वेध माझा ऑनलाईन
आयपीएल 2026 मधील 20 व्या साखळी सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन दिग्गज संघ आमने-सामने आहेत. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून, सामन्याच्या सुरुवातीला एक अत्यंत भावूक क्षण पाहायला मिळाला.
आशा ताईंच्या स्मृतीप्रित्यर्थ आजच्या सामन्यात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडू आशा भोसले यांना श्रद्धांजली म्हणून हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. तर सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू, पंच आणि उपस्थित प्रेक्षकांनी एक मिनिटाचे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहिली. मौन पाळल्यानंतर संपूर्ण स्टेडियममधील चाहत्यांनी टाळ्या वाजवून या महान गायिकेच्या योगदानाचे स्मरण केले.
No comments:
Post a Comment