Saturday, January 31, 2026

Breaking! सुनेत्रा पवार यांच्यावर क्रीडा युवक कल्याण व राज्य उत्पादन शुल्कखात्यांची जबाबदारी ;

वेध माझा ऑनलाइन।
अजित पवार यांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज दुपारी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली होती, त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला. यावेळी राष्ट्र्वादीचे प्रमुख नेते, आमदार आणि महायुतीचे नेते उपस्थित होते. त्यानंतर आता त्यांच्याकडे 3 महत्त्वाची खाती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 
सुनेत्रा पवार यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक खात्याची जबाबदारी देण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अजित पवारांकडे असलेले अर्थखाते मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेले नाही. समोर आलेल्या माहितीनुसार हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याकडेच ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.

अखेर सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ - सुनेत्रा पवार ठरल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

वेध माझा ऑनलाइन।
अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत, राज्यपालांनी त्यांंना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
दरम्यान आज राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली, आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला.


Breaking! सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा ; सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड ;

वेध माझा ऑनलाइन।
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे, आज सायंकाळी त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी 5 वाजता त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. सुनेत्रा पवार यांची आज सर्वप्रथम पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. आज दुपारी 2 च्या सुमारास विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पार पडली. यात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली. यावेळी पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. 
सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. यानंतर आता सायंकाळी त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. सुनेत्रा पवार यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली होती. मात्र आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने त्यांना खासदारकी सोडावी लागणार होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.
आज पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडला. यावेळी अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर अन्य आमदारांनी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यासाठी समर्थन दिलं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. आता सुनेत्रा पवार या गटनेता असलेल्या अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष या नात्याने सुनील तटकरे आणि अन्य वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवणार आहेत.

शरद पवार सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नाहीत ; रोहित पवार यांची माहिती ;

राष्ट्रवादीच्या गोटात सध्या घडामोडी सुरू असतानाच आज सकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठा खुलासा केला आहे, सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नाही, असं त्यांनी म्हटलं आहे, तसेच या संदर्भात त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही पवार यांनी म्हटलं होतं, दरम्यान शरद पवार यांच्या या विधानानंतर शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.अखेर या संदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईला जाणार नाहीयेत, शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नसल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, त्यांनी त्यापूर्वी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला आहे. तसेच त्यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी देखील निवड करण्यात आली आहे. आज सायंकाळी 5 वाजता त्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत.

Friday, January 30, 2026

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, तर पार्थ पवार राज्यसभेवर जाणार ! शरद पवार म्हणाले...त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे ;

वेध माझा ऑनलाइन।
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेाणार आहेत. यावर आता शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.दरम्यान त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे, असेही शरद पवार यांनी म्हटले. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार तर राज्यसभेवर पार्थ पवार यांची वर्णी लागणार असल्याचे समजते सुनेत्रा पवार या शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता मुंबईला गेल्याचे सांगितले जात आहे. पार्थ पवारला राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू आहे 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनीच उपमुख्यमंत्री व्हावे अशी मागणी केली जात होती आणि तशा घडामोडींना वेगही आला. आज अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पक्षाची 2 वाजता बैठक होईल आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या 5 वाजता शपथ घेणार आहेत. मात्र, सुनेत्रा पवार या शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता मुंबईला गेल्याचे सांगितले जात आहे. पार्थ पवारला राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू आहे आणि याकरिता भाजपा देखील सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांच्या निधनाला काही तास झालेले असतानाच उपमुख्यमंत्रीपदावरून हालचाली वाढताना दिसत आहेत. 
यादरम्यानच शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. आजचा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असल्याचे स्पष्ट शब्दात सांगताना शरद पवार दिसले.
पटेल, तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि तो त्यांचा अधिकार आहे. भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. पण आता खंड पडला.
त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे, असेही शरद पवार यांनी म्हटले. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसले. मात्र, शरद पवार यांच्यासोबत कोणीतीही चर्चा न करता मुलगा पार्थ पवार याच्यासोबत सुनेत्रा पवार रात्री उशिरा मुंबईत आल्या, शिवाय त्यांनी कोणतीही चर्चा शरद पवार यांच्यासोबत केली नाही, हे शरद पवार यांनी स्वत: सांगितले. यावरून आता विविध चर्चांना उधाण आलंय.

Big Breaking ! सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदासह आणखी एक जबाबदारी, पार्थ-जय पवार यांच्यासह सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना;

वेध माझा ऑनलाइन।
अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले आहे. या पदावर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती. अशातच आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्याआधी उद्या दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यानंतर सायंकाळी शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्रीपदासह सुनेत्रा पवार यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. 
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्याची मागणी सर्वच स्तरातून होत होती. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली होती, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे. त्या सोबतच अजित पवारांकडे असलेले राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही सुनेत्रा पवार आपल्याकडेच ठेवणार असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आता त्या अजित पवारांप्रमाणे दुहेरी जबाबदारी सांभाळणार आहेत.

शरद पवार म्हणाले...सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला कोणतीही माहिती नाही ;

वेध माझा ऑनलाइन।
सुनेत्रा पवार शपथ घेणार असल्याच्या चर्चांबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. 'सुनेत्रा पवार शपथ घेतात किंवा नाहीत, हा त्यांच्या पक्षाचा पूर्णपणे अंतर्गत निर्णय आहे. याबाबत मला कोणतीही अधिकृत माहिती नाही,' असं शरद पवार यांनी स्पष्ट केले.

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 'अजित पवार गेली अनेक वर्ष संघटनेचं काम करत होते. अजित पवार सामान्यांशी सुसंवाद ठेवून काम करणारा कर्तृत्ववान नेता होता. आज हयात असते तर घरी दिसले नसते, फिल्डवर असते', असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ांनी (शरद पवार गट) पत्रकार परिषद घेत म्हटलं आहे.

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, 'अजित पवार गेल्यानं आमच्या कुटुंबाची खूप मोठी हानी झाली आहे. अजित पवारांना लोकांच्या प्रश्नांची सखोल माहिती होती. अजित पवार गेली अनेक वर्ष संघटनेचं काम करत होते. लोकांना न्याय द्यायचं काम अजित पवार करत होते. त्यांच्या दैनंदिन कामाची सुरुवात पहाटेच व्हायची. त्यामुळे कर्तृत्वान नेत्याच्या जाण्याने महाराष्ट्रावर मोठा आघात झाला आहे'. असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. नरेश अरोरा यांच्यावर त्यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, 'नरेश अरोरा कोण? हेही मला माहिती नाही. तसेच 'सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, याची मला काहीच माहिती नाही. प्रफुल पटेल, सुनील तटकरे या लोकांनी निर्णय घेतला असावा. हा त्यांच्या पक्षाचा पूर्णपणे अंतर्गत निर्णय आहे', असं देखील शरद पवार यावेळी सांगितलं आहे.

उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार ; महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार ;

वेध माझा ऑनलाइन।
राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला आहे. त्या आता उद्या सायंकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
दरम्यान उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते, वर्षा निवासस्थानी बैठक झाली, आणि या बैठकीनंतर अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

अजितदादांच्या कार्याची दखल ; भाजपकडून मोठी घोषणा ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

लोकनेते, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना सविस्तर निवेदन दिले आहे. चिंचवड येथील डी-मार्टसमोरील 33.86 एकर जागेत उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय संकुलात सुमारे 8.65 एकर क्षेत्रावर मुख्य इमारतीचे काम सुरू असून, भविष्यात महापालिकेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज याच ठिकाणाहून चालणार आहे. या पार्श्वभूमीवर, या इमारतीच्या आवारातच दिवंगत अजितदादांचा पूर्णाकृती ब्राँझ पुतळा असलेले स्मारक उभारण्यात येणार आहे.

आमदार लांडगे यांनी नमूद केले आहे की, दिवंगत अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली. पायाभूत सुविधा, नागरी सेवा, प्रशासकीय निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख धोरणांमुळे राज्याला वेगळी ओळख मिळाली. असे नेतृत्व अकाली काळाच्या पडद्याआड जाणे ही महाराष्ट्राची मोठी हानी असून, त्यांच्या कार्याची जपणूक होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अजितदादांच्या स्मारकाचा प्रस्ताव मंजूर करून पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात यावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. तत्पूर्वी जुन्या महापालिका सभागृहात अजितदादांचे तैलचित्र तातडीने बसवण्यात यावे, अशी सूचना प्रशासनाला केली आहे.
नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहाला ‘अजितदादा पवार सभागृह’ असे नाव देण्यात यावे आणि शहराच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा विकास प्रवास, तसेच भविष्यातील नियोजन अधोरेखित करणारी ‘पिंपरी-चिंचवड अजित सृष्टी’ उभारण्यात यावी, अशी संकल्पना आहे. शहराला विकासामध्ये एक नंबर बनवण्याचे स्वप्न अजितदादांनी पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. हे स्मारक भावी पिढ्यांना लोकसेवेची प्रेरणा देणारे ठरेल आणि हिच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा विश्वास यावेळी आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री? आज प्रफुल्ल पटेल आणि काही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतली भेट ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधनानंतर राज्याचे नवे उपमुख्यमंत्री कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज प्रफुल्ल पटेल आणि काही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर पटेल काय म्हणाले हे मात्र महत्वाचे आहे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. बारातमीत काल अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी राज्यातील सर्वच बडे नेते उपस्थित होते. त्यानंतर आता त्यांच्या जाही उपमुख्यमंत्री कोण बनणार? याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी घेतले जात आहे. अशातच आता प्रफु्ल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी नेमकी काय चर्चा झाली याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ‘आमचे नेते अजित पवार यांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नव्हती. राजकीय दृष्टीने आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि विधिमंडळाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री ही जागा अजित पवार यांच्याकडे होती. त्या जागेचा आम्हालाही निर्णय करावा लागणार आहे, म्हणून त्यांना आम्ही एवढंच सांगितलं की, येत्या काही दिवसांमध्ये लवकरात लवकर निर्णय आम्हाला करायचा आहे. यासाठी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून, जनभावनेचा आदर करून, अजित दादांची आमच्या पक्षात महत्त्वाची भूमिका होती या सर्वांचा विचार करून आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, हे आम्ही त्यांना सांगितलं आहे.’
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवले जाणार का? या प्रश्नावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ‘सुनेत्रा त्यांच्या नावाची चर्चा आज आम्ही केलेली नाही, पण तो आमचा अंतर्गत विषय आहे. कोणाला त्या जागेवर बसवाचं हा पक्षाचा निर्णय आहे. आम्ही जनभावनेचा आणि आमदारांचे मत विचारात घेणार आहोत. आमची  सुद्धा भावना आहेच. अजूनही राजकीय शोक आहे, घरी काही धार्मिक विधी सुरू आहेत. आम्हाला याबाबत सुनेत्रा वहिनींशीही बोलावं लागेल, पार्थ पवार, जय पवार यांच्याशीही बोलावं लागेल. घरचे सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू. लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे. जनतेची भावना आणि सर्वांच्या भावनांच्या अनुरूप निर्णय होणार आहे. आमचा कुणाचाही त्यांच्या नावाला विरोध नाही, पण आम्हाला त्यांच्याशी बोलावं लागणार आहे.’

Wednesday, January 28, 2026

बारामतीत अजितदादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ; राष्ट्रध्वज जय पवारांकडे सुपूर्द ;

 वेध माझा ऑनलाइन।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत त्यांच्या अकाली जाण्याने राजकीय, सामाजिक आणि सामान्य जनतेमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. आज सकाळी बारामती येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत असून, हजारो नागरिक अंतिम दर्शनासाठी उपस्थित आहेत.

अजित पवार यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज अर्पण करण्यात आला असून, तो त्यांच्या मुलगा जय पवार यांच्याकडे सन्मानाने सुपूर्द करण्यात आला. हा क्षण उपस्थित प्रत्येकासाठी अत्यंत भावनिक ठरला. कुटुंबीय, सहकारी नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अश्रूंनी निरोप देत त्यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहिली. 
आज सकाळी 11 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्याआधी सकाळी काटेवाडी येथून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. हजारो नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणा देत आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देत होते.

चार दिवस आधीच अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं. काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. ते मुंबईवरून बारामतीला निघाले होते. बारामतीमध्ये विमान धावपट्टीवर उतरत असताना नियंत्रण सुटून हा अपघात झाला, विमान जमिनीला धडकलं, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दरम्यान हा अपघात घडण्यापूर्वी चार दिवस आधीच अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं. काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं, तुम्ही -आम्ही आज असू उद्या नसू, काळाचं नितीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं, आणि त्यानंतर चारच दिवसांमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांच्या त्या भाषणाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
चारच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मोठं विधान केलं होतं.  
काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं, चार दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं होतं. आणि आज ही मन हेलावणारी घटना घडली आहे. ‘कोण कायमचं राहणार आहे? तुम्ही -आम्ही आज असू उद्या नसू, काळाचं नितीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे. परंतु आपण आपल्या हयातीमध्ये काम करत असताना, राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं, निवडणुका संपल्यानंतर राजकारण विसरायचं असतं. पण ज्याच्यामधून त्या भागात आर्थिक सुबत्ता येणार आहे, ते काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. मित्रांनो हे जग कायमचं राहणार आहे, तुम्ही आम्ही आज,असू उदया नसू, असं त्यांनी म्हटलं होतं.  त्यानंतर आज अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आहे.

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले शरद पवार ?

वेध माझा ऑनलाइन।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला आहे. आज सकाळी 9 च्या सुमारास झालेल्या या घटनेत अजित पवारांसह विमानचे पायलट आणि इतर सहकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवाराच्या निधनावर खासदार आणि अजित पवार यांचे काका शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी म्हटले की, अजित पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. एक मेहनती नेता आपल्यातून गेल्याने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्याचं जे नुकसान झालंय ते भरून येण्यासारखं नाहीये. आजही काही गोष्टी आपल्या हातात नाहीत. यात काहीही राजकारण नाही. हा केवळ एक अपघात होता. याच्या यातना महाराष्ट्राला आणि आम्हा सर्वांना आहे, यात राजकारण आणू नये असंही शरद पवार म्हणाले.

अजितदादांच्या आई टीव्ही पाहत असताना अचानक बातमी आली आणि त्यांनी विचारलं..., दादांचा अपघात झालाय का? काही झालंय का?”...आणि मग, अजित पवार यांच्या बारामतीतील फार्महाऊसवर काय घडलं हृदयद्रावक प्रसंग ; वाचा बातमी

वेध माझा ऑनलाइन । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी निधन झाले आहे. बारामतीला येत असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात अजितदादांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही बातमी अजितदादांच्या आईला कळाल्यानंतर नेमकं काय घडलं हे समोर आले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी बारामतीत झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीला येत होते, पण विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच विमान क्रॅश झाले. या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. अपघाताची बातमी समोर येताच अजित पवार यांच्या बारामतीतील फार्महाऊसवर एक हृदयद्रावक प्रसंग घडला. 
अपघाताच्या वेळी अजितदादांच्या आई आशाताई पवार टीव्ही पाहत बसल्या होत्या. फार्महाऊसचे मॅनेजर संपत धायगुडे यांनी माध्यमांशी बोलताना हा मन सुन्न करणारा प्रसंग सांगितला.

संपत धायगुडे यांनी सांगितले... 
सकाळी सात वाजता आशाताई नेहमीप्रमाणे टीव्ही पाहत बसल्या होत्या... आम्ही त्यांना नाश्ता देण्याची तयारी करत होतो... त्यानंतर साडेआठच्या सुमारास टीव्हीवर अचानक ‘अजित पवार यांचे विमान कोसळले’ अशी बातमी झळकली. .आईंनी लगेच आम्हाला विचारले, “अरे, दादांचा अपघात झालाय का? काही झालंय का?”
आम्हाला वाटले, कदाचित काही गंभीर नाही. पण पुढे बातम्या येऊ लागल्या, ‘अजित पवारांना बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले’, ‘प्रकृतीबाबत माहिती येणार’ अशा बातम्या. आईंनी हे सर्व ऐकू नये म्हणून आम्ही तातडीने बंगल्यावरील टीव्हीची केबल तोडली.. आणि टीव्ही बंद पडल्याचे सांगितले. त्यांचा मोबाईलही फ्लाइट मोडवर टाकून दिला... “काहीच झालेलं नाही, दादा सुरक्षित आहेत,” असे आम्ही त्यांना सांगत होतो...पण आशाताई कोणाचेही ऐकायला तयार नव्हत्या. “दादांना भेटून येऊ, चला,” असे म्हणत त्या फार्महाऊसच्या बाहेर चालत निघाल्या. ड्रायव्हरने गाडी बंद पडल्याचे सांगितले, पण त्या ऐकल्या नाहीत... शेवटी नाईलाजाने आम्ही त्यांना बारामतीतील बंगल्यावर घेऊन गेलो... 

तिथे त्यांना सत्य समजले... आणि त्यांचे डोळे भरून आले. या प्रसंगाने फार्महाऊसवरील प्रत्येकजण हादरून गेला... आशाताईंच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पाहणाऱ्यांच्या काळजाला अक्षरशः तडा गेला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन ; मुख्यमंत्र्यांसोबत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही उपस्थिती ;


वेध माझा ऑनलाइन: 
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजारापू, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, महिला व बाल विकास मंत्री कु.अदिती तटकरे, बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहूल कुल, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

अजित पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद व धक्कादायक ; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील निधनाची बातमी अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. या अपघातात त्यांचे असे अकाली जाणे हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशाचे मोठे नुकसान आहे. अजितदादा हे अत्यंत शिस्तप्रिय व धडाडीचे लोकनेते होते 
पवार कुटुंबीयांप्रती मी माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली

ते म्हणाले...
अजित पवार हे अत्यंत शिस्तप्रिय आणि कार्यक्षम नेते होते. इतका शिस्तबद्ध नेता क्वचितच पाहायला मिळतो. २०१० साली मी मुख्यमंत्री म्हणून प्रशासनाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. जवळपास चार वर्षे आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्राचे नेतृत्व केले आणि जनहिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आमच्यात काही मतभेदही झाले. एका टप्प्यावर ते नाराज होऊन आपल्या पदाचा राजीनामा देऊन बाहेर गेले होते. मात्र, मी त्यांना समजावून पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले. त्या काळातही त्यांच्याकडे वित्त विभागाची जबाबदारी होती आणि आजही तीच जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करण्यात अत्यंत कुशल होते.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, कृषी क्षेत्र आणि सहकार क्षेत्र यांची त्यांना सखोल जाण होती. राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात अपार क्षमता होती.
आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि देशाच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. पवार कुटुंबीयांप्रती मी माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो

अजितदादांचे निधन ; कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे ;

वेध माझा ऑनलाइन।
अजितदादांच्या अशा अचानक जाण्याने जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे माझे व्यक्तिगत अजितदादांशी चांगले संबंध होते आम्ही एकत्र काम केलं आहे साखर कारखानदारी असो किंवा जिल्ह्याचे प्रश्न असोत मी त्यांचा सल्ला घेत असे ते देखील मला नेहमी मदत व मार्गदर्शन देखील करत होते
त्यांच्या निधनाची बातमी आज सकाळी समजली त्यांनतर आम्ही आमचे सगळे कार्यक्रम रद्द केले तसे आम्ही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना कळवले आहे
त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे अशा शब्दात आमदार डॉ अतुल भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व अजितदादांना श्रद्धांजली वाहिली

काल अजितदादांनी मंत्रालयात आलेल्या सर्व फाईल्स क्लिअर केल्या ; काल अजितदादांनी केलेली कामे व त्या कामाचा काय आहे तपशील..?

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचं आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीमध्ये येत असताना आज (28 जानेवारी) अजित पवार यांच्या विमानाचा लॅंडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. विमान लँडिग होतानाच अपघात झाला आणि विमानाने पेट घेतला. अपघातानंतर विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते.  अपघात झाला  त्यावेळी अजित पवार यांच्यासह विमानात पाच जण होते. विमानात अजित पवार आणि त्यांचे सुरक्षारक्षक देखील होते. विमानाचा अपघात झाला त्यानंतर अवघ्या काही वेळातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अचानक समोर आलेल्या या घटनेने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. काल (मंगळवारी, ता २७) अजित पवार कॅबिनेट बैठकीसाठी अजित पवार मुंबईला गेले होते, ते मुंबईतून बारामतीत आल्यानंतर हा अपघात झाला आहे. तर काल त्यांनी मुंबईत केलेली कामे आणि त्यांचा तपशील देखील समोर आला आहे.

अजित पवारांनी काल काय काम केली...
अजित पवार कायमच अॅक्शन मोडमध्ये दिसायचे. पहाटेच्या सुमारास ते आपल्या कामाला सुरूवात करायचे. वेळेवर न येणाऱ्या अधिकऱ्यांना ते अनेकदा झापायचे. काल त्यांनी मुंबईतील केलेल्या कामाचा तपशील समोर आला आहे.
मुंबईत असले की अजितदादा सकाळी 8.30 वाजता ते मंत्रालयात येऊन कामकाजाला सुरुवात करत असत.
 
कालही सकाळी 8.30 वाजता अजित पवार मंत्रालयात हजर झाले.
आलेल्या सर्व फाईल्स त्यांनी क्लिअर केल्या.

वित्त विभागाचे सचिव, महसूल विभागाचे सचिव, यांच्या समवेत या आर्थिक वर्षात राज्याला मिळालेल्या उत्पन्नाचा आढावा त्यांनी घेतला, उत्पन्न वाढीच्या सूचना सर्व सचिवांना दिल्या. ही बैठक दीड तास चालली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसमवेत कॅबिनेट बैठकी संदर्भात चर्चा करून ते कॅबिनेट बैठकीला गेले.

कॅबिनेट बैठक,पायाभूत सुविधा समिती बैठकीला ते उपस्थित राहिले.

त्यानंतर पुन्हा दालनात गेले. तिथे मंत्री चंद्रकांत पाटील व त्यांची चर्चा झाली. दुपारी 2.30 वाजता ते देवगिरीकडे रवाना झाले.
शेवटच्या दिवशीही राज्याचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यासाठीच ते कार्यरत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन ; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर;

वेध माझा ऑनलाइन 
महाराष्ट्र राज्याचे  उपमुख्यमंत्री श्री. अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या सन्मानार्थ राज्यात तीन दिवसांचा राज्य दुखवटा पाळला जाईल, असे राज्य शासनातर्फे निर्देशित करण्यात आले आहे.
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील आदेशानुसार दिवंगत मान्यवरांच्या सन्मानार्थ खालीलप्रमाणे सूचनांचे पालन करण्यात यावे. असे शासनाने निर्देशित केले आहे.
आज बुधवार, दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण जिल्ह्यातील राज्य शासनाची सर्व कार्यालये बंद राहतील.
 दिनांक 28 ते 30 जानेवारी  2026पर्यंत सर्व शासकीय इमारतीवरील राष्ट्रध्वज अर्ध्या काठीवर (Half Mast) फडकविण्यात यावा.
राज्यात तीन दिवसांचा राज्य दुखवटा पाळला जाईल व या काळात कोणतेही अधिकृत शासकीय करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. अशा सूचना राज्य शासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत. यांचे काटकोन पालन जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

Tuesday, January 27, 2026

मृत्यूच्या अगोदर म्हणजे... आज सकाळीे 8 वाजून 57 मिनिटांनी... अजितदादांनी केलेली शेवटची पोस्ट व्हायरल ; काय आहे ती पोस्ट?

वेध माझा ऑनलाइन।
बुधवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. अजित पवारांची अशी एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. बारामती येथील गोजुबावी परिसरातील धावपट्टीवर उतरत असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि ते शेतात कोसळलं. अपघातात अजित दादा यांच्यासोबत अन्य दोन जणांचं देखील निधन झालं आहे. अजित पवार यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशात अजित पवार यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट देखील सर्वत्र व्हायरल होत आहे.

अजित पवार यांनी बुधवारी सकाळी 8 वाजून 57 मिनिटांनी ट्विट केलं होतं. आता अजित पवार यांची पोस्ट एक्सवर दिसत नसली तरी त्या पोस्टचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. महान स्वातंत्र्य सेनानी, पंजाब केसरी लाला लजपत राय यांना जयंतीदिनी अभिवादन करणारं ट्वीट त्यांनी केलं.

पंजाब केसरी लाला लजपत राय यांचा फोटो पोस्ट करत अजित पवार म्हणाले, ‘राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे, महान स्वातंत्र्य सेनानी, स्वराज्याचे उद्घोषक, ‘पंजाब केसरी’ लाला लाजपत राय जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांची राष्ट्रनिष्ठा आपल्याला कायमच प्रेरणा देत राहील…’, सध्या अजित पवार यांची शेवटची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.

विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू ; महाराष्ट्र हादरला ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारामती येथील लँडिंग दरम्यान त्यांच्या छोट्या विमानाला अपघात झाला आणि त्यानंतर विमानाने पेट घेतला. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवारांसह एकूण सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. डीजीसीए कडून या घटनेची पुष्टी करण्यात आली आहे.
अजित पवार हे सकाळी मुंबईहून एका सभेसाठी बारामतीला निघाले होते. नेहमीप्रमाणे ते एका छोट्या विमानाने प्रवास करत असताना, बारामती विमानतळाच्या शेजारीच लँडिंग दरम्यान विमानाला अपघात झाला. विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 
वेध माझा ऑनलाइन
 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मुंबईहून पुण्याकडे (बारामतीकडे) येत असताना लँडिंग करताना अपघात झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या सभेसाठी बारामतीला जात असताना हा अपघात घडला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. मुंबईहून पुण्याकडे म्हणजेच बारामतीकडे येत असतान हा अपघात झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित दादा हे सभेसाठी बारामतीला आले होते. या अपघातग्रस्त ठिकाणाचा व्हिडीओ समोर आलाय, या अपघातामध्ये काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचे पीए आणि काही जवळचे लोक सोबत असल्याचं समजत आहे. लँडिंग करताना विमानाला अपघात झाला. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक हे रणजित शिवतरे हे बारामती विमानतळावर पोहोचले आहेत.त्यांनी ही माहिती दिली आहे.

ज्या शाळांत मराठी विषय शिकवला जाणार नाही, त्या शाळांवर कारवाईचा बडका उगारला जाणार ; सरकारचा थेट आदेश...

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर शाळेत हिंदी विषयाच्या सक्तीचा मुद्दा चांगलाच तापला होता. या निर्णयाला विरोध करण्यासाठी दोन्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येत मुंबईत मोठा मोर्चा काढला होता. सर्वच स्तरातून दबाव वाढल्यानंतर सरकारने हिंदी सक्तीचे सर्व शासन निर्णय मागे घेतले होते. महाराष्ट्रात 2020 सालापासून सर्व शाळांत मराठी भाषा विषय सक्तीचा आहे. परंतु अनेक शाळांत या नियमाचे पालन केले जात नाही. ही बाब समोर आल्यानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या शाळांत मराठी विषय शिकवला जाणार नाही, त्या शाळांवर कारवाईचा बडका उगारला जाणार असून तसा थेट आदेशच सरकारने काढला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या १ मार्च २०२० रोजीच्या अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात आलेला आहे. या निर्णया अंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अध्यापन व अध्ययन सक्तीने राबविण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. हा निर्णय शासकीय, खासगी तसेच ICSE, CBSE, IB आदी सर्व मंडळांच्या शाळांना बंधनकारक आहे. मात्र अनेक नामांकित खासगी शाळांमध्ये आजही या निर्णयाकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले होते.

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांनंतर सातारा गॅझेटियर लागू करण्यात येणार ; आज मंत्रालयात झाली बैठक ;

वेध माझा ऑनलाइन ।
राज्यात मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. त्यामुळे, हैदराबाद गॅझेटियरच्या निर्णयानुसार मराठावाड्यातील अनेक मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र, मराठा आंदोलक उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी राज्य सरकारने हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भातील त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. त्यामुळे, हैदराबाद गॅझेटियर लागू झाले पण सातारा गॅझेटियर कधी लागू होणार? असा प्रश्न मराठा बांधवांना पडला आहे. सातारा गॅझेटियरचा लाभ साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना होणार असल्याने या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता, यासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 

मराठा आरक्षण उपसमितीची आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात या बैठकीत सातारा गॅझेटियरवर प्रामुख्याने चर्चा झाली. तसेच, हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणी आणि मराठा आरक्षण विषयावर आढावा घेण्यात आला. त्यानुसार, राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांनंतर सातारा गॅझेटियर लागू करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅजेट लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सातारा गॅजेट लागू करण्यास अडचणी येत आहेत. अशातच, फक्त इंटरप्रिटेशनचा भाग असल्याने यासंदर्भात देखील लवकरच निर्णय होणार असून समज-गैरसमज दूर करत मराठा आरक्षणासंदर्भात सातारा गॅजेट लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकाची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आधी नगरपालिका निवडणुका, पुन्हा महापालिका आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांनंतर सातारा गॅझेटियर लागू करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Monday, January 26, 2026

उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये चालले आहेत ;

वेध माझा ऑनलाइन।
 शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे तुम्हाला लवकरच आमच्या सोबत दिसतील. आमच्या सोबत येण्याची त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे, असा दावा उद्योगमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केलाय. उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केलाय.  
संजय राऊत म्हणाले की, अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पक्षात आहेत. त्यांनी तीन-चार पक्ष बदलले नाहीत. ते आमचे सहकारी आहेत. या दाव्यांना अर्थ नाही. स्वतः उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये चालले आहेत. दावोसमध्ये काय चर्चा झाली हे तुम्हाला माहिती आहे का? असा दावा त्यांनी केला. 

आता मुंबईला नवा महापौर मिळण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार :

वेध माझा ऑनलाईन।
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागून १० दिवस उलटले आहेत. तरी अद्याप मुंबईत महापौर पदाच्या हालचालींना फारसा वेग आलेला नाही. त्यातच आता मुंबईला नवा महापौर मिळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. येत्या ३१ जानेवारी २०२६ रोजी होणारी महापौर पदाची निवडणूक आता फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीतील घटक पक्षांची म्हणजेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची अद्याप विभागीय आयुक्तांकडे अधिकृत गट नोंदणी झालेली नाही. त्यामुळे हा विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर गट नोंदणीचा पेच कायम आहे. महापालिका निवडणुकीनंतर निवडून आलेल्या नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत गट म्हणून नोंदणी करणे आवश्यक असते. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत पक्षादेश (व्हीप) लागू करता येत नाही. भाजपकडे सध्या ८९ नगरसेवक आहेत. तर शिवसेनेचे २९ नगरसेवक आहेत. या नगरसेवकांच्या गट नोंदणीबाबत सध्या तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे.

एकनाथ शिंदेंनी सांगितलं... का चालू केली लाडकी बहीण योजना...म्हणाले... आईची काटकसर आणि पत्नीच्या डोळ्यात पाणी बघितलंय;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या अंतिम तारीख आहे. त्यामुळे, आता राजकीय पक्ष कामाला लागले असून प्रचाराचा धुरळा पुन्हा उडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या जन्मभूमीतून प्रचाराचा नारळ फोडला. आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय, अडीच वर्षात माझं काम तुम्ही पाहिलंय मी अडीच वर्षात अडीच तास शांत झोपलो नसेल. लाडक्या बहिणींनी ठरवलं होतं लाडक्या भावाला निवडून आणायचं, असे म्हणत पुन्हा एकदा लाडकी बही‍ण योजनेसंदर्भाने प्रचारात आघाडी घेतली. नुकतेत ठाकरे गटातून शिवसेनेत आलेल्या माजी आमदार दगडू सपकाळ यांच्यासह एकनाथ शिंदेंनी साताऱ्यातून तुफान फटकेबाजी केली. 
दरम्यान माझ्या आईची काटकसर आणि माझ्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पहिले होते, म्हणून मी याचा विचार करुन महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली असे त्यांनी सांगितले

लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी एका वर्षाचा खर्च होता, भल्याभल्यांची हिम्मत झाली नाही. मात्र, जे खोडा घालायचे त्यांना 232 नंबरचा चा घोडा दाखवला. महारष्ट्राच्या इतिहासात 232 जागा महायुतीच्या कधी निवडून आल्या नव्हत्या, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना भरभरुन मतदान महायुतीला केल्याचं म्हटलं. 

एकनाथ शिंदे म्हणाले...
माझी कर्मभूमी मुंबई असली तर माझी जन्म भूमी सातारा आहे, सातारा जिल्ह्याची गौरवशाली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण कारभार करतोय. संपत्ती कमावली यापेक्षा माणसं किती कमवली हे मी पाहिलं. आधीच्या मुख्यमंत्र्यांना स्पीड ब्रेकर आणि स्थगितीशिवाय काही माहित नव्हतं. फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम कराव लागतं, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

एकनाथ शिंदे टोकाचा निर्णय घेऊन आले दरे गावी ; मुंबईत महापौर पदाचा पेच वाढला;


वेध माझा ऑनलाइन
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीसाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यातच आता महायुतीमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचा एकत्रित गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यांनी आपल्या २९ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे
भाजपला मुंबईत आपला महापौर बसवायचा आहे, कारण त्यांच्याकडे नगरसेवकांचे संख्याबळ जास्त आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अडीच वर्षे आमचा महापौर असावा अशी मागणी केली आहे. या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांत एकमत होऊ शकलेले नाही. त्यातच आज दुपारी १२ वाजता शिवसेनेचे सर्व २९ नगरसेवक दादर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करतील. त्यानंतर हे सर्व नगरसेवक बसने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन येथे जाऊन स्वतंत्र गटाची अधिकृत नोंदणी करतील. सध्या एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावी आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे आणि शीतल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.

मुंबईत भाजप महापौरपदाच्या शर्यतीतून बाहेर ;?

वेध माझा ऑनलाईन।
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीसाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यातच आता महायुतीमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचा एकत्रित गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यांनी आपल्या २९ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपला मुंबईत आपला महापौर बसवायचा आहे, कारण त्यांच्याकडे नगरसेवकांचे संख्याबळ जास्त आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अडीच वर्षे आमचा महापौर असावा अशी मागणी केली आहे. या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांत एकमत होऊ शकलेले नाही. त्यातच आज दुपारी १२ वाजता शिवसेनेचे सर्व २९ नगरसेवक दादर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करतील. त्यानंतर हे सर्व नगरसेवक नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन येथे जाऊन स्वतंत्र गटाची अधिकृत नोंदणी करतील. सध्या एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावी आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे आणि शीतल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले होते. यामुळे भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड करू नका असे स्पष्ट आदेश दिले आहेत. दुसरीकडे, शिंदे गट पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपदावर ठाम असल्याने पेच निर्माण झाला आहे. मुंबईत तणाव असतानाच एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेले आहेत. भाजपच्या भूमिकेवर त्यांनी ही एक प्रकारची नाराजी व्यक्त केली आहे, असे म्हटले जात आहे.
दरम्यान महापौरपदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी आहे. येत्या ३१ जानेवारीला ही निवडणूक होणार आहे. त्यातच शिवसेना शिंदे गट स्वतंत्र नोंदणी करत असल्याने भाजपवर दबाव वाढला आहे. जर दोन्ही पक्षांत तडजोड झाली नाही, तर मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक अतिशय नाट्यमय होऊ शकते. ३१ जानेवारीला महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडणार आहे.
मुंबईत सत्ता स्थापनेसाठी ११४ हा बहुमताचा आकडा आहे. भाजपकडे ८९ तर शिंदे गटाकडे २९ नगरसेवक आहेत. शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय भाजपला महापौर बसवणे कठीण आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होणार का आणि त्यात महापौर पदाबद्दल सकारात्मक तोडगा निघणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



प्रकाश आबेडकर यांचा फोन, आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल :

वेध माझा ओनलाईन।
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणावर वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी आक्षेप घेतला होता. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नाव भाषणाच्या दरम्यान का घेतलं नाही, असे म्हणत या महिला कर्मचाऱ्यांनी तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केला. त्यामध्ये, माधवी जाधव यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. मी मातीकाम करेन, मला सस्पेंड करा पण बाबासाहेबांचं नाव संपवण्याचं काम मी होऊ देणार नाही, अशा शब्दात त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही माधवी जाधव यांना फोन करुन संवाद साधला. आता, माधवी जाधव यांनी गिरीश महाजन यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे. 

वन विभागातील या दोन महिला कर्मचाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच कार्यक्रमाच्या वेळी गोंधळ घातला. त्यामुळे, पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेऊन सरकार वाडा पोलीस ठाण्यात आणले. या घटनेनंतर माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे या दोघींच्या समर्थनार्थ पोलीस स्टेशनच्या बाहेर नागरिकांनी, बाबासाहेबांच्या अनुयायांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर, माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली असून नाशिक पोलीस यासंदर्भात कारवाई करत आहे. ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वनरक्षक कर्मचारी महिलांनी केली आहे. तर, प्रकाश आंबेडकर यांनीही माधवी जाधव यांच्याशी फोनवरुन संवाद साधत माहिती जाणून घेतली. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. 
नाशिकमध्ये आज भाजप मंत्री गिरीश महाजनच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव (वनरक्षक) महिलेसोबत फोनवर बोललो. यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला. मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्य अट्रोसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. तसेच, आरएसएस-भाजपाकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय. भाजप आणि गिरीश महाजनच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनीही भूमिका मांडली.  
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात अनावधानाने बाबासाहेबाचे नाव राहिले, माझा तसा कुठलाही हेतू नव्हता असे म्हणत घडल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. 


मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गट, भाजप युती होणार? मुंबईत घडामोडींना वेग,

.
वेध माझा ऑनलाइन।
महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेना शिंदे गटाला देखील राज्यात चांगलं यश मिळालं आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाला मुंबई आणि इतर एक दोन महापालिका वगळता इतर ठिकाणी अपेक्षित कामगिरी करता आली नाही. दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे महापालिका निवडणूक निकालानंतर महापौरपदासाठी आरक्षण सोडत देखील जाहीर झाली आहे, आरक्षण सोडत जाहीर होताच आता सर्वच पक्षांकडून महापालिकांमध्ये आपल्या पक्षाचा महापौर कसा बसवला जाईल यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. संख्याबळाचे आकडे जुळवले जात आहेत.  राज्यात काही अशा महापालिका आहेत, जिथे सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं नियोजन सुरू आहे. मात्र आता राजकारणात आणखी एक नवा प्रयोग पहायला मिळण्याची शक्यता आहे.  ती म्हणजे भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होऊ शकते.
चंद्रपूरमध्ये काँग्रेस बहुमताच्या जवळ आहे, मात्र तरी देखील काँग्रेस सत्तेपासून दूर राहू शकतं अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण आता चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसविरोधात शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, दोन अपक्ष नगरसेवक आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर महापालिकेत बहुतासाठी 34 जागांचा आकडा पाहिजे. भाजपचे या महापालिकेत 24 नगरसेवक आहेत, तर शिवसेना ठाकरे गटाचे 6, वंचित बहुजन आघाडीचे दोन आणि अपक्ष दोन असे  10 नगरसेवक होतात.   24 आणि 10 मिळून 34 चा बहुमताचा आकडा गाठला जात असल्यानं चंद्रपूर महापालिकेत आता भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची शक्यता वर्तवली जात आहे.

Sunday, January 25, 2026

मविआ सरकार पाडलं म्हणून पुरस्कार दिला का? ; संजय राऊतांचा सवाल; कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर ;

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रपतींचे भाषण, बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षा आणि माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना जाहीर झालेला पद्मभूषण पुरस्कार यांवरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. बांगलादेशप्रश्नी लष्करी कारवाईची मागणी करत त्यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणावरूनही गृहखात्याला धारेवर धरले.

राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून जगाला शांततेचा संदेश दिला असला, तरी सध्या खुद्द आपल्याच देशात आणि सीमेवर अशांतता व अस्थिरतेचे वातावरण आहे. शेजारील बांगलादेशात दररोज हिंदूंच्या नरसंहाराच्या बातम्या येत आहेत, तिथे कालच दोन हिंदूंना जिवंत जाळण्यात आले. अशा भीषण परिस्थितीत केवळ शांततेचे आवाहन करून हे हत्याकांड थांबणार आहे का? जर शांतता प्रस्थापित करायची असेल, तर केवळ उपदेश करून उपयोग नाही; त्यासाठी इंदिरा गांधींनी दाखवले होते तसे धाडस दाखवून लष्करी कारवाई करण्याची गरज आहे, अशा कडक शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींचे भाषण, बांगलादेशातील हिंदूंची स्थिती, भगतसिंग कोश्यारी यांचा सन्मान आणि राज्यातील ड्रग्ज प्रकरणावर सडकून टीका केली.

सातारा जिल्ह्यातील दुर्गम गावात केलेल्या कारवाईने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ ; सुमारे 55 कोटी रुपयांचा ड्रग्जचा साठा सापडला;

 वेध माझा ऑनलाइन।
गुजरातमधून आलेल्या नार्कोड्रग्ज पथकाने सातारा जिल्ह्यातील दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या एका गावात केलेल्या कारवाईने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली. या कारवाईत सुमारे 55 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा सापडल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.. आयपीएस रँकचे तीन अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. हे सर्व अधिकारी आणि त्यांची टीम ही गुजरातमधून आल्याची माहिती आहे. त्यांनी स्थानिक आणि बिहारच्या काही  युवकांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ही कारवाई करताना पुसटशी कल्पनाही या सातारा पोलिसांना होऊन दिली नाही. इतकी गोपनीयता या पथकाने पाळली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी या ठिकाणी असलेल्या एका मोठ्या शेडवर गुजरात येथून आलेल्या डी आर आय विभागाच्या पथकाने या शेडचा मालक हा बाबा मोरे याला ताब्यात घेऊन पुढची कारवाई सुरू केली. या शेडमध्ये सुमारे 55 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज बनवण्याचे सर्व साहित्य जप्त केल्याचं सांगितलं जात आहे.

Friday, January 23, 2026

अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेतृत्व करणारे नेते ॲड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील – उंडाळकर हे येळगाव जि प गटातून भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार ;

वेध माझा ऑनलाइन।
अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार गटाचे नेतृत्व करणारे नेते ॲड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील – उंडाळकर हे येळगाव जिल्हा परिषद गटातून भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केली. पक्षात सातत्याने होणाऱ्या अन्यायामुळे आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. लोकभावना त्यांच्या पाठीशी असून, या निवडणुकीत निश्चित परिवर्तन घडेल, असा विश्वासही आमदार भोसले यांनी व्यक्त केला.

आमदार डॉ. अतुल भोसले आणि ॲड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील – उंडाळकर यांची भेट झाल्यानंतर उमेदवारीची घोषणा करण्यात आली. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील व यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, स्वर्गीय जयसिंगराव (बापू) पाटील – उंडाळकर यांचे चिरंजीव असलेल्या ॲड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील यांना विचारांचा मोठा वारसा लाभलेला आहे. अनेक वर्षे त्यांनी पक्षासाठी निष्ठेने काम करूनही त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान झाला नाही. त्यामुळे येळगाव जिल्हा परिषद गटातील जनतेच्या भावना जाणून घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच पंचायत समिती निवडणुकीसाठी संजय सवादेकर हे भाजपकडून उमेदवारी लढवत असून, संगीता शेटे या देखील भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आमदार भोसले यांनी दिली.

आमदार भोसले पुढे म्हणाले, ॲड. राजाभाऊ पाटील आणि आम्ही अनेक दिवसांपासून एकत्रितपणे काम करत आहोत. सामाजिक आणि राजकीय स्तरावर आमचे विचार जुळणारे आहेत. प्रामाणिकपणा हा त्यांच्या जीवनाचा आणि कुटुंबाचा मूलमंत्र आहे. त्यामुळे त्यांनी दीर्घकाळ एकाच दिशेने वाटचाल केली. मात्र, सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना निर्माण झाल्या होत्या. याबाबत सखोल चर्चा करून सर्वांचा विचार विनिमय झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघात राजाभाऊ पाटील हेच निवडून येतील, असा ठाम विश्वास व्यक्त करत आमदार भोसले म्हणाले, जनतेमध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत सकारात्मक भावना आहेत. त्यामुळे येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तन अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता?

वेध माझा ऑनलाइन।
निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या पाच फेब्रुवारी रोजी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.  तर सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे, आता त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे ...
जालना जिल्ह्यातल्या जवळपास 475 ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात संपत आहे, मात्र याच कालावधीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार असल्यानं आणि परीक्षांचा हंगाम पाहता या ग्रामपंचायतींच्या निवडणुका चार महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या गावांचा कारभार आता प्रशासकांच्या हाती जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक मोठ्या लोकसंख्येच्या गावांचा समावेश आहे, त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी निवडणुका होणे अपेक्षित आहे, मात्र याच निवडणुकीच्या काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांना आता प्रतिक्षा करावी लागू शकते.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवा ; कराड दक्षिणमधील भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या ; डॉ अतुल भोसलेंचे मतदारांना आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन।
भाजपा सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात अभूतपूर्व विकास झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपचे नेतृत्व आल्यास विकासाला आणखी गती मिळेल. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी कराड दभिणमधील भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. कोळे (ता. कराड) येथे आयोजित भाजपा उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 

भाजपाच्या विंग जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सौ. शैलजा शिंदे, कोळे पंचायत समिती गणाचे उमेदवार अर्जुन कराळे आणि विंग पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. नंदाताई यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते श्री दत्त मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. व्यासपीठावर उमेदवारांसह माजी आमदार आनंदराव पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, सचिन पाचपुते, पांडुरंग सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.   

यावेळी आ.डॉ. भोसले म्हणाले, की कोळे गावाची ओळख ही कायम भारतीय जनता पार्टीला आघाडी देणारे गाव म्हणून राहिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मजबूत विचारधारा इथे रुजलेली आहे. विंग जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या ५० वर्षांत जेवढा विकास निधी मिळाला नाही, तेवढा निधी भाजपा सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करुन देता आला, याचे मला समाधान आहे. केंद्रात पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप अशी ही तिन्ही ठिकाणी मजबूत साखळी निर्माण झाल्यास गावांचा विकास कुणीही थांबवू शकणार नाही. म्हणूनच आपापसातील मतभेद विसरुन, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचे उमेदवार प्रचंड मताधिक्यांनी निवडून आणावेत. 

माजी आमदार आनंदराव पाटील म्हणाले, आमदार झाल्यानंतर अतुलबाबांनी या मतदारसंघात विकासाचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. अतुलबाबा भोसले हे संपूर्ण जिल्ह्यात एक विश्वासाचे नेतृत्व बनले आहे. आता पुढचा टप्पा सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष, कराड पंचायत समितीवर भाजपचा सभापती आणि गटागणात भाजपचे सदस्य निवडून आणण्याचा आहे. हे साध्य करायचे असेल तर या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे.

श्रीरंग देसाई म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेबांचा आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर प्रचंड विश्वास असून, त्यांना भक्कम पाठबळ देण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना विजयी करा. 

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य हे आमदारांचे खरे विश्वस्त असतात. हे विश्वस्त जर भाजपचे असतील, तर आमदार अधिक ताकदीने मतदारसंघासाठी निधी आणू शकतात. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपच्या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन सचित पाचपुते यांनी केले. 

यावेळी उमेदवार सौ. शैलजा शिंदे, अर्जुन कराळे आणि सौ. नंदाताई यादव यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी घारेवाडी येथील गौरव घारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. 

सभेला जयवंत माने, विलास यादव, के. पी. यादव, मलकापूरचे नगरसेवक सुरज शेवाळे, आणे गावचे सरपंच किसन देसाई, सागर पाटील, सचिन देसाई, संजय तोडकर, विकास कदम, विनोद शिंगण, अमित माने, उमेश घारे, सुरेश घारे, धनाजी शिंदे, दादासाहेब कदम, मंगेश गरुड, सुनील पाटील, महादेव पाटील, उमेश खाडे, हेमंत पाटील यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

कराड शहरातील मार्केट यार्ड गेट नम्बर 1 ते बैलबाजार या रस्त्यावरील खड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता ; लवकरात लवकर हे खड्डे बुजवून घ्यावेत ; युवा नेते सतिश भोंगाळे यांची निवेदनाद्वारे मागणी ;

वेध माझा ऑनलाइन।
मार्केटयार्ड गेट नंबर १ पासून ते बैल बाजार रोड कराड शहर हद्दीपर्यंत रस्त्यावर खूप खड्डे पडलेले असून, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे, सदर रस्ता नवनिर्मिती प्रस्तावित आहे. तोपर्यंत या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवून होत असलेले अपघात टाळण्याबरोबर नागरिकांना होत असलला मनस्तापही टाळावा अशी विनंती त्याच परिसरातील युवा नेते व माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे खंदे समर्थक सतिश भोंगाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे

दरम्यान याठिकाणी असलेले खड्डे लवकरात लवकर बुजवुन घेण्यात येतील असे आश्वासन नगराध्यक्ष यादव यांनी यावेळी दिले केले याप्रसंगी युवा नेते राकेश शहा, संदीप मुंढेकर आदी उपस्थित होते.

सतिश भोंगाळे हे आमदार बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत त्यांनी नुकतीच झालेली शहराची नगरपरिषदेची निवडणूक लोकशाही आघाडीच्या माध्यमातून लढवली आहे लोकशाही आघाडी च्या माध्यमातून त्यांचे शहर व प्रभागात सामाजिक कार्य चालूच असते त्याचा कामाचा एक भाग म्हणून त्यांनी गेट नम्बर 1 ते बैल बाजार परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात यावेत आणि त्यानिमित्ताने त्याठिकाणी होणारे लहान मोठे अपघात टाळण्यास त्यामुळे मदत होणार आहे असे त्यांनी आज कराडच्या नगराध्यक्षाना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

Thursday, January 22, 2026

 कल्याण-डोंबिवली महापालिकेत  शिवसेना शिंदे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. शिवसेना शिंदे गट आणि मनसेच्या कल्याण-डोंबिवलीमधील युतीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही प्रतिक्रिया देणं टाळलं. दरम्यान कल्याण-डोंबिवलीतील राजकीय परिस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, सध्या मी दावोसमधील गुंतवणुकीवर लक्ष केंद्री केलं आहे. भारतात पुन्हा आल्यावर मुंबईत जे करार झालेत त्यासंदर्भात उत्तरं देतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. (Devendra Fadnavis On MNS Shivsena Shinde Group KDMC)

Continues below advertisement

महायुतीची सत्ता असलेल्या महापालिकांमध्ये महापौर कोण बसणार? (Devendra Fadnavis Municipal Corporation Election Result)
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसवरुन आज रात्री उशिरा मुंबईत दाखल होणार आहेत. मात्र, इकडे महापौर आरक्षण सोडत जरी निघाली असली तरी महायुतीची सत्ता असलेल्या महापालिकांमध्ये महापौर कोण बसणार?, यासंदर्भात अजूनही प्रश्न अनुत्तरीतच आहेत. अशात, मुंबईसोबतच, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, पुणे, नाशिक, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगरसारख्या प्रमुख  महापालिकांसंदर्भात महापौरपदाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

श्रीकांत शिंदे काय म्हणाले? (Shrikant Shinde On MNS Alliance)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे 53 नगरसेवक घेऊन आम्ही गट स्थापनेसाठी कोकण भवन येथे आलो होतो. इथे शिवसेनेला मनसेचे जे पाच नगरसेवक आहेत, त्यांनी पाठिंबा जाहीर केला. विकासाच्या मुद्द्यावरून विकासामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी मनसेने आम्हाला समर्थन दिलंय. भाजपाला देखील आम्ही वेगळं सोडलेलं नाही, महापौर कोण होईल याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेतील, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली.

Continues below advertisement

नरेश म्हस्केंच्या विधानाने खळबळ, नेमकं काय म्हणाले? (BMC Mayor 2026)
कल्याणप्रमाणे मुंबईतही मनसेची सोबत चालू शकते, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंनी केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हात सोडत मनसे नगरसेवक शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसलेत. त्यामुळे आता मुंबईतही मनसे तोच कित्ता गिरवणार का, याची उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. त्यातच आता राजकारणात काहीही होऊ शकतं असं सावध विधान करत मनसेच्या बाळा नांदगावकरांनी चर्चेला एकप्रकारे हवा दिली आहे. मुंबईत बहुमताचा 114 आकडा एकाही पक्षाला ओलांडता आलेला नाही. भाजप 89, शिवसेना शिंदे गट 29, उद्धव ठाकरेंचे 65 आणि मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. शिंदेंना सोबत घेऊन भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे. मात्र राज ठाकरेंच्या मनसेलाही सोबत घेत युती बेरजेचं राजकारण करणार की कोणती नवी खेळी करणार, हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:


संबंधित बातमी:
Municipal Corporation Reservation 2026: मुंबई, पुणेपासून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आरक्षण जाहीर; तुमचा महापौर कोण, संपूर्ण यादी

Continues below advertisement


About the author
मुकेश चव्हाण
एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
Published at : Fri, January 23,2026, 7:32 am (IST)
Tags :
MNS
Raj Thackeray
Shiv Sena
Maharashtra Politics
KDMC
DEVENDRA FADNAVIS
'Eknath Shinde
#uddhav Thackeray
Sponsored Links by Taboola
'ती अंथरूण ओले करते..' पत्नी ट्विंकल खन्ना रागावल्यावर नेमकं काय करते? अक्षय कुमार म्हणाला..
Discover
मुंबईत स्पोर्ट बाईकची चोरी करणाऱ्या टोळीला अटक, 18 लाख रुपयांच्या 9 बाईक जप्त 
Discover
Dhanyog Bracelet
जब मेहनत के बाद भी रास्ता नहीं दिखा
Read More
Skip
Maharashtra Live Blog Updates: महाड मारहाण प्रकरण, मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र महाड पोलिसा
Discover
माझ्याकडे 34 एकर जमीन, 10-20 लाख असे टाकेन, मला नोकरीची गरज नाही; इंदापूरचा अधिकारी बोल बोल बोल
Discover
जब मेहनत के बाद भी रास्ता नहीं दिखा
एक आम इंसान की कहानी, जिसने...अधिक पहा
Dhanyog Bracelet
|
Sponsored
Special Hearing Aid Trial in Matheran for Seniors!
Recommended by audiologist
hear.com
|
Sponsored
जब मेहनत के बाद भी पैसा नहीं रुकता
कमज़ोर किस्मत और पैसों की चिंता...अधिक पहा
Dhanyog Bracelet
|
Sponsored
डॉक्टर्ससुद्धा का लपवतात? शुगर लेव्हल कंट्रोल करणारी ही सीक्रेट मेथड सांगितली जात नाही.
मोफत आयुर्वेदिक डॉक्टरांचा...अधिक पहा
diabdex
|
Sponsored
About Us
Feedback
Careers
Advertise With Us
Sitemap
Disclaimer
Privacy Policy
Contact Us
ABP NEWS GROUP WEBSITES
ABP Network
ABP Live
ABP न्यूज़
ABP আনন্দ
ABP माझा
ABP અસ્મિતા
ABP Ganga
ABP ਸਾਂਝਾ
ABP நாடு
ABP దేశం
FOLLOW US
This website follows the DNPA Code of Ethics. Copyright@2026. All rights reserved.

लाईव्ह टीव्ही
शॉर्ट व्हिडीओ
व्हिडीओ
पॉडकास्ट
×
We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize

Tuesday, January 20, 2026

शिंदे गटाचा गेम होणार ? मुंबईत भाजपचा महापौर होणार?

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत बहुसंख्य महापालिकांत भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारुपला आला. परंतु कल्याण डोंबिवली, मुंबई, उल्हासनगर यासह जळगाव अशा काही महापालिकांत महायुतीचा महापौर होण्याची शक्यता आहे. परंतु या सर्व महानगरपालिकां पैकी मुंबईच्या महापौरपदाची सगळीकडे चर्चा रंगली आहे. इथे कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापौरपदावर कोण विराजमान होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातही शिंदे गटाकडून भाजपाला अडीच वर्षे महापौरपदाची मागणी केली जात असल्याचे सांगितले जात असल्यामुळे महापौरपदाच्या निवडीचा प्रश्न जास्तच अडचणीचा ठरल्याचे सांगितले जात आहे. परंतु आता भाजपाचे वरिष्ठ नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी केलेल्या विधानानंतर आता भाजपाच महापौर बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चंद्रकांत पाटील हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी एका वहिनीच्या पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील यांना मुंबईच्या महापौरपदाविषयी विचारण्यात आले. तसेच कोणत्या पक्षाचा महापौर असेल, असे विचारताच देवेंद्र फडणवीस जो-जो प्लॅन तयार करतात, तो यशस्वी होतोच. त्यांचा कोणताही प्लॅन अयशस्वी होत नाही. मुळात महापौरपदाविषयी चर्चा का चालू आहे, हेच मला समजत नाही. कारण भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्याचेही सरळ आणि स्पष्ट आहे, असे थेट विधान करत महापौर हा भाजपाचाच होऊ शकतो, असे संकेत दिले.

संवेदनशील समाज घडवण्यासाठी 'त्यांचे' पाऊल; कऱ्हाडला लैंगिक जाकरूकतेचा उपक्रम ः ट्रान्सजेंडरांनी जागृतीसाठी साधला विद्यार्थ्यांसह सामान्यांशी संवाद ;

वेध माझा ऑनलाइन।
 प्रत्येकाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्याचा मान सन्मान टिकला पाहिजे, यासाठी मुंबईच्या हमसफर ट्रस्ट आणि सातारा येथील पेहचान फौंडेशनतर्फे लैंगिक संवेदनशीलता विषयावर तीन वेगवेवगळ्या ठिकाणी कार्यशाळा संपन्न झाल्या. येथील शासकीय अभियांत्रकी महाविद्यालय व हॉटेल अमित येथे संपन्न झालेल्या कार्यशाळेत विशेष जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली. त्यात ट्रान्सजेंडरसहीत विविध वक्त्यांनी सहभाग घेवून विशेष मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमात प्रा. एस. के. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये जेन्डर सेन्सिटिविटीची जागरूकता चांगली झाली आहे. समाजात त्यांच्या बाबत गैरसमज आहेत. त्यांच्या एलजीबीटिक्यू समुदायातील  विद्यार्थी असेल तर समाजाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा असतो पण आपण त्यांना आत्मविश्वास द्यायला हवा आणि त्याची एनर्जी देशाच्या निर्मिती साठी वापरायला हवी. हा समुदाय नैसर्गिक आहे. त्यांना समाजाने सर्व क्षेत्रात स्वीकारायला हवे आणि त्यामुळे ते मुख्य प्रवाहात येतील. 

यावेळी कार्यशाळेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये लिंगभेद आणि लैंगिक ओळखीसह ट्रान्सजेंडर तसेच एलजीबीटीक्यू बद्दलचे गैरसमज दूर करून वैज्ञानिक विचार रुजवण्यावर भर देण्यात आला. हमसफर ट्रस्टच्या निलोफर मस्के आणि सुमी एम.के. यांनी समुदायाची ओळख करून दिली. त्यांच्या समोरील सामाजिक व कायदेशीर संघर्षांवर प्रकाश टाकला. यावेळी डॉ. एस.के. पाटील, प्रा. देशपांडे आणि विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. कृष्णा आळसुंदकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित वातावरणाचे महत्त्व अधोरेखित केले. पेहचान फाउंडेशनच्या याशी पाटील, अमोल साळुंखे आणि महाविद्यालयाच्या जिमखान्याने कार्यक्रमाचे  नेटके नियोजन केले. प्रश्नोत्तरांच्या तासातून विद्यार्थ्यांनी शंका विचारल्या. त्याचे निरसन करण्यात आले. हॉटेल अमित एक्झिक्यूटिव्ह आणि हॉटेल संगम येथेही उपक्रम झाला. त्यावेळी व्यावसायिक क्षेत्रात काम करणार्यांना त्याची माहिती सांगून त्यांच्या साठी जागृती अभियान राबवण्यात आले. हॉटेल अमित एक्झिक्यूटिव्ह येथील कर्मचाऱ्यांसाठी लैंगिक संवेदनशीलतेवर आधारित विशेष सत्राला व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. हॉटेल संगम येथे स्नेहभोजन झाले. यावेळी एक अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. ज्यामध्ये तृतीयपंथीयांचा स्वीकार केलेल्या पालकासोबत संवाद साधण्यात आला. या पालकांकडून इतर तृतीयपंथीयांच्या पालकांना आपल्या पाल्याला नाकारू नका, तर प्रेमाने स्वीकारा , असे आवाहन करण्यात आले. शहरात राबवण्यात आलेले हे उपक्रम केवळ तांत्रिक किंवा व्यावसायिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता, एक प्रगल्भ आणि संवेदनशील समाज घडवण्याच्या दिशेने पडलेले मोठे पाऊल ठरले आहेत, असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

Sunday, January 18, 2026

यशवन्त बँक बुडायची मी वाट बघतोय असे स्वतः शेखर चरेगावकर मला फोनवर म्हटले होते चरेगावकर यांनी थंड डोक्याने नियोजन करून बँक बुडवली असल्याचा ऍड निलेश जाधव यांचा खळबळजनक गौप्यस्फोट ; सर्वच संशयीतांना लवकरात लवकर अटक करावी ; मागणी


वेध माझा ऑनलाइन।
यशवन्त बँक बुडायची मी वाट बघतोय असे स्वतः शेखर चरेगावकर फोनवर मला म्हटले होते म्हणजेच त्यांनी ही बँक थंड डोक्याने नियोजन करून बुडवली असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट ऍड निलेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला आहे 

दरम्यान यशवंत बँकेमधील 112 कोटींच्या घोटाळ्यातील संशयीतांना वाचविण्यासाठी भाजपचा राज्यातील एक बडा नेता आणि जिल्ह्यातील आमदार वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे घोटळ्याच्या प्रकरणाची सखोल व निपक्षःपातीपणे चौकशी होवून त्यातली संशयीतांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी देखील यशवंत बँक ठेवीदार व कर्जदार संघटनतर्फे ॲड. निलेश जाधव यांनी काल पत्रकार परिषदेत केली. 
खोटी कागदपत्रे सादर करून शेखर चरेगावकर यांचे बंधू मुकुंद चरेगावकर यांनी कराडचे शासकीय विश्रामगृह चालवायला घेतले असल्याचाही गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला आहे

यशवंत बँकेतील घोटाळ्याप्रकरणात होत असलेल्या पोलीस तपासाच्या दिरंगाईबाबत एडवोकेट निलेश जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेतली. जाधव म्हणाले, अपहरातील प्रकरणातील ज्या संशयीतांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलेला नाही. त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करणे कर्मप्राप्त आहे मात्र पोलिसांकडून या प्रकरणात जाणून बुजून दिरंगाई केली जात आहे. यशवंत बँकेच्या घोटाळ्यातील ज्या संशयीतांना अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी. ज्यांनी अटकपूर्व जामिनसाठी अर्ज केलेला नाही त्यांना अटक केली जात नाही त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात सगळ्याच पातळीवर दबाव येत आहे. बँकेच्या दोन माजी अध्यक्षांना वाचविण्यासाठी भाजपचा राज्यातील एक बेडा नेता व जिल्ह्यातील एक विद्यमान आमदार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणातील राजकीय हस्तेक्षप स्पष्ट आहे. तो थांबावा, यासाठी अम्ही प्रयत्न करत आहोत. 

या घोटाळा प्रकरनातील ५० पैकी केवळ एकच अटक आहे. तोही माजी अध्यक्षांचा भाऊ आहे. अन्य संशयीत अद्यापही अटक नाहीत. त्यांना त्वरीत अटक करावी. या प्रकरणाचा तपास ईडी, पोलिस व उपनिंबधक अशा तीन स्तरावर सुरू आहे. ईडीच्या ३५ जणांना नोटीसा दिल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने एकास अटक केली आहे. तर १६२ कोटींच्या घोटळ्यातील ५० संशयीतांवर जबाबदारी निश्तीच करण्यासाठी उप निबंधक अपर्णा यादव यांनी नोटीसा बजावल्या आहेत. मात्र तरिही अद्याप या प्रकरनात गती आलेली नाही. केवळ कागदोपत्री खेळ सुरू आहे. 
यशवंत बँकेच्या घोटळ्याप्रकणी संशयीतांच्या गुन्ह्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबधाचे वित्ती संरक्षण अधिनियम कलमाची वाढ झाली आहे. त्यामुळे माजी अध्यक्षाचा भाऊ विठ्ठल कुलकर्णी यांना अटक झाली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. ठेवीदारांच्या संरक्षण कायद्या नुसार कारवाई होनार असल्यानेच उर्वरीत संशयीत फरार झाले आहेत. काहींनी अटकपुर्व जामीनासाठी कोल्हापूर खंडपीठात अर्ज केला आहे. त्या संशयीतांची सक्त वसुली संचनालय (ईडी) यांनी नोटीसा काढल्या आहेत. त्यांची मुंबई येथे चौकशी सुरु आहे, असेही अॅड. जाधव यांनी यावेळी सांगितले.

Friday, January 16, 2026

नगरसेविका सौ किशोरी अतुल शिंदे यांनी पालिकेच्या मिळणाऱ्या सर्व सुविधांचा केला त्याग ; त्यांचा हा निर्णय अनेक लोकप्रतिनिधींना प्रेरणा देणारा ठरणार ;

वेध माझा ऑनलाइन।
नगरसेविका म्हणून मिळणारे भत्ते, सुविधा व इतर सेवा स्वतः न स्वीकारता त्या थेट नगरपरिषदेच्या जनरल फंडात वर्ग करण्याची  विनंती करून कराडच्या नगरसेविका सौ किशोरी अतुल शिंदे यांनी जनसेवेला सर्वोच्च स्थान दिले आहे यांनी दाखवलेला आदर्श आजच्या राजकारणात दुर्मिळ आणि प्रेरणादायी आहे 
नगरसेविका सौ किशोरी शिंदे या भाजपच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून यावेळी निवडून आल्या आहेत भाजपचे युवा नेते अतुल शिंदे यांच्या त्या पत्नी आहेत 

भाजप नेते अतुल शिंदे हे आमदार डॉ अतुल भोसले व उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांचे निकटवर्तीय मानले जातात ते भाजप चे अधिकृत सदस्य आहेत... तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील त्यांनी शहरात काम पाहिले आहे... त्यांचे वडील नगरसेवक आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष म्हणून सर्वांना परिचित होते...त्यांच्या मातोश्री नगरसेविका म्हणून दोन वेळा निवडून आल्या होत्या... त्यांचे कराड दक्षिण व उत्तर मध्ये परिचित लोकांचे मोठे जाळे आहे... अतुल शिंदे यांनी आमदार भोसले यांच्या नुकत्याच झालेल्या आमदारकीवेळी महत्वाची भूमिका बजावत पहील्या फळीतील काम पाहीले आहे... आणि त्यांना आमदार होण्यासाठी शहरात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे...  
अनेक गणेश मंडळे तसेच सर्वच समाजातील सण उत्सवासाठी त्यांचे सर्वतोपरी सहकार्य नेहमीच असते... त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे...  त्यांची प्रतिमा आपला माणूस अशीच आहे... आणि म्हणूनच शहरातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा भाजप गोटात जोरदार सुरू होती...
दरम्यान यावेळी निवडून आलेल्या अतुल शिंदे यांच्या पत्नी नगरसेविका सौ किशोरी शिंदे हे नेतृत्व देखील सत्ता नव्हे तर सेवाभाव आणि लोकहिताच्या मूल्यांवर उभे राहिलेले नेतृत्व आहे त्यामुळे त्यांनी पालिकेचा भत्ता व सर्व सुविधांचा केलेला त्याग ही कृती केवळ निर्णय नसून, ती संस्कारांची, परंपरेची आणि निस्वार्थ सेवेची साक्ष आहे अशाही प्रतिक्रिया उमटत आहेत त्यांचा हा निर्णय अनेक लोकप्रतिनिधींना प्रेरणा देणारा ठरेल हे नक्की!

Thursday, January 15, 2026

कराडच्या उपनगराध्यक्षपदी पोपटराव साळुंखे...स्वीकृत म्हणून भाजपकडून सुहास जगताप,लोकशाहीकडून जयंत पाटील, तर यशवन्त आघाडी कडून नरेंद्र लिबे यांची निवड...वेध माझा ने व्यक्त केलेला अंदाजच परफेक्ट ; परफेक्ट बातमी म्हणजे वेध माझा हे झालं सिद्ध ;

वेध माझा ऑनलाइन।
आज कराड पालिकेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपकडून सुहास जगताप लोकशाही आघाडीकडून जयंत पाटील तसेच यशवन्त आघाडी च्या वतीने नरेंद्र लिबे यांची निवड झाल्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी जाहीर केले तर उपनगराध्यक्ष म्हणून पोपटराव साळुंखे यांची निवड करण्यात आली 
दरम्यान अशाच निवडी होतील असा अंदाज वेध माझा ने अगोदरच व्यक्त केला होता आणि निवडीही तशाच झाल्या याबद्दल वेध माझा चे शहरातून अभिनंदन होत आहे 

माजी नगरसेवक सुहास जगताप हे शहरातील भाजपचे युवा नेते म्हणून परिचित आहेत माजी आमदार डॉ अतुल भोसले यांचे ते निष्ठावन्त म्हणून ओळखले जातात कोणाला कसलीही अडचण असेल तर ते व त्यांचे कार्यकर्ते मदतीसाठी नेहमीच पुढे असतात ते मागील  टर्मला नगरसेवक म्हणून शहरात नगरसेवक म्हणून कार्यरत होते त्यांनी केलेले सामाजिक व पक्षाचे काम शहरात चर्चेत राहिले शहर अध्यक्ष म्हणून भाजपचे तेच दावेदार होते मात्र त्यांची ती संधी देखील मागीलवर्षी हुकली होती  एकूणच त्यांचा पालिकेतील कामकाजाचा आतापर्यंतचा अभ्यास, केलेले सामाजिक तसेच पक्षाचेही काम याचा विचार करून त्यांची भाजपने पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून यावेळी त्यांची निवड केली आहे 

लोकशाही पार्टीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील यांचे नाव यावेळी लोकशाही आघाडीकडून स्वीकृतसाठी चर्चेत होतेच त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने केलेले आतापर्यंतचे काम खूप मोठे आहे यावेळच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी घेतलेले  परिश्रम व 6 नगरसेवकावरून 13 वर ही नगरसेवक संख्या जाण्यासाठी केलेले प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत  यशवन्त आघाडी व लोकशाही आघाडी यांचे एकत्रीकरण करण्यामागे त्यांचे यशस्वी प्रयत्न कारणीभूत असल्याचेही सांगण्यात येत आहे जयंतकाका पाटील यांच्या नावाची कराड पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून आज निवड झाली

नरेंद्र लिबे हे राजेंद्रसिंह यादव आणि विजयसिंह यादव यांचे निष्ठावन्त म्हणून ओळखले जातात अनेक वर्षे त्यांनी यादव यांची पाठराखण करत यशवन्त आघाडीच्या वाढीसाठी मोठे प्रयत्न केले आहेत त्यांची आज स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली

पोपटराव साळुंखे हे गेली 30 वर्षे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून सर्वत्र परिचित आहेत...अडचणीच्या काळात त्यांच्याबरोबर कोण असेल... तर ते नाव म्हणजे पोपटराव साळुंखे... असेच नेहमी म्हटले जाते...
पोपटराव साळुंखे यांनी कायमच माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना कोणत्याही अपेक्षेशिवाय साथ दिली आहे... भले, भले अनेकजण आम्ही निष्ठावन्त आहोत असे म्हणत दुसऱ्या पार्टीच्या नेत्याच्या जवळ जाताना दिसतात...मात्र पोपटराव साळुंखे यांनी असल्या राजकारणाला कधीही महत्व दिले नाही... त्यामुळे पर्यायाने त्यांचा आदर नेहमीच सगळीकडेच राखला गेला...निष्ठावन्त असावा तर असा...असे त्यांचे नाव घेऊन आजही बोलले जाते...आज त्यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली


ठाकरे बंधूंसह पवारांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का…मुंबईत ठाकरे बंधू आणि पवार 70 च्या आत…मनसेलाही धक्का…पुणे पिंपरी चिंचवड आणि मुंबईत भाजपाची एकहाती सत्ता... एक्झिट पोल चा अंदाज ;

वेध माझा ऑनलाइन।
जनमत एक्झिटपोलच्या अंदाजानुसार, मुंबई महापालिकेत पवार आणि ठाकरे बंधुंच्या मिळून जागा 58 ते 65 च्या मध्ये येण्याची शक्यता  आहे.शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. 

शिवसेना ठाकरे गटाची सत्ता मुंबई महापालिकेवर राहिली आहे.शिवसेना शिंदे गट आणि भाजपा मिळून मुंबईमध्ये 138 जागा येण्याचा अंदाज एक्झिटपोलनुसार, येण्याची शक्यता आहे. म्हणजेच मुंबई महापालिकेवर थेट भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता येईल.भाजपा शिंदे गटाची  सत्ता पोलनुसार दाखवण्यात आली आहे.

मुंबई महानगर पालिका निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आज मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये आता महायुतीला बहुमत मिळणार असे म्हटले जात आहे. 
मुंबई महानगर पालिकेचे एक्झिट पोलमध्ये अनेक संस्थांनी भाजपा आणि शिवसेना महायुतीला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवला आहे. पोल ऑफ पोल, आणि जनमत एक्झिट पोलने आता मुंबई महानगर पालिकेत महायुतीला 138 जागा मिळण्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत आता भाजपाचा महापौर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सात दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण होणार, कृष्णा पुलावर लवकरच जाळी बसवण्यास सुरुवात होणार ; आमदार डॉ. अतुलबाबांची उपोषणस्थळावरून डायरेक्ट अकॅशन ; उपोषणकर्ते मनोज माळी यांनी मानले अतुलबाबांचे आभार ;

वेध माझा ऑनलाइन।
विजापूर राज्य मार्गावरील नवीन कृष्णा पुलावर आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुलावर संरक्षक जाळी बसविण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहे. या मागणीसाठी रक्षक प्रतिष्ठानचे मनोज माळी यांनी सुरु केलेल्या उपोषणाला बुधवारी (ता. १४) रात्री आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी भेट दिली. 

दरम्यान अतुलबाबा यांनी आज उपोषणस्थळी भेट दिली आणि त्याच ठिकाणाहून फोनाफोनी करून तिथूनच संबंधितांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याने उपोषणकर्त्यांनी तिथेच  अतुलबाबांचे आभारच मानले
यावेळी आ.डॉ. भोसले यांनी कृष्णा पुलावर संरक्षक जाळी बसविण्यासाठी शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करत, शासकीय अधिकाऱ्यांना या कामाचे गांभीर्य समजावून सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांना जाळी बसविण्याचे काम लवकरच सुरु करणार असल्याचे सांगितले. 

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आंदोलनकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी त्यांनी कृष्णा पुलावर संरक्षक जाळी बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे ४० लाखाचे अंदाजपत्रक तयार केले असून, या खर्चाला शासकीय स्तरावर तातडीने मंजुरी मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. तसेच या कामासाठी येणाऱ्या सात दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन, लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल, असेही आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्पष्ट केले. 
या निर्णयामुळे पुलावर होणाऱ्या अपघाती व दुर्दैवी घटनांना आळा बसण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

शाई पुसली जातेय ! निवडणूक आयोगानं सांगितल काय खरं काय खोट?

वेध माझा ऑनलाइन।
मतदान शाईच्या टिकाऊपणाबद्दल सध्या समाजात पसरलेल्या संभ्रमावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. अनेक राजकीय नेत्यांकडून शाई पुसली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, निवडणूक आयोगाने हीच शाई २०११ पासून सातत्याने वापरली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. 

आयोगाच्या मते, ही शाई कोरस कंपनीच्या मार्कर पेन स्वरूपात वापरली जाते आणि ती सुकल्यानंतर पुसली जात नाही. आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मतदानाची शाई टिकून असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

तसेच, दुबार मतदानाला प्रतिबंध घालण्यासाठी मतदान केंद्रांवर दोन ओळखपत्रांची मागणी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याने गैरप्रकारांना आळा बसत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगही स्वतः चौकशी करणार असून, शाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्यांना ‘फेक नरेटिव्ह’ म्हटले आहे.

निवडणूक निकलापूर्वीच,फडणवीस आणि ठाकरे बंधू आले आमने सामने;

वेध माझा ऑनलाइन।
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष सुरू आहे. विरोधकांकडून निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी प्रशासनावर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा ठाम दावा केला आहे. या आरोपानुसार, दुबार या मतदान प्रक्रियेतील मुद्द्यावर सरकारने सुरुवातीला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले होते, परंतु नंतर मुंबईमध्ये काही घोषणा करण्यात आल्या.
याशिवाय, आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाहीत, ज्यामुळे मतदारांनी दाबलेले बटण योग्य चिन्हावर गेले आहे की नाही हे तपासणे अशक्य होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. यावर पलटवार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना पराभवाची तयारी करत असल्याचा टोला लगावला आहे. ते म्हणाले की, विरोधकांची ही स्क्रिप्ट जुनी झाली आहे आणि त्यांना दिल्लीतून स्क्रिप्ट येते. विरोधकांनी यापूर्वी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही याच मुद्द्यांवर पराभव पत्करला आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. 

big breaking! निवडणूक आयुक्तांवर निलंबणाची कारवाई होणार ? उद्धव ठाकरे यांच्या आरोपानंतर निवडणूक आयुक्तांचे जाणार ?

वेध माझा ऑनलाइन
उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर राज्य निवडणूक आयुक्त असून थेट गंभीर आरोप करण्यात आली आहेत. मतदान याद्यांमध्ये मोठा घोळ असून शाई पुसली जात असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी करत थेट निवडणूक आयुक्तांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

नुकताच पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केली आहेत. सत्ताधारी पक्षाचे काम निवडणूक आयुक्त करत असल्याचे त्यांनी म्हटले. मतदानानंतर बोटावरील शाई निघून जात असल्ाचा आरोप केला जात आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून रश्मी ठाकरे यांनी बोटावरील शाई पुसली जात असल्याचा थेट व्हिडीओ दाखवला असून मोठी खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आयुक्तांवर कारवाई करावीच लागेल. त्यांचा स्टाफ रोज काय करतो. सरकारी पगार खात आहेत. त्यांच्या कार्यालयात राजकीय प्रतिनिधी ठेवावे लागेल. इतकी वर्ष पगार खाता. केलं काय. मी पूर्ण आयोगावर कारवाईची मागणी करतोय. त्यात महापालिका आयुक्त असतील किंवा आयुक्तालयाची माणसं असतील त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही लोकशाही मानत आहात.
देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक हारले आहेत, त्यामुळे या गोष्टी केल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी थेट म्हटले की, राज्याचे निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा. ते फुकटचा पगार घेत असल्याचा त्यांनी आरोप केला

 शाई पुसून मतदान करता येणार नाही-
शाई पुसून मतदान करता येणार नसल्याचे स्पष्ट शब्दात निवडणूक आयोगाने म्हटले आहे. शाई पुसली जात असल्याचा सातत्याने आरोप केला जात आहे. त्यावर स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.

भाजप मंत्री अतुल सावे यांचे वडील मयत असूनही त्यांचे नाव मतदार यादीत कायम; निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र निवडणुकीच्या वातावरणात मतदार याद्यांमधील त्रुटींवरून प्रश्न उपस्थित होत आहेत. परभणी येथे पैसे वाटपाचे आरोप झाल्याचे समोर आले आहे. याच संदर्भात, भाजप मंत्री अतुल सावे यांचे वडील मोरेश्वरजी दिनानाथ सावे हे मयत असूनही त्यांचे नाव मतदार यादीत कायम असल्याचे निदर्शनास आले आहे. नियमांनुसार, निधन झालेल्या व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळणे बंधनकारक आहे, मात्र या प्रकरणात ते वगळण्यात आलेले नाही. ही बाब निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न निर्माण करते.

एकीकडे मतदार यादीत त्रुटी दिसून येत असताना, दुसरीकडे नागरिक मतदानासाठी उत्साहात सहभागी होत आहेत. पुण्यामध्ये अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील मतदानासाठी हजेरी लावली. त्यांचे नाव पुणे मतदार यादीत असून, त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मयत व्यक्तीचे नाव मतदार यादीत असणे हा निवडणूक आयोगासमोरील एक गंभीर मुद्दा आहे, ज्यावर तातडीने लक्ष देऊन सुधारणा करणे आवश्यक आहे. अशा घटनांमुळे निवडणुकीतील पारदर्शकतेवर आणि निष्पक्षतेवर परिणाम होऊ शकतो.

पुण्यात संथगतीने मतदान,कोल्हापूरात सुपरफास्ट, मुंबईसह बाकी महानगरपालिकांमध्ये किती टक्के मतदान झाले?

वेध माझा ऑनलाइन।
पुण्यात संथगतीने मतदान,
कोल्हापूरात सुपरफास्ट, 
मुंबईसह बाकी महानगरपालिकांमध्ये 11.30 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले?

बृहन्मुंबई महानगरपालिका : 17.58 टक्के
पुणे - 10.50 टक्के
नवी मुंबई-  15 टक्के  
कोल्हापूर :  22.45 टक्के
इचलकरंजी - 18.57 टक्के
पिंपरी चिंचवड - 16.03 टक्के 
संभाजीनगर  -  16 ते 17 टक्के 
नाशिक - 14.31 टक्के 
सांगली मिरज कुपवाड महापालिका -  17.20 टक्के
सोलापूर :  18.08 टक्के
अहिल्यानगर  : 20.16 टक्के 
जळगाव शहर : 13.39 टक्के
धुळे  : 14.23 टक्के 
नागपूर : 12 टक्के
पनवेल  : 17 टक्के
मालेगाव - 20.92 टक्के
जालना - 20.13 टक्के
अमरावती - 17.02 टक्के

शाई पुसली गेल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे राज ठाकरेंनी व्यक्त केली चिंता ; सतर्क रहाण्याचे केले आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज ठाकरे यांनी मतदान प्रक्रियेतील अनेक कथित अनियमिततांवर तीव्र आक्षेप घेतले आहेत. त्यांनी नवीन मतदान शाईच्या पेनाबद्दल चिंता व्यक्त केली, ज्याची शाई सॅनिटायझरने पुसली जात असल्याचा आरोप आहे. ठाकरे यांनी व्हीव्हीपॅटच्या वापरातील पारदर्शकतेचा अभाव आणि पाडू नावाचे नवीन यंत्र मतमोजणीसाठी वापरले जाणार असल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे यंत्र कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवण्यात आले नसून, त्याचा उद्देश विरोधी पक्षांना निवडणूक लढण्यापासून रोखणे हा असल्याचा दावा त्यांनी केला. दुबार मतदानाच्या घटना आणि उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वाढवून दिलेल्या कालावधीचा पैशांच्या वाटपासाठी गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज ठाकरे यांनी नागरिकांना, शिवसैनिकांना आणि महाराष्ट्र सैनिकांना या सर्व घडामोडींवर सतर्क राहण्याचे आवाहन केले.

Wednesday, January 14, 2026

मतदान झाल्यानंतर बोटांची शाई पुसली गेली ; काँग्रेसची प्रतिक्रिया काय? ;

 
वेध माझा ऑनलाइन।
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी नुकताच एक व्हिडिओ समोर आणला आहे, ज्यामध्ये मतदानानंतर बोटाला लावलेली शाई कशाप्रकारे पुसली जाऊ शकते हे दाखवण्यात आले आहे. त्यांच्या या व्हिडिओने मतदानाच्या शाईच्या टिकाऊपणाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या व्हिडिओमध्ये एका विशिष्ट द्रवाचा वापर करून बोटावरची शाई अगदी सहजपणे आणि पूर्णपणे पुसली जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

या संदर्भात, राज ठाकरे यांनी पूर्वी नेलपॉलिश रिमूव्हरनेही ही शाई काढता येऊ शकते असे सूचित केले होते, आणि सचिन सावंत यांच्या व्हिडिओने या दाव्याला पुष्टी मिळते असे म्हटले जात आहे. या घटनेची तुलना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकत्याच केलेल्या विधानाशी केली जात आहे, ज्यात त्यांनी “माझ्या बोटावर देखील शाई लावलेली आहे, ती कुठे जातेय? ती तशीच आहे” असे म्हटले होते. मात्र, सचिन सावंत यांच्या व्हिडिओने फडणवीस यांच्या या दाव्याच्या अगदी उलट चित्र समोर आणले आहे. प्रभादेवी येथे देखील शाई पुसली गेल्याचे संदर्भ यात देण्यात आले आहेत. सचिन सावंत यांनी दाखवलेला हा डेमो मतदारांच्या मनात मतदान शाईच्या विश्वासार्हतेबद्दल नवीन चर्चांना सुरुवात करेल अशी शक्यता आहे.

नागपूर महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला ; काय म्हणाले फडणवीस ?

वेध माझा ऑनलाइन
नागपूर महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला प्रभाग क्रमांक 11 चे भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. प्रभागातील काँग्रेस उमेदवार आणि त्याच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भूषण शिंगणे यांची भेट घेऊन विचारपूस केली आहे. शिंगणेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “या कुठल्याही दहशतीला आमचा पक्ष घाबरणार नाही. यासंदर्भात आधी इंटिमेशन दिल्यानंतरही पोलिसांनी योग्य कारवाई केली, असं सर्वांचं मत आहे. त्याचीही चौकशी करणार. तक्रार दिल्यानंतरही ज्या गंभीरतेनं या घटनेकडे बघायला पाहिजे होतं, तसं बघितलं गेलं नाही. मी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे, त्यामुळे कुठलाही गुन्हेगार त्यातून सुटणार नाही.”

“नागपुरात काँग्रेसने गुंडांना तिकिट दिलंय. काँग्रेसच्या अशाच एका गुंडाकडून शिंगणेंवर हल्ला करण्यात आला आहे. मुळात दहशत निर्माण करण्याची यांची क्षमताच राहिली नाही. कोणी केलं तर पोलीस त्यांना ठोकून काढतील. कोणत्याच प्रकारची दहशत खपवून घेतली जाणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी दुबार मतदारांच्या आरोपांवर फडणवीस पुढे म्हणाले, “दुबार मतदार शोधण्याचं काम इलेक्शन कमिशनने करेल. आत बसलेल्या एजंटने त्यावर आक्षेप घ्यायला हवा. कोणी दुबार मतदान केलं तर आम्हीही त्यावर आक्षेप घेऊ. पण हे मारामारी करणारे कोण आहेत. मतदान कमी झालं पाहिजे, याकरिता केलेला हा प्रयत्न आहे

मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याच्या धक्कादायक प्रकार ; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?


वेध माझा ऑनलाइन
महानगरपालिका निवडणूक जाहिर झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून सातत्याने निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे. आज सकाळ पासून सुरु असलेल्या मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यंदा मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटावर शाईऐवजी मार्करने खूण केली जात आहे. पण ही मार्करने केली जाणारी खूण पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आई आणि पत्नीसोबत नागपूरमध्ये मतदान करण्यासाठी गेले आहेत. तेथे मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना बोटावर लावली जाणारी शाई नसून मार्कर आहे आणि ते पुसले जात आहे याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, असं आहे की, पहिल्यांदा तर या सर्व गोष्टी निवडणूक आयोग ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरण्यात आले आहे. तथापी जर कोणाचा काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाने या संदर्भात लक्ष द्यावे. मात्र, मला असं वाटतय काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करुन निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करत आहेत हे मात्र स्पष्ट दिसत आहे असे म्हटले आहे.
रक्षक प्रतिष्ठान चे सातारा जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी 

गणेश नाईक यांचं मतदार यादीत नावच नाही,

वेध माझा ऑनलाइन।
नवी मुंबईमधून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे, ज्यात आमदार गणेश नाईक यांना स्वतःचे नाव मतदार यादीत नसल्याचा अनुभव आला. नाईक मतदान करण्यासाठी गेले असता, मतदार यादीमध्ये त्यांचे नावच नव्हते. विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवली गेल्याची माहितीही उघड झाली आहे. या परिस्थितीमुळे मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गणेश नाईक यांनी सांगितले की, ते सामान्यतः नवी मुंबई महापालिकेच्या शाळा क्रमांक ९४ मध्ये मतदान करतात. परंतु, यावेळी त्यांना सेंट मेरी शाळेत मतदान केंद्र असल्याचे सांगण्यात आले. तिथे गेल्यावर त्यांना रूम नंबर ९ सापडला नाही आणि नंतर रूम नंबर ९ जरी असला तरी यादीत त्यांचे नाव नव्हते. यानंतर ते पुन्हा सेंट मेरी शाळेत जाण्यासाठी निघाले. आमदार आणि राज्याचे मंत्री असूनही आपल्यासोबत असा प्रकार घडत असेल, तर सामान्य मतदारांचे काय होणार, असा प्रश्न नाईकांनी उपस्थित केला आहे. हे नियोजन व्यवस्थित नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असे त्यांनी म्हटले आहे. एकाच इमारतीत राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे तीन वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवली गेली आहेत, ज्यामुळे मतदानातील त्रुटींवर प्रकाश पडला आहे

Tuesday, January 13, 2026

कराड पालिकेचा कारभार आता लवकरच सुरू होणार आहे पालिकेच्या विशेष समित्या तसेच इतर पदभार लवकरच दिले जातील मात्र तोपर्यंत शहरात झालेल्या पालिकेतील निवडणुकीत पराभूत झालेले म्हणजेच निवडणुकीत पडलेले... तसेच निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे देखील नव्हते... अशांचा  वावर पालिकेत सध्या वाढला आहे... त्याचे कारण काय?...अशी चर्चा गावात नेहमी असते...तसेच जे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत अशा काहींच्या घरचे लोक  नातेवाईक मुले पती असे लोक देखील पालिकेत दिसू लागले आहेत... त्यांचीही लुडबुड पालिकेत दिसते... प्रशासन या लोकांच्या लुडबुडीने वैतागले आहे..? त्यामुळे पालिकेचे रेग्युलर व सुरळीत काम सुरू होण्यासाठी या असल्या लोकांचा बंदोबस्त त्यांच्या नेतृत्वाने अगोदर करावा अशी मागणी कराडकर जनतेतून होत आहे...


प्रचार संपताच रिक्षेत सापडले 50 लाख ; अपक्ष उमेदवाराने पकडून दिली रोकड ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची सांगता झाली असून आता उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येईल. मात्र, प्रचार पत्रके वाटण्यास मनाई आहे.

एकीकडे प्रचाराची सांगता झाली असताना, दुसरीकडे लक्ष्मीदर्शन होत असल्याचे दिसून येते. दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीत मतदारांना पैशाची पाकिटे पाठवण्यात आल्याचं उघडकीस आलं होत. आता, एका बॅगेत मोठी रोकड आढळून आली आहे.
उल्हासनगरमध्ये भरारी पथकाने 50 लाख रुपयांची रोकड पकडली असून अपक्ष उमेदवाराने ही रक्कम पकडून दिली आहे. त्यामुळे, नेमकं कुणासाठी एवढा पैसा जात होता, याचा तपास आयोगाकडून सुरू आहे.
अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी दुचाकीवर पाठलाग करुन ही रोकड पकडली असून या रकमेची चौकशी केली जात आहे.
उल्हासनगर येथील सुभाष टेकडी चौकात अपक्ष उमदेवारासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा पकडली, या रिक्षात ही बॅग होती. त्यामुळे, रिक्षा चालक आणि रोकड असलेली बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
उल्हासनगर मनपा निवडणुकीत भाजपच्या प्रदीप रामचंदानी यांच्या कार्यालयातून रक्कम बाहेर आल्याचा आरोप नरेश गायकवाड यांनी केला आहे.
बॅगेतील नोटा मोजण्यासाठी उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये नोटा मोजायचे मशीन आणण्यात आल्या आहेत. पोलिसांनी बंद रुममध्ये पंचनामा करत नोटा मोजण्याचे काम सुरू केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्याशी संबंधित डिझाईन बॉक्सच्या पुणे कार्यालयावर क्राईम ब्रांचची कारवाई ; आज इकडे प्रचार संपला आणि तिकडे कारवाई झाली ; सर्वत्र एकच खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून येत्या 16 जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. त्याआधी आता प्रचाराची सांगता झाली असून प्रचारादरम्यान अनेक नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसले. विशेष म्हणजे सध्या महायुती म्हणून सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीका केली. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने हे दोन्ही नेते समोरासमोर आलेले पाहायला मिळाले. दरम्यान, आता प्रचाराची सांगता झालेली असताना आणि मतदान अवघ्या दोन दिवसांवर आलेले असताना अजित पवार यांनी एका प्रकारे मोठा धक्का बसला आहे. अजितदादांचे राजकीय सल्लागार असलेल्या नरेश अरोरा यांच्या कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या  माहितीनुसार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्याशी संबंधित डिझाईन बॉक्सच्या पुणे कार्यालयावर क्राईम ब्रांचने कारवाई केली आहे. क्राईम ब्रांचच्या पथकाकडून पुणे येथील डिझाईन बॉक्स ऑफिसमध्ये कागदपत्रांची तपासणी व चौकशी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. ही कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही पोलिसांनी दिलेली नाही. परंतु पोलीस तपास करत आहेत.

अदानी समुहाच्या वाढत्या विस्तारासाठी भाजपला जबाबदार धरत राज ठाकरेंचा लाव रे तो व्हीडिओ ; भाजपने राज ठाकरे आणि अदानी यांची झालेल्या भेटीचा फोटोच दाखवला ;

वेध माझा ऑनलाइन।
मुंबईतील सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकार फक्त अदानींवरच मेहरबान का असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी 2014 पासूनचे अदानींचे वाढते उद्योग दाखवत मुंबईकरांना जागं होण्याचं आवाहन केलं. तसेच अदानी समुहाचा वाढता विस्ताराबाबत काही व्हिडीओही राज ठाकरेंनी सभेत दाखवले. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं. गौतम अदानी यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या दरम्यानचा फोटो भाजपकडून शेअर करण्यात आला. या फोटोमध्ये गौतम अदानींसह राज ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेही होत्या. हा फोटो राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानमधील होता. आता भाजपने शेअर केलेल्या या फोटोवर राज ठाकरेंनीही ठाण्यातील कालच्या सभेतून उत्तर दिलं आहे. 
मी अदानींवर टीका केल्यानंतर काही जणांना खूप मिरच्या झोंबल्या. माझा आणि अदानींचा फोटो भाजपकडून दाखवला जातोय. दोन वर्षांआधीचा वैगरे हा फोटो असेल. अदानी माझ्या घरी येऊन गेले होते. घरी आल्यावर मी काय हाकलून देऊ का?, माझ्या घरी गौतम अदानीही येऊन गेले, माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेले, अंबानी, आनंद महिंद्राही येऊन गेले. म्हणून काय त्यांची पापं झाकायची का मी?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट येईल, ज्यावेळी मुंबई-ठाणे यांसारख्या आमच्या शहरांवर संकट येईल. राज ठाकरे दोस्ती वगैरे बघणार नाही, असं राज ठाकरेंनी ठणकावले. एक विमानतळ आणि एक पोर्टसोडून अदाणींचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव आणि मोदींचं नाव याच्या जोरावर हा माणूस देशभर पसरत गेलाय, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. 


अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये म्हणाले... माझ्या सभेला परवानगी मिळू नये म्हणून पोलिसांवर दबाव आणला गेला ;

वेध माझा ऑनलाइन।
सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसांठी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होईल. दरम्यान आता प्रचार संपलेला असून सगळ्यांचे लक्ष मतदानाकडे लागले आहे. आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी मोठ्या सभांचा धडाका लावला होता. विशेष म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एकमेकांवर नेतेमंडळी सडकून टीका करताना दिसले. या सर्व महापालिकांच्या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडची महानगरपालिका निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या दोन्ही महापालिका जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण ताकद लावली असून आकर्षक आश्वासनं दिली आहेत. प्रचारादरम्यान अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर टीकादेखील केली आहे. असे असतानाच आता अजित पवार यांनी खळबळजनक विधान केले आहे. 

अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी माझ्या सभेला परवानगी मिळू नये म्हणून पोलिसांवर दबाव आणला गेला, असा दावा अजित पवार यांनी केला. आज पहाटे पाच वाजता माझ्या सभेला परवानगी दिली. माझ्या सभेला परवानगी मिळू नये म्हणून पोलिसांवर दबाव आणण्यात आला, असे म्हणत यांच्या काकाने अशी परवानगी दिली होती का? असा संतापजनक सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. 

कराड दक्षिणेतील ५२ गावांमधील ६.५० कोटींच्या विकासकामांना मंजुरी ; आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश; कोयना भूकंप पुनर्वसन समितीमार्फत निधी ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड दक्षिणमधील तब्बल ५२ गावांमधील विविध विकासकामांसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे, ६.५० कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमार्फत हा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीतील ५० टक्के रक्कमेचा धनादेश सातारा जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला असून, लवकरच या विकासकामांना प्रारंभ केला जाणार आहे. 

कोयना भूकंपप्रवण क्षेत्रातील नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमार्फत, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ५२ विविध विकासकामांना एकूण ६ कोटी ५० लाख रुपयांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचे अध्यक्ष ना. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले हे या समितीचे विश्वस्त असून, त्यांनी सूचित केलेल्या ५२ गावांमध्ये रस्ते सुधारणा, स्मशानभूमी संरक्षण भिंती, मंदिर परिसर विकास, शाळा खोल्या, समाजमंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पाणीपुरवठा व अंतर्गत रस्ते अशा बहुविध स्वरूपाच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. 

यामध्ये शेरे येथील स्मशानभूमीस संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), आटके येथील भैरवनाथ मंदिरास सभामंडप बांधणे (१५ लाख), रेठरे बुद्रुक पवार मळी येथे स्मशानभूमीस घाट बांधणे (२० लाख), रेठरे खुर्द येथील महादेव मंदिरास सभामंडप बांधणे (१५ लाख),  कापील येथे पाचवड वस्ती - सावंत मळा – पाळसकर वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे (१० लाख), कोडोली येथील आरोग्य उपकेंद्रास संरक्षण भिंत बांधणे (२० लाख), गोळेश्वर येथे अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (९.९७ लाख), दुशेरे येथे अंतर्गत रस्ता सुधारणा करणे (१० लाख), बेलवडे बुद्रुक येथे धनगर समाजासाठी सामाजिक सभागृह बांधणे (१० लाख), वाठार येथील जिल्हा परिषद शाळेत सभागृह बांधणे (२० लाख), काले येथे अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (९.९६ लाख), नांदगाव येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), कुसुर येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), पोतले येथील स्मशानभूमी रस्ता, संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), वनवासमाची येथील पाटील वस्तीमध्ये ओढ्याकाठी संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), चचेगाव येथील स्मशानभूमी दुरुस्त करणे (१० लाख), गोटे येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (८.८२ लाख), कोयना वसाहतीतील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), धोंडेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र संरक्षण भिंत बांधणे (१० लाख), चौगुले मळा येथील जिल्हा परिषद शाळेला संरक्षित भिंत बांधणे (१० लाख), सवादे येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), साळशिरंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नवीन खोली बांधणे (१४.९९ लाख), म्हासोली येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), सैदापूर येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), वहागाव येथील स्वामी समर्थ मंदिरासमोर सभामंडप बांधणे (१४.९७ लाख), शेणोली येथील ओढ्यावर संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), संजयनगर (शेरे) येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), जुळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा नवीन खोली बांधकाम करणे (१५ लाख), खुबी येथील सिद्धनाथ मंदिर सभामंडप बांधणे (२५ लाख), गोंदी येथील नवीन गावठाण येथे बंदीस्त गटर करणे (१५ लाख), कार्वे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोली बांधणे (१५ लाख), कासारशिरंबे येथील तालिमच्यावर नवीन व्यायामशाळा बांधणे (१० लाख), ओंड येथील निनाई ओढ्यावर निनाई मंदिरानजीक साकव पूल बांधणे (४८.३० लाख), किरपे येथील स्मशानभूमी रस्ता, संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), कोळे येथील दत्त मंदिर ओढ्याकाठी संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), येरवळे येथील स्मशानभूमीस संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), विंग येथे खंडोबा मंदिर परिसर संरक्षक भिंत बांधणे (१४.९९ लाख), वारुंजी येथील सतीआई मंदिर ते मारुती मंदिरापर्यंत संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), ओंडोशी येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), मनव येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), येणपे येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), तुळसण येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (८.९७ लाख), खोडशी येथे महादेव मंदिर परिसर  संरक्षण भिंत बांधणे (१० लाख), टाळगाव येथील ग्रामपंचायत सभागृह बांधणे (१० लाख), मालखेड येथील स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे (१५ लाख), लटकेवाडी रस्ते सुधारणा (५ लाख), शेवाळवाडी पाटीलवाडी (म्हासोली) येथील स्मशानभूमी दुरुस्त करणे (१० लाख), येणके येथील वांग नदी ते जिल्हा परिषद शाळा संरक्षक भिंत बांधणे (१५ लाख), नारायणवाडी येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (८.९० लाख), येवती येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (१० लाख), जिंती येथे नवीन व्यायाम शाळा इमारत बांधणे (१० लाख), गोटेवाडी येथील  नळपाणी पुरवठा योजना सुधारणा करणे (१५ लाख) अशी विकासकामे केली जाणार आहेत.  

कोयना भूकंपप्रवण क्षेत्रातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने हा निधी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, या विकासकामांमुळे ग्रामीण भागातील दळणवळण, सार्वजनिक सुविधा व सामाजिक सोयीसुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहेत. विशेषतः अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अंतर्गत रस्ते व संरक्षण भिंतींच्या कामांना यामुळे गती मिळणार आहे.