वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रपतींचे भाषण, बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षा आणि माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना जाहीर झालेला पद्मभूषण पुरस्कार यांवरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. बांगलादेशप्रश्नी लष्करी कारवाईची मागणी करत त्यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणावरूनही गृहखात्याला धारेवर धरले.
राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून जगाला शांततेचा संदेश दिला असला, तरी सध्या खुद्द आपल्याच देशात आणि सीमेवर अशांतता व अस्थिरतेचे वातावरण आहे. शेजारील बांगलादेशात दररोज हिंदूंच्या नरसंहाराच्या बातम्या येत आहेत, तिथे कालच दोन हिंदूंना जिवंत जाळण्यात आले. अशा भीषण परिस्थितीत केवळ शांततेचे आवाहन करून हे हत्याकांड थांबणार आहे का? जर शांतता प्रस्थापित करायची असेल, तर केवळ उपदेश करून उपयोग नाही; त्यासाठी इंदिरा गांधींनी दाखवले होते तसे धाडस दाखवून लष्करी कारवाई करण्याची गरज आहे, अशा कडक शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींचे भाषण, बांगलादेशातील हिंदूंची स्थिती, भगतसिंग कोश्यारी यांचा सन्मान आणि राज्यातील ड्रग्ज प्रकरणावर सडकून टीका केली.
No comments:
Post a Comment