पाहिजे. पोलिसांनी हल्लाच केला तर पळू नका, चेंगराचेंगरी होते. येत्या १२ तारखेला राज्यभरातील मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत यावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

शिवसेना ठाकरे गटाचे १६ नगरसेवक गोत्यात?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसमोर मुंबईत नवे आव्हान उभे राहिले आहे. दोन नगरसेवकांचे पद रद्द झाल्यानंतर आता ठाकरे गटाच्या आणखी १६ नगरसेवकांच्या विजयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शिंदे गटाच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी या नगरसेवकांविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. निवडणूक अर्जात जात प्रमाणपत्र, संपत्तीची माहिती, शिक्षण आणि गुन्हेगारी प्रकरणांशी संबंधित माहिती लपवल्याचे आरोप या याचिकेत करण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये मतमोजणीवेळी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत संगनमत केल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या १६ नगरसेवकांचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार. मुंबईतील या राजकीय आणि कायदेशीर घडामोडींमुळे ठाकरे गटासमोरील अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment