शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांना दहशतवाद्यांची उपमा दिली आहे. त्यावर आता या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठी मुलांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सरकार आता कोणाला आतंकवादी बोलायचं शिल्लक राहिलेलं नाही. जे सरकार विरोधात बोलतात त्यांना सरकार दहशतवादी म्हणतं. काल ही तरुण मुलं ही ग्रामीण भागातील मुलं होती. देशभरातून आलेली मुलं होती. शिक्षणासाठी लढणारी मुलं होती. त्यांना तुम्ही आतंकवादी म्हणत असाल तर तुम्ही फक्त देशभक्त. तुमचा भाजप फक्त देशभक्त दिसतो. बाकी सगळे लोक दहशतवादी वाटतात” अशा शब्दात या मुलांनी संताप व्यक्त केला. सदाभाऊ खोत यांना सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. देशद्रोही म्हणणं म्हणजे त्या आमदाराची लायकी नाही. त्यांना रस्त्यात पकडून जाब विचारला पाहिजे. मत घेताना लाज वाटली नाही का? असा सवाल या मुलाने विचारला.
No comments:
Post a Comment