शरद पवारांनी स्वतःला पदमविभूषण मिळाल्यानंतर स्व यशवन्तराव चव्हाण साहेबांना मरणोत्तर भारतरत्न मिळावे असे पवारांना का वाटले नाही ? त्यांनी याबाबतची मागणी कधीच का केली नाही ? त्यांनी आयुष्यभर चव्हाणांचा मानसपुत्र असल्याचे सांगत चव्हाण साहेबांच्या नावावर जोगवा मागत राजकारण केलं असा पलटवार श्री छ उदयनराजे यांनी आज केला
यशवन्तराव चव्हाण याना मरणोत्तर भारत रत्न द्या अशी उदयनराजे यांनी मागणी केली आहे त्यावर निवडणुकीच्या काळातच राजेंना हे का सुचलं... असा आरोप विरोधकांनी केला होता त्यावर उत्तर देताना उदयनराजे यांनी आज पलटवार करत प्रत्युत्तर दिले
त्यांचा निवडणुकीचा संकल्पनामा आज कराडच्या स्व चव्हाण साहेबांच्या समधीस्थळी प्रसिद्ध करण्यात आला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते
राजे म्हणाले...उद्या पंतप्रधान मोदींसमोर आम्ही स्व चव्हाण साहेबांना मरणोत्तर भारतरत्न मिळावे अशी मागणी करणार आहोत...
पवार साहेबांना 18 लाख लोकांच्यातून एक स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार मिळाला नाही त्यांनी भ्रष्टाचारी उमेदवार याठिकाणी उभा केला आहे हे दुर्दैवच म्हणावं लागेल
यावेळी बावनकुळे यांनी उदयनराजे राज्यात सर्वात मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असे विधान केले
उद्याच्या होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले
No comments:
Post a Comment