मूबंई
राज्यात वीकेंड लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला आहे. चार ऑगस्टपासून नवी नियमावली लागू होणार आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यात सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजेपर्यंत सर्वप्रकारचीं दुकाने सुरु राहणार आहेत. दरम्यान अधिक रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये नियम जैसे थे ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. इतर जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत दुकान उघडली जातील तर रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील मात्र रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहिल.
नवी नियमावली...
शॉपिंग मॉलसह सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत, तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु राहतील. रविवारी दुकाने, मॉल बंद राहतील.
सर्व सार्वजनिक उद्याने आणि मैदाने व्यायामाच्या उद्देशाने खुली ठेवता येणार.
सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवता येणार आहेत. मात्र शक्य असेल्यास वर्क फ्रॉम होम सुरु ठेवावं.
सर्व कृषी उपक्रम, बांधकामे, औद्योगिक कामे, माल वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु करता येणार आहे.
व्यायामशाळा, योग केंद्रे, हेअर कटिंग सलून, ब्युटी पार्लर, स्पा सुरु 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार. मात्र एसीचा वापर करता येणार नाही. रविवारी ही सेवा बंद राहणार.
सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स (स्वतंत्र आणि मॉलच्या आतील) पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार.
राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
राज्य शिक्षण विभागाचे आदेश शाळा आणि महाविद्यालयांसाठी लागू राहतील.
No comments:
Post a Comment