वेध माझा ऑनलाईन।
लोकसभेत महिला आरक्षण सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. विशेषतः विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मिश्किल टिप्पणी करत सभागृहातील वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर लगेचच विधेयकातील तांत्रिक त्रुटींवरून केंद्र सरकारवर बोचरी टीकाही केली. या चर्चेत महिलांचे महत्त्व, कौटुंबिक संस्कार आणि राजकीय आरक्षणातील जातनिहाय वाटा हे मुद्दे केंद्रस्थानी राहिले.
विधेयकावर बोलताना राहुल गांधी यांनी महिलांच्या प्रभावाचा उल्लेख केला आणि हसत हसत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी केली. “मलाही पत्नी नाही आणि पंतप्रधानांनाही नाही,” असे विधान त्यांनी करताच सभागृहात एकच हस्यकल्लोळ उडाला.
राहुल गांधींनी आपली बहीण प्रियांका गांधी हिच्या संसदेतील प्रभावी भाषणाचे जाहीर कौतुक केले. प्रियांकाने अवघ्या पाच मिनिटांत जे साध्य केले, ते आपल्याला २० वर्षांत जमले नाही, असे म्हणत त्यांनी दाद दिली. त्यांच्या या कौतुकामुळे गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक खासदारांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. आपल्या आजी इंदिरा गांधी यांच्याकडून मिळालेल्या सत्याच्या आणि निर्भीडपणाच्या शिकवणीचा उल्लेख करत त्यांनी राजकीय जीवनातील संघर्षावर भाष्य केले.
भाषणाच्या उत्तरार्धात राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत हे विधेयक म्हणजे महिला सक्षमीकरण नसून ‘निवडणूक नकाशा’ बदलण्याचा कट असल्याचा आरोप केला. हे विधेयक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि विशेषतः इतर मागासवर्गीय समुदायांच्या हक्कांवर गदा आणणारे असल्याचे त्यांनी म्हटले. ओबीसी महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद नसल्यामुळे हे विधेयक अपूर्ण असल्याची टीका त्यांनी केली
No comments:
Post a Comment