Saturday, April 11, 2020

मुख्याधिकारी डांगे घाणेरडे राजकारण करीत आहेत - नगराध्यक्षा सौ. रोहिणीताई शिंदे यांचा घणाघात

(अजिंक्य गोवेकर)
कराड
येथील नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे यांनीच गावात चालू असणारी औषध फवारणी बंद केल्याची आवई त्यांच्या विरोधकांनी उठवली असतानाच सौ.शिंदे यांनी  c o च्या मर्जीतील कोणाला तरी या फवारणीचे क्रेडिट मिळावे म्हणून माझ्या नावावर खापर फोडून इतर कोणाचा या बाबतीत फायदा करून देण्याचे घाणेरडे राजकारण मुख्याधिकारी डांगे यांनी यानिमित्ताने केल्याचे नगराध्यक्षांनी आपल्या दिलेल्या निवेदनातून सुचवले आहे.म्हणजेच मुख्याधिकारी  डांगे यांच्या शहरातून चालू असलेल्या राजकीय  हस्तक्षेपाच्या भानगडी अजून संपत नाहीत असच या वरून दिसतय.जो व्यक्ती स्वतः ला कसलाही अधिकार नसताना शहरातून अत्यावश्यक वस्तुंनादेखील बंद करून आपल्याला वाटत म्हणून लॉक डाऊन करायला पुढे होतो, आपल्याला वाटलं म्हणून अतिक्रमण मोहीम शहरातील लोकांना,व्यापाऱ्यांना नुकसान होईल अशी राबवतो. नगराध्यक्षाना कसलाही अधिकार नसताना अपात्र करण्याची नोटीस पाठवतो, या मानसिकतेला काय म्हणायचे हाच प्रश्न आहे.जो अधिकारच आपल्याला नाही तो आहे असे धडधडीत सांगून त्याच्या आड वाटलं ते करायचे,इतरांना काहीही सांगायचे,कोणावर काहीही आरोप करायचे हे असले धंदे जेव्हापासून पालीकेत चालू झालेत तेव्हापासून शहराचा विकास बॉम्बल्याचे चित्र आहे.स्वच्छतेत बक्षीस मिळाले ते ही कराडकरांच्या प्रयत्नाने,आणि क्रेडिट घेतायत हे सी ओ अशी परिस्थिती असताना शहराचे उपनगराध्यक्ष म्हटले होते,या सी ओ ने शहराचे वाटोळे केले,आमच्या पार्टीचा इस्कोट केला म्हणजे जे खांद्याला खांदा देऊन काम करत होते तेच आता यांच्या नावाने बोम्बलतायत हेच यांच्या कामाचे सर्टिफिकेट म्हणायचे.उपाध्यक्ष असेही म्हटले होते,की सी ओ शहराच्या राजकारणात हस्तक्षेप करतात तो इतका की पार्टी कोण चालवतय तेच मला कळना झालंय...आणि आत्ताच्या नगराध्यक्षांच्या फवारणी प्रकरणात हेच दिसून येतंय....
नगराध्यक्षांनी निवेदनात असे म्हटले आहे की, कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मी कोणत्याही प्रसिद्धी शिवाय पहिल्यापासून कार्यरत असल्याचे सम्पूर्ण शहराला माहीत आहे. 27 मार्च च्या शासनाच्या परिपत्रकानुसार औषध फवारणी अग्निशामक दलाच्या मोठ्या गाड्यातून करायची आहे असे असताना त्या गाड्या बंद ठेऊन ट्रेकटर मधून ही फवारणी चालू आहे आणि ती कोणाच्या तरी फायद्यासाठी सुरू आहे.
मी माझे काम करत असताना शहरातील फवारणी,स्वच्छता, विलीगिकर्ण कक्ष बनवणे अशी कामे वर्तमान पत्रातून पसिद्धी न देता केली आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बोलून शहराची काळजी शक्य तितकी घेण्याचा प्रयत्न केला आहे.हे शहरच माझं कुटुंब आहे असे मी मानते त्यामुळे माझे काम हे गट,तट न पाहता सुरू असते.
शासनाच्या 14 व्या वित्त आयोगाच्या आदेशानुसार कोरोना आजाराविषयी काम करण्यासाठी सी ओ ना 10 लाखा पर्यंत कामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत.त्यामधून त्यांनी कामे करूनही घेतली,आणि एक कागद माझ्या कडे पाठवून त्यावर मी सही केली नाही मग माझ्या मुळे ही फवारणी थांबली अशी खोटी बतावणी करायला सुरुवात केली.कोणाचा तरी फायदा  म्हणजेच कोणाला तरी क्रेडिट मिळवून देण्यासाठी हे असलं घाणेरडे राजकारण डांगे करत असल्याचा आरोपही नगराध्यक्ष यांनी आपल्या निवेदनातून केला आहे.मात्र कराड माझं कुटुंब आहे.असले किती अधिकारी येतील आणि जातीलही  मात्र, मी माझ्या शहराची अविरत सेवा आणि काळजी घेतच राहणार आहे कारण ते माझं कर्तव्यच आहे असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.


No comments:

Post a Comment