वेध माझा ऑनलाइन।
मतदान शाईच्या टिकाऊपणाबद्दल सध्या समाजात पसरलेल्या संभ्रमावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. अनेक राजकीय नेत्यांकडून शाई पुसली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, निवडणूक आयोगाने हीच शाई २०११ पासून सातत्याने वापरली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
आयोगाच्या मते, ही शाई कोरस कंपनीच्या मार्कर पेन स्वरूपात वापरली जाते आणि ती सुकल्यानंतर पुसली जात नाही. आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मतदानाची शाई टिकून असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच, दुबार मतदानाला प्रतिबंध घालण्यासाठी मतदान केंद्रांवर दोन ओळखपत्रांची मागणी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याने गैरप्रकारांना आळा बसत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगही स्वतः चौकशी करणार असून, शाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्यांना ‘फेक नरेटिव्ह’ म्हटले आहे.
No comments:
Post a Comment