अजिंक्य गोवेकर
कराड
लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू असताना नियमांची पायमल्ली करत वाधवान कुटुंबियांनी मुंबई, खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. जिल्हाबंदीचे आदेश मोडून वाधवान यांनी सातार्यात प्रवेश केल्याने पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच महाबळेश्वरातील एका खाजगी शाळेत त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र आता वाधवान बंधूंचा क्वारंटाइन काळ संपल्याने आता पुढे काय असा अनेकांना प्रश्न होता. यापार्श्वभुमीवर वाधवान बंधूंना ५ मे पर्यंन्त सातारा जिल्हा न सोड्ण्याचा आदेश CBI न्यायालयाने दिले आहेत.
सातारा जिल्हा सोडण्याआधी वाधवान यांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची परवानगी घ्यावी लागणार अाहे. ३ मे पर्यन्तचा लाॅकडाऊन संपल्यावर CBI कडून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे समजत आहे. आज वाधवाना प्रकरणावरही गृहमंत्री देशमुख यांनी फेसबुकच्या माध्यमातून भाष्य केले. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या फार मोठ्या चुकीमुळे वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिली. त्या वाधवान कुटुंबाचा आज दुपारी २ वाजता क्वारंटाइनची वेळ संपतेय. त्यामुळे पोलीस खात्याकडून ईडी आणि सीबीआय यांना पत्र लिहून कळवलं आहे. आज दुपारी २ नंतर वाधवान कुटुंबाला ताब्यात घ्यावं. सीबीआयचे अधिकारी जो पर्यंत वाधवान कुटुंबाला ताब्यात घेत नाही तोपर्यंत ते आमच्या ताब्यात असतील अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment