सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि औंध संस्थानाच्या पंतप्रतिनिधी गायत्रीदेवी या भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांच्या या पवित्र्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. औंध परिसरातील विकासकामांना गती देण्यासाठी गायत्रीदेवींनी भाजपचा झेंडा हाती घ्यावा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. गायत्रीदेवी या खटाव तालुक्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
No comments:
Post a Comment