Sunday, February 28, 2021

195 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

सातारा दि. 1 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 195 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 4, मंगळवार पेठ 1, सदरबझार 1, यादोगोपाळ पेठ 2, गोडोली 1, संभाजीनगर 1, शाहुनगर 1, तामाजाईनगर 1,मोरगिरी 2, लिंब 1, एमआयडीसी सातारा 2, देगाव 2, आसनगाव 2, तासगाव 1, पिलाणीवाडी 7,

*कराड तालुक्यातील* शनिवार पेठ 1,घारेवाडी 11, येरावळे 1, उंब्रज 1, कोरेगाव 1, विद्यानगर 2,   
*फलटण तालुक्यातील*  स्वामी विवेकानंद नगर 1, कोळकी 1,  पवारवाडी 1, तरडगाव 2, 
*खटाव तालुक्यातील* पुसेगाव 1, औंध 4, वर्धनगड 1,  विसापूर 1,  ऐकुळ 1, वडूज 5, येरळवाडी 1,  
*माण तालुक्यातील* सोकासन 1, मासाळवाडी 1, म्हसवड 4, हिंगणी 2, पळशी 16, मार्डी 7, राणंद 2, बीदाल 2, दहिवडी 23, गणेश पेठ माण 4,  वडगाव 1, कुळकजाई 1, 
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 3, रहिमतपूर 1, शिरढोण 1, भाखरवाडी 1,  आझादपूर 1, जळगाव 1, कुमठे 1,
*खंडाळा तालुक्यातील* अहिरे 2,  आसवली 1,  कारंडवाडी 2, लोणंद 2, खंडाळा 2,  पारगाव 3, जावळे 1, शिरवळ 4, कवठे 1,
*जावली तालुक्यातील* आखेगणी 1, तापोळा 1, मेढा 1,
*वाई तालुक्यातील* जांभ 1, शिरगाव 1, अमृतवाडी 2, मेणवली 1, डेरेवाडी 1, परतवडी 1,
* इतर*2, सर्कलवाडी 1, निंबोडी गावठाण 2, पाडेगाव 8,
*इतर जिल्हा* 
*2 बाधिताचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथे गुरुवार पेठ सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, हारणी ता. पुरंदर जि. पुणे येथील 60 वर्षीय पुरुषाचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 *एकूण नमुने -348248*
*एकूण बाधित -58994*  
*घरी सोडण्यात आलेले -55715*  
*मृत्यू -1855* 
*उपचारार्थ रुग्ण-1424* 

0000

अपहरणप्रकरणी शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा...


 सातारा जिल्ह्यात बँक निवडणुकीसाठीच्या ठरवानंतर डॉ. नानासाहेब शिंदे यांच्या अपहरणाचा तपास करत असतानाच पोलिसांसमोर आणखी दोघांच्या अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. पानवन (ता. माण) येथील दोघांच्या अपहरणप्रकरणी शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा म्हसवड पोलिसांत नोंद झाला आहे. अपहरण का व कशासाठी करण्यात आले याचा तपास पोलीस करत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पानवन (ता. माण) येथील धनाजी आबाजी शिंदे व त्यांचे मित्र छुब चव्हाण हे गुरुवार (दि. 25) पासून रविवार (दि. 28) पर्यंत गायब होते. या दोघाना शेखर भगवान गोरे, राजेंद्र उर्फ राजू ब्रम्हदेव जाधव, संग्राम अनिल शेटे, दत्ता घाडगे, राहुल अर्जुन गोरे, वीरकुमार पोपटलाल गांधी व गाडीवरील चालक हरिदास गायकवाड यांनी त्यांच्या ईनोवा गाडी (क्र. एमएच 11 – 7057) मधून जबरदसतीने बसवून कुळकजाई येथील फार्म हाऊस तसेच ठाणे येथील लॉजवर थांबवून ठेवले होते.याबाबत धनाजी आबाजी शिंदे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह वरील सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास म्हसवड पोलीस करत आहेत.

संवेदनशील आणि रोखठोक नेते जयवंतराव पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...

कराड शहराचे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे.गोरगरीब जनतेचा आधारस्तंभ म्हणून ओळख असणाऱ्या या नेत्यांचे त्याच्या वाढदिनी शहरातील जनतेने भरभरून अभिनंदन केले आहे... 

अभ्यासू व शहराच्या प्रश्नांची जाण असणारे उपनगराध्यक्ष म्हणून जयवंतदादा परिचित आहेत. अनेकवेळा रोखठोक व स्पष्टपणे मते मांडून आपल्या कामाचा आवाका दाखवत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्याचे अनेकानी पाहिले आहे. शहराच्या प्रश्नाबाबत चर्चेत भाग घेऊन उगाचच स्टंट करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. योग्य विषयावर  चर्चा घडवून आणण्यात ते नेहमी अग्रेसर असतात. वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळो न मिळो, दररोज पालिकेत हजर राहून लोकांची कामे करताना ते नेहमीच दिसतात..त्यांनी उपनगराध्यक्ष म्हणन कारकीर्द चोख बजावली आहे. येथील नगरपालिकेतून उचलबांगडी झालेले  वादग्रस्त मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या अनेक भानगडी लोकांसमोर आणत त्यांनी प्रशासनाचा चेहरा वेळोवेळी उघडा पाडला आहे आणि वेळप्रसंगी शहराच्या हितासाठी स्वतः वाईटपणा स्वीकारला आहे. डांगे यांचे कारनामे शहरासाठी कसे व किती घातक आहेत यावर ते वारंवार रोखठोक बोललेही आहेत. शहराच्या प्रश्नांवर भरभरून बोलणारे व प्रशासनाला धारेवर धरणारे जयवंतदादा वेळप्रसंगी आपल्या आघाडीलादेखील घरचा आहेर देत योग्य बाजू घेऊन मग ती विरोधकांची का असेना त्या बाजूने बोलताना अनेक प्रसंगातून दिसले आहेत आता तर विविध कारणाने आघाडीत बिघडी झाल्याची चर्चा असल्याने आघाडीशी पुन्हा जुळवून घेण्याच्या मानसिकतेत जयवंतदादा दिसत नाहीत अशीही त्यांची सडेतोड भूमिका त्यांनी मांडली आहे.विचाराने वागणारे आणि तत्वांची जपणूक करणारे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. राजकारण म्हटलं की... लोकांचा राजकारण्यांकडे बघण्याचा वेगळा ड्रीष्टिकोन असतो मात्र जयवन्तदादासारख्या नेत्यांची संवेदनशीलतेचा आणि माणुसकी याची जनतेतून नेहमीच कदर होत असते. कारण त्यांनाही जनतेच्या भावनांची कदर नेहमीच असते. लॉक डाऊन काळात दादांनी दोन हजार कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप कोणतीही जाहिरातबाजी न करता केलं आहे.लोकांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी दादा नेहमीच सतर्क व सज्ज असतात.शहराचे जबाबदार नेतृत्व म्हणून त्यामुळेच तर त्यांची ओळख निर्माण झाली आहे. अतिक्रमण मोहिमेत व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानास मुख्याधिकारी डांगे हेच जबाबदार आहेत असे ठामपणे सांगत धडधडीतपणे त्यांनी व्यापाऱ्यांची बाजू घेतल्याचे सर्वांनीच पाहिले आहे.जो अडचणीत असेल त्याच्या बाजूने दादा नेहमीच उभे राहिले आहेत आणि याच कारणाने दादांना आपल म्हणणारा माणूस त्यांच्यापासून कधीच लांब गेलेला पाहायला मिळत नाही हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. जनतेचे नेते असलेल्या रोखठोक दादांचा आज वाढदिवस साजरा होत आहे त्यांना खुप खुप शुभेच्छा...

आज 17 जणांना दिला डिस्चार्ज ; 177 जण नवीन बाधित

सातारा दि.28 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 17  नागरिकांना घरी सोडण्यात आले असून जिल्हा रुग्णालयातील 10 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

दरम्यान आज 177 नवीन बाधित सापडल्याचे रिपोर्ट्स आले आहेत...
त्याबाबतची सविस्तर बातमी उद्या.....

*एकूण नमुने - 347389*
*एकूण बाधित - 58816*  
*घरी सोडण्यात आलेले -55715*  
*मृत्यू- 1853* 
*उपचारार्थ रुग्ण- 1248*

119 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

सातारा दि. 28 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 119 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा  3, शहरातील  सिव्हील 2, राधिका रोड 1, सदरबझार 2, गोडोली 1, परतवडी 1, गोवे लिंब 1, खिंडवाडी 1, शाहूनगर 2, धसकॉलनी 5, देगाव 1, तासगाव 1, 
   
*कराड तालुक्यातील* कराड शहरातील  शनिवार पेठ 1,

*फलटण तालुक्यातील*  पाडेगाव 1,  लक्ष्मीनगर 1, जाधववाडी 1, तरडगाव 2, खराडेवाडी 1, साखरवाडी 1, कापडगाव 1, भडकमकरनगर 2,

*खटाव तालुक्यातील*     हिवरवाडी 1, एनकुळ 1, मायणी 1, जायागाव 1,  पुसेगाव 4, बुध 1, म्हासूर्णे 1,

*माण तालुक्यातील*  कुकुडवाड 1, दहिवडी 10,  गोंदवले खुर्द 1, गोंदवले बु. 3, धामणी 1, आंधळी 1,  नरवणे 10, म्हसवड 1, एकले 1, पळशी 1, 

*कोरेगाव तालुक्यातील*  वाठार 1, रुई 1, कोरेगाव 3, जळगाव 1, दुघी 2, अपशिंगे 2, साप 1, वेलंग 1,

*खंडाळा तालुक्यातील*  आदर्शनगर लोणंद 1, पिंपरे 3, पळशी 2, कवठे 1, शिरवळ 2, वडगाव 1, गुठळे 1, 

*महाबळेश्वर तालुक्यातील*   हॉटेल सनी 1, दांडेघर 3, नाटोशी 1, 

*जावली तालुक्यातील*  सावळी 1, तांबी 2, रामवाडी 1, 

*पाटण तालुक्यातील*  मोरगिरी 1, 

*वाई तालुक्यातील*   मुगाव 1, अमृतवाडी 1,
इतर -2
*इतर जिल्हा* वाखरी- पंढपूर 1, सारोळा- पुरंदर 1.

*एका बाधिताचा मृत्यु*
          जिल्ह्यातील कोविड हॉस्पीटलमध्ये उडतारे ता. वाई येथील 79  वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 *एकूण नमुने -347389*
*एकूण बाधित - 58816*  
*घरी सोडण्यात आलेले -55698*  
*मृत्यू- 1853* 
*उपचारार्थ रुग्ण- 1265* 
000

Saturday, February 27, 2021

नगरसेवक विनायक पावसकरांची राजेंद्रसिह यादव याच्यावर जोरदार टीका... मी काहितरी करतोय असे दाखवण्याचा केवळ त्यांचा स्टंट असल्याचा केला आरोप...

कराड
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मागील निवडणुकीप्रमाणे फटका बसू नये म्हणून पालिका सभेत गोंधळ घालून मी काहीतरी करतोय असे दाखवत ते केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करीत आहेत अशी टीका नगरसेवक विनायक पावसकर यांनी जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांचे नाव न घेता आयोजित पत्रकार परिषदेत केली.

शुक्रवारी बजेट ची सभा पार पडली त्यात भाजपा नगरसेवकांवर जनशक्तीने टीका केली होती त्याचे उत्तर देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे नगरसेवक फारुक पटवेकर,नगरसेविका विद्या पावसकर अंजली कुंभार आदि उपस्थित होते

पावसकर पुढे म्हणाले, जनशक्तीचे बहुमत आहे,सगळ्या समित्या त्यांच्याकडे आहेत,स्टँडिंगमध्ये त्यांचेच लोक अधिक आहेत आमच्या एकच सदस्य म्हणजे नगराध्यक्षा त्यामध्ये आहेत लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील ही त्यामध्ये आहेत असे असताना चार बैठका झाल्या त्यात काही चर्चा झाली नाही आणि बजेटमधील विषयांना संमती देण्यात आली त्यावेळी जनशक्तीने बदल सुचवणे किंवा उपसूचना मांडणे कायद्याने गरजेचे होते ते त्यांनी केले नाही  आणि बजेट च्या सभेत त्यांनी गोधळ घालत उपसूचना मांडली हा कुठला प्रकार...? आणि ती उपसूचना एका कागदाच्या चिंटूर्यावर  लिहून देणे योग्य आहे का...? असा सवाल ही पावसकर यांनी केला.जे विषय बजेट मध्ये घेता येत नाहीत ते घ्या असा दंगा या लोकांनी केला हे अयोग्य आहे.यावरून तुमचा अभ्यास कळतो.प्रीतिसंगम बाग,टाऊन हॉल साठी आलेल्या निधीपैकी किती निधी खर्च झाला? तो योग्य पद्धतीने झाला का? असा सवालही पावसकर यांनी यावेळी केला.मागील अडीच तीन वर्षे कोण किती पालिकेत हजर होते हे सर्वांनाच माहीत असल्याचा टोलाही पावसकर यांनी लगावला.
 प्रश्नांची उत्तरे देण्याबाबतीत आम्ही अन्सरेबल नाही असे गटनेते राजेंद्र यादव बजेटच्या सभेत म्हणाले होते त्यावर बोलताना पावसकर म्हणाले असे असेल तर सगळ्या समितीची सभापती पदे तुमच्याकडेच आहेत, तुम्हीच उत्तरे द्यायची असतात आणि तुम्हाला गावच्या प्रश्नावर उत्तरे दयायची नसतील तर सभापती पदे सोडा... मग आम्हीं बघतो काय करायचं ते...
 पृथ्वीराज चव्हाण आजही पालिकेला फ़ंडिंग करतील मात्र जनशक्तीला ते चालेल का? असा सवाल करत फारूक पटवेकर म्हणाले मागेही पृथ्वीराज चव्हाणांनी भरभरून निधी दिला मात्र त्यांचे नाव जाणूनबुजून बाजूला राहील अशी व्यवस्था केली गेली.
यावेळी नगराध्यक्षा सौ शिंदे यांनीही नगरसेंवक राजेंद्र यादव व गुंड्याभाऊ वाटेगावकर सौरभ पाटील यांच्यावर टीका केली.
बजेटच्या सभेवेळी गटनेते सौरभ पाटील यांनी आमदार आणि पालकमंत्री यांचेकडे पालिकेकडून निधी का मागितला गेला नाही असा सवाल केला होता त्याचे उत्तर देताना नगराध्यक्षा म्हणाल्या,राज्यात भाजप ची आत्ता असताना आम्ही तुम्हाला कधी बोलावले नाही तर आम्ही स्वतः शहरातील कामांसाठी पाठपुरावा केला त्यासाठी  मुंबईला खूपवेळा आम्ही गेलो पालकमंत्र्यांचे पुतणे आत्ता जागे झालेत का.? वास्तविक त्यानी स्वतः शहरासाठी निधी आणायला हवा होता असेही त्या म्हणाल्या.

नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांच्या सतर्कतेचे शहरातून होतंय कौतुक...

कराड
शहराच्या नगराध्यक्षा कार्यसम्राट तर आहेतच मात्र त्यांची एक सतर्कता ही आता लोकांसमोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना सापडलेली एक पर्स त्यांनी सुखरूप संबंधित महिलेला परत करत त्या महिलेचे आशीर्वाद घेत वाहवाह मिळवली आहे.त्या पर्समध्ये सुमारे सव्वादोन लाखाचा ऐवज होता.

दोन दिवसांपूर्वी पालिकेतील बजेट पार पडल्यानंतर कराडच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे या कामाचा शीण घालवण्यासाठी सहज फेरफटका मारण्यासाठी म्हणून येथील घाटावर गेल्या होत्या तिथून परत येताना उपजिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर त्यांना एक पर्स पडल्याचे निदर्शनास आले त्याचवेळी एकजण ती पर्स उचलून पळण्याच्या नादात असतानाच नगराध्यक्षानी त्यांचे स्वीयं सहायक आशिष रैनाक याना ती पर्स घेण्यास सांगितले त्या पर्समध्ये मोबाईल फोन होता त्या नंबर वर त्या पर्स हरवलेल्या संबंधित महिलेचा पर्स साठी फोन आल्यावर अध्यक्षांनी त्यांना पालिकेत बोलावून त्यांची पर्स त्या महिलेला परत केली त्या पर्समध्ये सोन्याची चेन अंगठी मोबाईल फोन रुद्राक्ष असा सुमारे सव्वादोन लाखाचा ऐवज होता पर्स परत मिळाल्याने संबंधित महिलेला अश्रू अनावर झाले त्या महिलेने अध्यक्ष सौ शिंदे यांना आशीर्वाद दिले
सौ शिंदे या कराडच्या ऍक्टिव्ह नगराध्यक्षा म्हणून सम्पूर्ण राज्यात परिचित आहेत त्यांच्या कामाचा धडाका वाखाणण्याजोगा असतो त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल नेहमीच चर्चा होत असते त्याच बरोबर या घटनेमुळे आता त्यांच्या या सतर्कतेचेही कौतुक संपूर्ण शहरातून होत आहे.

98 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज ; 117 जण सापडले नवे रुग्ण...

ललसातारा दि.27 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 98  नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 494 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
494  जणांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्हा  रुग्णालय सातारा येथील 40, कराड येथील 130, कोरेगाव येथील 22, वाई येथील 27, खंडाळा येथील 10, रायगाव येथील 35, पानमळेवाडी येथील 52, महाबळेश्वर येथील 15, दहिवडी येथील 55, म्हसवड येथील 39, व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 39 असे एकुण 494 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
दरम्यान 117 नवे रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असल्याचे रिपोर्ट्स आले आहेत
याबाबतची सविस्तर बातमी उद्या...
--------------------------------------------
*एकूण नमुने - 345788*
*एकूण बाधित - 58686*  
*घरी सोडण्यात आलेले -55698*  
*मृत्यू- 1852* 
*उपचारार्थ रुग्ण- 1136*

182 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

सातारा दि. 26 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 182 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा  4, शहरातील प्रतापगंज पेठ 2,  सदरबझार 3, रांगोळी कॉलनी 1,  विक्रांतनगर 1, शाहूपूरी 1, संभाजीनगर 1, एमआयडीसी 2, मोळाचा ओढा 1, आशा भवन 1, खावली 4,  लिंब गोवे 1, साबळेवाडी 1, नेले 1,  मजरे पिलानी 2, 
   
*कराड तालुक्यातील* कराड 2, शहरातील  कोयना वसाहत 1, रुक्मीणी गार्डन 1, शिरगाव 1, इंदोली 4, वहागाव 1, घारेवाडी 3, बेलवडे बु. 1, 

*फलटण तालुक्यातील* फलटण 2,    शहरातील सोमवार पेठ 1, आर्यमान हॉटेलजवळ 1,  पाडेगाव 1, 

*खटाव तालुक्यातील*    विसापूर 1, खातगुण 1, बुध 1, पुसेगाव 1, वडूज 2, जायगाव 1, कलेढोण 1, औंध 1, नडवळ 1, डिस्कळ 6,

*माण तालुक्यातील*  वरकुटे मलवडी 1, दहिवडी 18, मोगराळे 1, वडगाव 1, गोंदवले खुर्द 1, धामणी 1, मार्डी 2, पळशी 1, 

*कोरेगाव तालुक्यातील*  वाठार स्टेशन 2, गुजरवाडी 1, वाठारकिरोली 7, रहिमतपूर 9, धामणेर 1, नेहरवाडी 1, बेलेवाडी 1, सुर्ली 1, सासुर्वे 1, कुमठे 1, कोरेगाव 3, सातारा रोड 1, रुई 1, त्रिपूटी 1, दहिगाव 1, धुमाळवाडी 1, किन्हई 2,   देऊर 1, 

*खंडाळा तालुक्यातील*    लोणंद 5, शिरवळ 4, कर्णवाडी 1, भादे 1, गुठळे 1, धावडवाडी 1, समता आश्रमशाळा 12, खंडाळा 3, हरळी 1, आरतगाव 1, केसुर्ली फाटा 1, 

*महाबळेश्वर तालुक्यातील*   मुनवर हौसिंग सोसायटी 1, हॉटेल सनी 2, पाचगणी 3, महाबळेश्वर 1, 

*जावली तालुक्यातील*   कुडाळ 3, रामवाडी 1, करंदी 2, आरडे 1

*वाई तालुक्यातील*    बोरगाव 2, बावधन नाका 1, अमृतवाडी  1,
इतर -8
*इतर जिल्हा* इचलकरंजी 1, बोईसर, पालघर 1, 

*एका बाधिताचा मृत्यु*
          क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथे दहिवडी ता. माण येथील 83  वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 *एकूण नमुने - 345788 *
*एकूण बाधित - 58686*  
*घरी सोडण्यात आलेले -55600*  
*मृत्यू- 1852* 
*उपचारार्थ रुग्ण- 1234* 
 
0000

Friday, February 26, 2021

कराड पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत गटनेते सौरभ पाटील यानी विचारले काही प्रश्न... ; मात्र,ते सोडवण्यासाठी पालिकेचे सत्ताधारी कोण आहेत..? हा पेच अगोदर सुटलाच पाहिजे...

            
अजिंक्य गोवेकर / कराड

येथील पालिकेचे शिलकी अंदाजपत्रक नुकतेच  सादर करण्यात आले.यावेळी लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील यांनी योग्य व मुद्देसूद चर्चा घडवून व सत्ताधार्यांना शहराच्या ड्रीष्टीने महत्वाचे प्रश्न विचारून,आपल्या प्रगल्भतेचं दर्शन देत आपली शहराबद्दलची विकासात्मक कळकळही दाखवून दिली .त्यानी जे कोणी सत्ताधारी आहेत ते कसे चुकलेत हे दाखवतच ही सगळी चर्चा केली. मात्र,सत्ताधारी कोण आहे ? हा राजकीय मुद्दा त्यावेळी अचानकपणे बाहेर आला आणि याच मुद्यावर विषय सूचना वाचण्यावरून सभेमध्ये बाचाबाची, हमरीतुमरी झालेली पहायला मिळाली.. सौरभ पाटील यांनी शहरासाठी मांडलेले प्रश्न मात्र त्यामुळे बाजूला पडले.एकूणच या चर्चेच्या माध्यमातून शहराच्या आर्थिक प्रगतीच्या आलेखाला आणखी उंच आखण्याची संधी असतानाही यावेळी सभागृहातील झालेला गदारोळ  दुर्दैवी ठरला...

दोन दिवसांपूर्वी पालिकेचे शिलकी अंदाजपत्रक सादर झाले. सभेच्या प्रारंभी नगरसेवक सुहास जगताप यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. त्यावर भाष्य करत लोकशाही चे गटनेते सौरभ पाटील यांनी हे अंदाजपत्रक सपशेल अपयशी असल्याचे सांगत या मधून शहराच्या आर्थिक नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे निदर्शनास आणून दिले डोळ्यात अंजन घालणारे भाष्य करीत पालिकेचे सत्ताधाऱ्यांकडून झालेले आत्तापर्यंत चे नुकसान त्यांनी उदाहरणासाहित दाखवून देत पालिकेचा उत्पन्नाचा भाग कसा उभा राहू शकला असता... किंबहुना कसा तो पुन्हा उभा राहू शकतो... याचे यथायोग्य विवरण केले.मात्र त्यांच्या प्रश्नावलीची उत्तरे देण्याची जबाबदारी सत्ताधारी म्हणून कोणी घेतलेली पहायला मिळाली नाही... कारण सत्ताधारी कोण ? यावरून जनशक्ती व भाजपा यांच्यात त्यानंतर जी हमरीतुमरी झाली ती पालिकेच्या इतिहासात नोंद व्हावी अशीच झाली आणि पालिकेच्या अर्थकारणाबाबतचा विचार तिथेच थांबलेला दिसला.
 दरम्यान सभागृहात आपले मत मांडताना  सौरभ पाटील म्हणाले, यावेळचे अंदाजपत्रक होप्लेस आहे .त्यातून काही होप्स दिसत नाहीत.नवीन प्रकल्प आणि उत्पन्नाच्या बाजू यामधून दिसणे गरजेचे होते तेही यामध्ये अजिबात दिसत नाही.होल्डिंग्स चे भाडे गेली दोन वर्षे पालिकेला मिळाले नाही ज्यांनी भाडे थकवले त्यांच्यावर कारवाई नाही हा काय प्रकार आहे...? तसेच करमणूक कर पालिकेने दोन वर्षांपासून वसूल केलेला नाही हेही नुकसान शहराचे नाही का...? पालिकेच्या शहरातील मोकळ्या जागा आहेत त्यापासून पालिकेला काहीच उत्पन्न येत नाही.त्यातून उत्पन्न यावे याचे काही आजतागायत प्रयोजन पालिकेकडून केले गेलेले नाही.रस्त्यावर धूळ खात महिने महिनो ज्या गाड्या उभ्या आहेत त्यांची अडचण असताना त्या गाड्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई पालिकेकडून का होत नाही ? हा काय प्रकार आहे...? आमदार, खासदार फँडातून पालिकेकडून शहराच्या विकासासाठी कधीं काही मागणी केली गेली नाही... असे का ? शहराच्या विकासात्मक बदलासाठी सर्वांनी राजकारण सोडून एकत्र काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.आणि पालिकेचे होत असलेले नुकसान निदर्शनास आणून दिले...
मलकापूर नगरपलिकेचे कौतुक करत त्यांनी त्या नगरपालिकेचा जसा शहराच्या विकासासाठी मंत्रालयीन पाठपुरावा होत असतो तसा कराड शहराचाही झाला पाहिजे... मग तो का झाला नाही...? असा सवालही त्यांनी यावेळी केला...आणि या सर्व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची अपेक्षा सत्ताधाऱ्याकडून असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले...  त्याचवेळी पालिका सभेत सूचना कोणी वाचली पाहिजे ? नेमकं सत्ताधारी कोण ? यावरून जनशक्ती आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये वादावादी झाली आणि याच विषयाच्या अनुषंगाने नवीन वादाला तोंड फुटले..यावरून मोठी बाचाबाचीदेखील झालेली पहायला मिळाली...गदारोळ झाला..तू तू मै मै झाली...आम्हीच कसे बरोबर हे तिथे असलेल्या उपस्थित पत्रकारांना दाखवण्याचा  प्रयत्नही झालेला पहायला मिळाला...मात्र  पालिकेच्या उत्पन्नासाठीचे उपाय...आणि त्याबाबतचे प्रश्न महत्वाचे असतानाही त्याची उत्तरे त्याठिकाणी मिळाली नाहीत...पालिकेच्या आर्थिक उन्नतीचा विचार होणे त्यावेळी गरजेचे होते, चर्चा गरजेची होती... या सभेवेळी कोणतेही राजकारण होणे अपेक्षित नव्हते...ते कोणी? ,का? कशासाठी? केले हे ज्याचे त्यांनाच ठाऊक ? पण हे सगळे दुर्दैवी झाले...शहराच्या चार वर्षाच्या कारभारानंतर एका  विरोधी गटनेत्याला शहरातील एवढे प्रश्न दिसतात... याची उत्तरे कधी मिळायची ? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जर पालिकेचा आर्थिक फायदा होत असेल तर ती उत्तरे मिळणे महत्वाचे नाही का ?  हे प्रश्न गेल्या 4 वर्षात का नाही सुटले  ? का आजतागायत अनुत्तरित राहिले..?  अशा अनेक प्रश्नावली शहरातील लोकांसमोर तात्यांनी या सभेच्या निमित्ताने उभ्या केल्या आहेत... याची उत्तरे सत्ताधाऱ्यांकडून सौरभ तात्यांना हवी आहेत...
झालेल्या सभेत ती मिळाली नाहीत...गदारोळात विषयच डायव्हर्ट झाला एवढेच जाणवले... दरम्यान वरील प्रश्नांची उत्तरे  मिळण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी... आहे तरी नेमकं कोण ? याचाही खुलासा आता होणे गरजेचे आहे. 

136 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज तर,176 जण नवीन बाधित आढळले...

सातारा दि.26 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 136 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 479 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली
दरम्यान आज 176 अधिक रुग्ण सापडल्याचे रिपोर्ट्स आलेत.
त्याबाबतची सविस्तर बातमी उद्या...

479 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

जिल्हा  रुग्णालय सातारा येथील 40, कराड येथील 62, फलटण येथील 35, कोरेगाव येथील 26, वाई येथील 53, खंडाळा येथील 11, रायगाव येथील 24 , पानमळेवाडी येथील 113, महाबळेश्वर येथील 15, दहिवडी येथील 22, म्हसवड येथील 28, व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 50 असे एकुण 479 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमुने -344134*
*एकूण बाधित -58504*  
*घरी सोडण्यात आलेले -55600*  
*मृत्यू -1851* 
*उपचारार्थ रुग्ण- 1053* 
00000

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करा – जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा , (जिमाका) दि. 26:- केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्यावतीने कोव्हिड -19 लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. शुक्रवार दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी सातारा जिल्ह्यात बहुमाध्यम जनजागृती अभियानाची सुरुवात येथील  जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण  सभागृहाच्या समोर करण्यात आली. 
या बहुमाध्यम रथाचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हिरवी झेंडी दाखवून तसेच फित कापून उद्घाटन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये , क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो कोल्हापूरचे प्रमोद खंडागळे आदि मान्यवर उपस्थित होते. 
उदघाटन प्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जनतेने आवश्यकतेनुसार घराबाहेर पडावे तसेच  मास्कचा वापर, किमान 6 फुटाचे अंतर तसेच वेळोवेळी हाताची स्वच्छता करणे या त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे असे सांगून आपली आणि समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.  या बहुमाध्यम चित्ररथामध्ये शाहीर महादेव मनवकर आणि संच आणि शाहीर श्रीरंग रणदिवे आणि त्यांचा संच यांच्याद्वारे गीत व नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत, शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रचार मोहिमेचा मुळ उद्देश हा लोकांपर्यत लसीकरण मोहिमेची खरी माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करणे हा आहे. “ लोकल फॅार व्होकल ” हे ब्रीद वाक्य घेऊन राबविण्यात येत असलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांना देण्याचे अमुल्य  कार्य या जनजागृती अभियानातून केले जाणार आहे.  तसेच एलईडी डिस्प्लेच्या माध्यमातूनही संदेश दाखविण्यात येणार आहेत.  तसेच श्राव्य संदेशाचाही समावेश या चित्ररथात करण्यात आला आहे.
पुढील दहा दिवस  सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरी भागातून या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

130 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

सातारा दि. 26 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 130 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 1,  शहरातील  तामजाई नगर 1, अमरलक्ष्मी 2, खेड 2, शाहूपूरी 2, गोडोली 2,  कुसवडे 1, सासपडे 1,  सदरबझार 1, जायगाव 1, शनिवार पेठ 1, 
*कराड तालुक्यातील* कराड  शहरातील मंगळवार पेठ 1, रेणूकानगर  1, बुधवार पेठ  1, सैदापूर 2, सवदे 4,  बेलवडे 1, मसूर 1, घारेवाडी 1, मलकापूर 2, कार्वे नाका 3, तांबवे 3, 
*पाटण तालुक्यातील*    पाटण 1, कोयनानगर 1, नाटोशी 2, येरळवाडी 1, शेंडेवाडी 2, 
*फलटण तालुक्यातील*   लक्ष्मीनगर 1, तरडफ 1, शिवाजीनगर 1, संगवी 1, 
*खटाव तालुक्यातील*   वडूज 1, खुटबाव1, कातरखटाव 1,  औंध 1, 
*माण तालुक्यातील*   शिंगणापूर रोड मार्डी 1, जांभूळणी 3, मार्डी 3, दहिवडी 8, बिदाल 1, मोगराळे 1, गोंदवले बु. 2 धामणी 1, पळशी 1, हिंगणी 1, इंजबाव 1,  
*कोरेगाव तालुक्यातील*   कोरेगाव 2, किरोली 2,  खेड 1, 
*खंडाळा तालुक्यातील*   लोणंद 6, बाळुपाटलाची वाडी 1, खंडाळा 8, निंबोडी गावठाण 1, निरा 1, शिरवळ 3, शिंदेवाडी 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील*  भिलार 3,   येरणे 2, 
*जावली तालुक्यातील*  रायगाव 3, तांबी 1, आनेवाडी 1 , भिवडी 1,  महू 1, कुडाळ 3, रामवाडी 2, केळघर 1, 
*वाई तालुक्यातील*   ओझर्ड 1,  पसरणी 1,  बोरगाव 1,  केंजळ 2, गुळूंब 1, सुरुर 1,वरे 1, व्याजवाडी 1,
* इतर*-  बनवर, कर्नाटक 1, 
*एका बाधिताचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथे कातरखटाव ता. खटाव येथील 67  वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 *एकूण नमुने -344134*
*एकूण बाधित -58504*  
*घरी सोडण्यात आलेले -55464*  
*मृत्यू -1851* 
*उपचारार्थ रुग्ण- 1189* 

0000

Thursday, February 25, 2021

भाजपच्या नगराध्यक्षांसह 13 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश...एकनाथ खडसेंचा धमाका...

जळगाव : भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे  यांनी उत्तर महाराष्ट्रात वात पेटवली आहे. त्याचा परिणाम म्हणून काही दिवसापूर्वीच भुसावळ नगरपालिकेतील भाजपच्या नगराध्यक्षांसह 13 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत  प्रवेश केला. भाजपला आता या धक्क्यातून सावरुन, आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी तयारी करावी लागणार आहे. 

जळगाव जिल्ह्यात भाजपला बॅकफूटवर ढकलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला एकनाथ खडसेंच्या रुपाने मातब्बर नेत्याला आपल्या गळाला लावले. त्यानंतर आता खडसेंच्या माध्यमातून भुसावळातील 13 नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन, नगरपालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप घडवून आणला. जळगाव जिल्हा भाजपसाठी हा मोठा ‘सेटबॅक’ मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली खेळी ही भाजपच्या अडचणी वाढवणारी असून, जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. दुसरीकडे, भुसावळात अलिकडे घडलेल्या घडामोडी या भाजपच्या चिंता वाढवणाऱ्या असल्या तरी राष्ट्रवादीसाठीही पक्ष नेतृत्त्वाच्या दृष्टीने पक्षांतर्गत आव्हाने निर्माण करणाऱ्या आहेत.


भुसावळ नगरपालिकेतील भाजपच्या नगराध्यक्षांसह 13 नगरसेवक, त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक अशा अर्धशतकी संख्या असलेल्या मंडळीनी, 14 फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधले. त्यामुळे भाजप पुरता संकटात सापडला आहे. भुसावळ नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत पक्षाला बसलेला झटका हा निश्चितच आगामी निवडणुकीचा स्कोअर कमी करणारा ठरु शकतो. विशेष म्हणजे, भुसावळात भाजपला या झटक्यातून सावरावे तर लागेलच शिवाय राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी सक्षम पर्याय देखील वेळीच उभा करावा लागणार आहे. यासाठी पक्षाकडे फार वेळ नाही. अशा परिस्थितीत भाजपच्या भूमिकेकडे लक्ष असेल.

पक्ष थांबणार नाही, एक गेला, दुसरा येईल : भाजप
भाजपचे भुसावळचे आमदार  संजय सावकारे ( म्हणाले की, “आमचे काही नगरसेवक नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी पक्षांतर करताना पळवाट शोधली आहे. त्यांनी पक्षाला प्रत्यक्ष सोडचिठ्ठी दिलेली नाही. मात्र, कुटुंबीय आणि समर्थकांचा त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला आहे. यामुळे पक्षाला निश्चितच फटका बसेल. पण तो फार काळ नसेल. कुणी पक्ष सोडून गेले म्हणजे पक्ष थांबत नसतो. एक जण गेला की दुसरा येतो. एकाचे काम थांबले की दुसऱ्याला संधी मिळत असते. आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही आतापासून मोर्चेबांधणी करू. पक्षातील नव्या लोकांना संधी, जबाबदारी देऊ”

लोकांनीच भाजपला हद्दपार करायचं ठरवलंय : राष्ट्रवादी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून भूमिका मांडताना माजी आमदार संतोष चौधरी यांनी सांगितले की, “आता लोकांनीच भाजपला हद्दपार करण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्याची प्रचिती आली. भुसावळ नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. पण गेल्या साडेचार वर्षांत शहराचा विकास तर सोडा मात्र, शहर अनेक वर्षे मागे पडले. मूलभूत सुविधा देखील येथील नागरिकांना मिळत नाही, हे दुर्दैव आहे. भाजपातील मुस्कटदाबी सहन करायची नाही म्हणून नगरसेवकांचा एक मोठा गट आमच्याकडे आला आहे. भुसावळ शहराचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही आता प्रयत्नशील राहू. शहराचा विकास राष्ट्रवादीशिवाय होणार नाही, हे जनतेला माहिती झाले आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपला पिछाडीवर ठेऊ असा विश्वास संतोष चौधरी यांनी व्यक्त केला.

59 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज ; तर,130 नवीन बाधित... काळजी घ्या...

सातारा दि.25 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 59 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 635 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
दरम्यान 130 जण नवीन बाधीत सापडले आहेत
त्याबाबतची सविस्तर बातमी उद्या...

635 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

जिल्हा  रुग्णालय सातारा येथील 38, कराड येथील 117, कोरेगाव येथील 47, वाई येथील 46, खंडाळा येथील 11, रायगाव येथील 21 , पानमळेवाडी येथील 187, महाबळेश्वर येथील 25, दहिवडी येथील 70, म्हसवड येथील 9, पिंपोडा येथील 8 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 56 असे एकुण 635 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमुने -342420*
*एकूण बाधित -58365*  
*घरी सोडण्यात आलेले -55464*  
*मृत्यू -1850* 
*उपचारार्थ रुग्ण- 1051* 
00000

कोरोना संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रणासाठी-जिल्हाधिकारी यांचे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला आदेश

सातारा दि. 25 : (जिमाका) : सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 या आजाराच्या रुग्णसंख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणू अथवा संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन सातारा यांच्या समन्वयाने जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा व जिल्हा आरोग्य अधिकारी  जिल्हा परिषद, सातारा यांना  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी खालील प्रमाणे आदेश दिले आहेत. 
       कोरोना विषाणू प्रभावित क्षेत्रातून आलेल्या प्रवाशांची लक्षणे असल्यास त्वरीत व लक्षणे नसल्यास 5 ते 14 दिवसामध्ये आरटीपीसीआर व आरएटी टेस्ट (RTPCR, RAT TEST) करणे अनिवार्य आहे. ओपीडी मध्ये आलेल्या रुग्णांपैकी  एखाद्या व्यक्तीस फ्लु सदृश्य लक्षणे असल्यास ,  सारी सदृश्य लक्षणे असल्यास अशा रुग्णांची त्वरीत आरटीपीसीआर व आरएटी टेस्ट (RTPCR, RAT TEST) करणे बंधनकार राहील. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या सहवासातील किमान 20 हाय रिस्क कॉन्टॅक्टची आरटीपीसीआर व आरएटी टेस्ट (RTPCR, RAT TEST) करणे गरजेचे आहे. आरएटी टेस्ट निगेटिव्ह आली आहे परंतु कोरोना सदृश्य लक्षणे असल्यास आरटीपीसीआर व आरएटी टेस्ट (RTPCR, RAT TEST) करणे बंधनकार राहील. मास्कचा योग्य प्रकारे व नियमित वापर, सोशल डिस्टन्सींगचे कोटेकोरपणे पालन, तसेच अनावश्यक प्रवास टाळणे व कोणत्याही कार्यक्रमानिमित्त एकत्रित येणे टाळावे याबाबत सूचना सर्व रुग्ण नातेवाई व सर्व सामान्य नागरिकांना द्याव्यात. arl detection] timely correct referral to covid centre] early investingtion and early treatment according to protocol  यामुळे कोरोना आजाराच्या प्रतिबंधास मतद होणार असल्याने याबाबत कडक अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी. कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात वाढू नये यासाठी containment plan प्रमाणे सूक्ष्म उपाय योजना आखण्यात यावी. स्वंतत्र वैद्यकिय पथके तयार करुन पूर्ण वेळ तैनात ठेवावी. संशयीत रुग्णांसाठी स्वतंत्र ॲब्युलन्सची व्यवस्था करण्यात यावी. कोरोना विषाणूचा संसर्ग बाबत जनजागृती करण्यात यावी. झींगल्स, हस्तपत्रिका, पोस्टर्स, स्टीकर यांच्या माध्यमातून तात्काळ जनजागृती करावी. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे व कार्यवाही करावी. खाजगी रुग्णालये सहकार्य करीत नसल्यास त्यांच्यावर साथरोग अधिनियम कायद्यानुसार योग्य कारवाई करावी. यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी यांची नियुक्ती करावी. 
वरील अटी व शर्थीचे पालन न करणारी संस्था अथवा कोणतीही व्यक्ती यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध असे मानन्यात येवून नियमानुसार कारवाई करण्यात येईल. 
000000

लग्न समारंभास 100 व्यक्तींनाच परवानगी -जिल्हाधिकारी यांनी दिल्या सुचना

सातारा दि. 25 : (जिमाका) : सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 या आजाराच्या रुग्णसंख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. या संभाव्य धोक्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी लग्न समारंभ  अयोजित करण्याबाबत वधु, वर व मंगल कार्यालय चालकांना खालील प्रमाणे विशेष सुचना निर्गमित केल्या आहेत. 
लग्न समारंभाच्या कार्यालयात जास्तीत जास्त 100 व्यक्तींनाच (भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी-वाढपी, इ. सह) उपस्थित राहण्याबाबत परवानगी देण्यात येत आहे. लग्न समारंभाच्या अगोदर लग्न कार्याच्या कार्यक्षेत्रातील संबंधित पोलीस स्टेशन यांचा ना हरकत परवाना घेवून संबंधित तहसिलदार यांची पूर्व  परवानगी घेणे बंधनकारक आहे. मंगल कार्यालयाच्या परिसरात अथवा ज्या ठिकाणी लग्न कार्य आहे या ठिकाण कोणत्याही प्रकारचे वाद्य अथवा फटाका वाजविण्यास  पूर्णपणे मनाई राहील. संपूर्ण लग्न समारंभात वधु व वर या दोन्ही पक्षाकडील आणि उर्वरित सर्व नागरिकांनी पूर्ण वेळ मास्क वापरणे व सोशल डिस्टंसिंग पाळणे बंधनकारक राहील. मंगल कार्यालय व्यवस्थापनाने लग्न कार्यालयात पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर उलब्ध करुन देणे बंधनकार राहील. लग्न समारंभ बंदिस्त हॉलमध्ये असल्यास व्यवस्थापक यांनी आवश्यक तो सोशल डिस्टंसिंग राहील याबाबत खबरदारी घ्यावी. लग्न समारंभास 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक व कोमॉर्बिड ( मधुमेह, रक्तदाब, श्वसनाचे विकार इ.) आजारी व्यक्तीस लग्न कार्यात सहभागी होण्यास मनाई करण्यात येत आहे. तथापी सख्ख्या रक्त नात्यातील आजी व आजोबा इत्यादींना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. हॉटेल, रिसॉट, लॉन्स, मंगल कार्यालय इ. ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोविड-19 च्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचा भंग केल्यास संबंधित व्यवस्थापन यांचेकडून प्रथमवेळी रु. 25 हजार तसेच दुसऱ्यावेळी रु. 1 लाख व फौजदारी कारवाई करण्यात येईल.  व संबंधित कार्यक्रम आयोजकाकडून रु. 10 हजार दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल. 
00000

111 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; काळजी घ्या...

सातारा दि. 25 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 111 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा  शहरातील शिवम कॉलनी गडकर आळी 1, यादोगोपाळ पेठ 1,  मोती चौक 3, प्रतापगंज पेठ 1, एलबीएस कॉलेजसमोर 1, गोडोली 1, मंगळवार पेठ1, आसनगाव 1, सज्जनगड 1,  चिंचणेरवंदन 1,  तामजाईनगर 1, पानमळेवाडी 1, डबेवाडी 1, मालगाव 1, 
*कराड तालुक्यातील* कराड 2, शहरातील गजानन सोसायटी1,  भेदा चौक 1,आशिर्वादनगर 1, विद्यानगर 1, वहागाव 1,  अंधारवाडी-उंब्रज 1, घोलपवाडी 2, माटेकरवाडी 1,
*पाटण तालुक्यातील*  केरळ 1, 
*फलटण तालुक्यातील*  निर्मलनगर 2, रामराजेनगर 2, गोळीबार मैदान 2, लक्ष्मीनगर 1, सगुणमातानगर 1, 
*खटाव तालुक्यातील*  वडूज 4, मायणी 3, बुध 1, पुसेगाव 2, येरळवाडी 3,  
*माण तालुक्यातील*  दहिवडी 6, खुटबाव1, वरकुटे 1, म्हसवड 1, राणंद 1, वाडीखोरा मार्डी 1, गोंदवले बु.2
*कोरेगाव तालुक्यातील*  सातारारोड 2, देऊर 1, न्हावी बु. 1,  वाठार किरोली 1, रहिमतपूर 1,  कोरेगाव 1, वाघोली 1, आसनगाव 1,
*खंडाळा तालुक्यातील*  लोणंद 1, पिंपरे बु. 2, भोंगावळी 1,  खंडाळा 8, म्हावशी 2,  पारगाव 1
*महाबळेश्वर तालुक्यातील* तळदेव 1, पाचगणी 1, आखेगणी पाचगणी1, पाचगणी 1, 
*जावली तालुक्यातील*   करंदी 3, कुडाळ 3, चिंचणी 1,  मेढा 1, घाटदरे 1, 
*वाई तालुक्यातील*  विराटनगर 2, बोपेगाव 1, बावधन 2,  बोरगाव 1, गोळेवाडी 1,  कळंबे 3,
  
*एका बाधिताचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथे बावधन ता. वाई येथील 45 वर्षीय पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 *एकूण नमुने -342420*
*एकूण बाधित -58365*  
*घरी सोडण्यात आलेले -55405*  
*मृत्यू -1850* 
*उपचारार्थ रुग्ण- 1110* 

0000

Wednesday, February 24, 2021

एक मार्च पासून सर्वसामान्यांना मिळणार कोरोनाची लस...या लोकांना मिळणार प्राधान्य...

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढत असतानाच कोरोनावरील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने  मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण  मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाल्यानंतर आता केंद्र सरकारने येत्या १ मार्चपासून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोनावरील लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.

कोरोनावरील लसीकरणाची घोषणा करताना प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, येत्या १ मार्चपासून देशातील ६० वर्षांवरील नागरिकांना आणि गंभीर समस्यांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे
देशभरातील १० हजार सरकारी आणि २० हजार खासगी केंद्रांमधून हे लसीकरण केले जाईल. दरम्यान, सरकारी केंद्रावरील लसीकरण हे पूर्णपणे मोफत असेल, अशी माहितीही प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
गेल्या वर्षभरापासून देशभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव गेल्या काही महिन्यात कमी झाला होता. मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून देशातील काही राज्यांत कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी लसीकरण सुरू होणे हे दिलासा देणारे आहे.
कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना मान्यता देण्यात आल्यानंतर भारतामध्ये १६ जानेवारीपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

35 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज ; तर 111 सापडले नवे रुग्ण...जिल्हाधिकाऱ्यांनी केले नवे आदेश जारी...

सातारा दि.24 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 35 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 545 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दरम्यान आज 111 जण नवीन रुग्ण सापडल्याचे रिपोर्ट्स आले आहेत
त्याबाबतची सविस्तर बातमी उद्या...

545 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

जिल्हा  रुग्णालय सातारा येथील 26, कराड येथील 84, फलटण येथील 21, कोरेगाव येथील 17, वाई येथील 88, खंडाळा येथील 3, रायगाव येथील 42 , पानमळेवाडी येथील 96, महाबळेश्वर येथील 35, दहिवडी येथील 83, म्हसवड येथील 9 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 41 असे एकुण 545 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमुने -341299*
*एकूण बाधित -58268*  
*घरी सोडण्यात आलेले -55405*  
*मृत्यू -1849* 
*उपचारार्थ रुग्ण-1014* 
00000

 कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने
आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इ. ठिकाणी कठोर नियम लागु.........

जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी..........
 
जिल्ह्यात कोविड-19 रुग्णांमध्ये लक्षणीया वाढ होत असून कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर  लावण्यात आलेले बिुलांश निर्बंध हटवण्यात आले असून विविध सामसाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजनैतिक व इतर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणत गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात रात्रीचे 11.00 वाजेलेपासून ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तथापि, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा चालू राहतील.  सातारा जिल्ह्यातील आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तसेच कोविड-19 च्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशातील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. *हॉटेल, रिसॉर्ट,लॉन्स, मंगल कार्यालय इत्यादी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोविड-19 च्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचा भंग झाल्यास संबंधित व्यवस्थापन यांचेकडून प्रथमवेळी रक्कम रु. 25 हजार दंड, तसेच दुसऱ्यांदा भंग झाल्यास रक्कम रु. एक लाख दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रशासनाने दिलेत.

कराड नगरपरिषदेच्या वतीने 14 प्रभागांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती...

कराड : नगरपरिषदेच्या वतीने शहरातील 14 प्रभागांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.  नगरपालिकेने स्वच्छतेत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्वच्छतेतील सातत्य टिकवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले..

सलग दोन वर्ष स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये कराड नगरपरिषदेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने राज्य शासन व जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही नियमावली जाहीर केले आहे. या दोन्ही विषयांचा संयुक्तिक विचार करून कराड नगरपरिषदेने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी पथनाट्याद्वारे 14 प्रभागांमध्ये पथनाट्याचे सादरीकरण करून नागरिकांना स्वच्छ सर्वेक्षणचे महत्व पटवून दिले तर कोरोनापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या सुरक्षेच्यादृष्टीने माहिती देण्यात आले आहे. 

पथनाट्याद्वारे सादरीकरण होत असताना कराडमधील नागरिकांनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. पथनाट्यामध्ये सादर होणारे शब्द न् शब्द कानातमध्ये ग्रहण करून स्वच्छ सर्वेक्षणबाबत दक्ष असल्याचे व   त्याचबरोबर कोरोना प्रादुर्भाव  वाढणार नाही, याची दक्षता घेत आहोत अशी हमी कराडकरांच्या चेहर्‍यावर दिसून येत होती. पथनाट्याला कराड शहरातील आबालवृद्ध, युवा युवती तसेच लहान मुलांनी प्रतिसाद दिला. रस्त्यावरून ये-जा करणार्‍या विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना व वाहनचालकांना मास्क वापरा हा संदेश प्रामुख्याने दिला जात होता. 

पथनाट्यातील कलाकार सिग्नलवर उभे राहून वाहनधारकांना स्वच्छतेचे धडे व कोरोनाबाबत घ्यावयाची दक्षता सांगितली जात होती. अन्यथा "आपले शहर स्वच्छ ठेवायचे  आणि कोरोनापासून सुरक्षित राहायचे असेल तर सूचनांचे पालन केले पाहिजे, हा संदेश अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. राजा - प्रधान, वासुदेव, पोतराज, मावळे अशा विविध पेहरावामध्ये पथनाट्यातील कलाकारांनी आज कराडमध्ये स्वच्छता व कोरोनाबाबत कराडमधील 14 प्रभागांमध्ये जनजागृती व प्रबोधन केले.

या पथनाट्याचे सादरीकरण व जनजागृतीसाठी मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगरसेवक हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर यांच्या मार्गदर्शनानुसार कराड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी व पथनाट्यातील कलाकारांनी आज दिवसभर कराड शहरातील 14 प्रभागांमध्ये जनजागृती व प्रबोधन केले.

Tuesday, February 23, 2021

सांगलीत राष्ट्रवादीला मदत करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई होणार..भाजपा कडून हालचाली सुरू...

सांगली 
 सांगली महापौर-उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादीला सहकार्य करणाऱ्या सात नगरसेवकांवर भाजपकडून कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचं व्हीप डावलून काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केल्याने सदस्यांवर अपात्रतेच्या कारवाई करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. 

सांगलीचे भाजप शहर जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे आणि महापालिका गटनेते सुधीर सिंहासने यांच्याकडून सदस्यांच्या अपात्रतेच्या कारवाईसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. काल झालेल्या सांगली महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या पाच नगरसेवकांनी व्हीप डावलून काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलं होतं, तर 2 नगरसेवक गैरहजर राहिले होते.


महापौरपदाच्या निवडणुकीत काय झालं?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत भाजपला आस्मान दाखवलं. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून महापौरपदी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांची निवड झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. भाजपची पाच मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना मिळाली 36 मतं पडली.

फोडाफोडीच्या शक्यतेमुळे उत्सुकता शिगेला

चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. नगरसेवक फोडाफोडीच्या शक्यतेमुळे महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली, जी अखेर व्यर्थ ठरली

204 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

सातारा दि. 24 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 204 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला  असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 4, मंगळवार पेठ 1,  सदरबझार 1,अंबेधरे 1, खिंडवाडी 11, संगमनगर 1, शाहुपुरी 2, केसरकर पेठ 2, शनिवार पेठ 1, माची पेठ 1, जकातवाडी 1, 
*कराड तालुक्यातील* कराड 2, वहागाव 1, मसूर 1, 
*पाटण तालुक्यातील* पाटण 1,  
*फलटण तालुक्यातील* फलटण 5, शेरेवाडी 1, गोळीबार मैदान 1, जावली 1, वाठार फाटा 1, खराडेवाडी 1, मंगळवार पेठ फलटण 1, स्वामी विवेकानंद नगर 1, गिरवी 2, सोमंथळी 1, वाखरी 2, वाढळे 1, गोखळी 1,  
*खटाव तालुक्यातील* खटाव 1, नेर 1, वेटणे 3, पुसेगाव 5, काटकरवाडी 3, इसापूर 1, रेवळेकरवाडी 1, बुध 2, 
*माण तालुक्यातील* इंजबाव 1, झाशी 2, दहिवडी 45, पिंगळी 1, आंधळी 4, कुळकजाई 1, 
*कोरेगाव तालुक्यातील* अंभेरी 1, रहिमतपूर 2, साप 1, तडवळे 1, कोरेगाव 6, आसनगाव 1, कुमठे 1, तांदुळवाडी 1, दुधी 2, खेड 1, कटापूर 1, रुई 7,  
*खंडाळा तालुक्यातील* आसवली 1, पिंपरे 7, शिरवळ 2, पळशी 3,  खंडाळा 2, अहिरे 1, बावडा 1, शिवाजीनगर 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 1, 
*जावली तालुक्यातील* रामवाडी 1, महु 1, केळघर 1, 
*वाई तालुक्यातील* वाई 1, कळंबे 1, भुईंज 1,केंजळ 1, सुरुर 2, वेळे 1, वहागाव 1, गंगापुरी 1, बावधन 3, रानवले 1, किडगाव 1, मुगव 2, 
  *इतर* धामणेर 5, वेलंग 1, हिंणगाव 1, जाधवाडी 1, मिरेवाडी 1, हमदाबाद 1, खुटबाव 5,  
*बाहेरील जिल्हृयातील* पुरंदर 1, 
*1 बाधिताचा मृत्यु*
जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये गुळुंब ता. वाई येथील 66 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 *एकूण नमुने -341299*
*एकूण बाधित -58268*  
*घरी सोडण्यात आलेले -55370*  
*मृत्यू -1849* 
*उपचारार्थ रुग्ण-1049* 

0000

पुरोगामी विचार वाचवण्यासाठी महाआघाडी सरकार एकत्र : आ. पृथ्वीराज चव्हाण... पोतलेत आरोग्य उपकेंद्राचे उदघाटन ; उदयसिंह पाटील-उंडाळकरांची उपस्थिती.

कराड, प्रतिनिधी : प्राथमिक आरोग्य केंद्र ते ग्रामीण रुग्णालय असा आरोग्य विभागाचा मूलभूत पाया रचण्याची अभूतपूर्व कामगिरी केंद्रातील यूपीए काँग्रेस सरकारने केली होती. देशातील आरोग्याची मूलभूत सुविधा भक्कम असल्याने आपण कोरोनाच्या महामारीला यशस्वीपणे तोंड दिले. असे सांगून कोरोनानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारने खर्च आणि उत्पन्न याचा मेळ घालत आणला आहे. त्याचबरोबर पुरोगामी विचार वाचवण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत. असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

पोतले (ता. कराड) येथे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून एक कोटी पाच लाख रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उदघाटन व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील-उंडाळकर, प्रदेश काँग्रेसचे प्रांतिक सदस्य अजितराव पाटील-चिखलीकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सदस्या मंगलताई गलांडे, पंचायत समिती सदस्या नंदाताई यादव, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख, वैधकीय अधिकारी डॉ. सुनिता थोरात, डॉ. हर्षाली जगताप, जिल्हा काँग्रेसचे चिटणीस राजेंद्र चव्हाण, मलकापूर नगरपालिकेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील-पोतलेकर, रयत कारखान्याचे माजी संचालक विलासराव पाटील-पोतलेकर, कराड उत्तर सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष उमेश साळुंखे, शाखा अभियंता सुनील म्हेत्रे, आनंदराव कोळी, येरवळेचे सरपंच सुभाषराव पाटील, तानाजीराव घारे, अधिकराव गरुड, पोतलेच्या सरपंच वैशाली माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. चव्हाण म्हणाले, पोतलेच्या विकासासाठी भरघोस निधी दिला आहे. विकासाची भूक थांबवू नका. तुम्ही विकासकामे आणखी मागा. मी ती देत राहीन. गाव आणि गावाचा विकास हे उद्धिष्ट पोतलेकरांनी ठेवले आहे, हे अभिनंदनीय आहे. आरोग्य उपकेंद्राचे देखणे व सुबक काम झाले आहे. त्याची सर्वांनी मनोभावे जपणूक करावी.

उदयसिंह पाटील म्हणाले, आगामी निवडणुकात काँग्रेसची ताकद दुसऱ्यांकडे गहाण ठेवल्यास विरोधक आपणास देशोधडीला लावतील. व्यक्तिगत स्वार्थासाठी कुणाबरोबर न जाता काँग्रेसचा विचार आणि विकासाला साथ देणाऱ्या नेत्यांबरोबर रहा. विलासकाका व पृथ्वीराज बाबा यांनी मतदारसंघातील सरंजामशाही प्रवृत्तींना बाजूला ठेवण्यासाठी मतदारसंघात पायाभूत सुविधा व वैचारिक विकास केला आहे.

मनोहर शिंदे म्हणाले, बाबांच्यामध्ये मोठा निधी आणण्याची प्रचंड क्षमता आहे. कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज बाबांचा सर्वाधिक निधी वांग खोऱ्यासाठी मिळाला आहे. पोतलेच्या विकासाचा इतर गावांनी आदर्श घ्यावा.

अजितराव पाटील म्हणाले, विलासकाकांनी आदर्श आमदार म्हणून काम केले. आता पृथ्वीराज बाबांनी आदर्श उभा केला आहे. लबाडाचे निमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही. अशी विरोधकांची अवस्था आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पृथ्वीराज बाबा आणि उदयदादांच्या मागे चालायचे आहे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य व माजी सदस्य तसेच कोरोना यौध्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. आबासाहेब पवार, अशोकराव पाटील, शंकरराव खबाले यांची भाषणे झाली. सरपंच वैशाली माळी, माजी सरपंच रामचंद्र पाटील, दिलीप शिंदे, अशोकराव पाटील-पोतलेकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष निलेश पाटील, मानसिंग पाटील, लता पाटील, सुनिल पाटील, धनाजी शिंदे, विजय पाटील, अनिल माळी यांनी स्वागत केले. अंकुश नांगरे यांनी प्रास्ताविक व दिलीप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष पवार यांनी आभार मानले.

जिल्ह्यातील 96 जणांना दिला डिस्चार्ज ; मात्र 201 सापडले नवीन बाधीत...

सातारा दि.23 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 96 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 507 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
दरम्यान आज 201 नवीन रुग्णाची वाढ झाल्याचे रिपोर्टस आले आहेत...
याबाबत सविस्तर बातमी उद्या.... 
-----------------------------------------------------------

507 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

जिल्हा  रुग्णालय सातारा येथील 40, कराड येथील 59, कोरेगाव येथील 8, वाई येथील 58, खंडाळा येथील 8, रायगाव येथील 51 , पानमळेवाडी येथील 51, महाबळेश्वरयेथील 25, दहिवडी 101, म्हसवड 15, पिंपोडा 25 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 66 असे एकुण 507 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

एकूण नमुने -340089*
*एकूण बाधित -58064*  
*घरी सोडण्यात आलेले -55370*  
*मृत्यू -1848* 
*उपचारार्थ रुग्ण-846* 
00000
राज्यात आज 6218 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5869 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2005851 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 53409 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.96% झाले आहे.

शहाजीराव क्षीरसागर यांचे जशराज पाटील यांनी केले अभिनंदन....

कराड
शहाजीराव क्षीरसागर याची महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था लेखापरीक्षण समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे.
 सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक, कराड उत्तरचे युवा नेते जशराज पाटील(बाबा) यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

कृष्णा कारखान्याची साखर झाली इंडोनेशियाला रवाना...

कराड
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सभासद हिताचे निर्णय राबवत सहकारात आदर्श निर्माण केला आहे. कृष्णा कारखान्याच्या साखरेची चव संपूर्ण देशभरातील लोकांना चाखायला मिळतेच. पण आता सातासमुद्रापार राहणार्‍या परदेशातील लोकांनाही ’कृष्णा’च्या साखरेची चव चाखायला मिळणार आहे. कारण कृष्णा कारखान्याने उत्पादित केलेली साखर इंडोनेशियाला काही दिवसांपूर्वी रवाना झाली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या केंद्र शासनाने कारखान्यांची आर्थिक तरलता सुधारावी. साखर कारखान्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून साखर निर्यात योजना जाहीर केली आहे. या योजनेस अनुसरून आणि मागील तसेच चालू हंगामातील शिल्लक साखर साठा विचारात घेऊन आणि सध्या पांढर्‍या साखरेला बाजारात कमी प्रमाणात असलेली मागणी, पर्यायाने मंदावलेला साखरेचा उठाव, बाजारात घसरलेले साखरेचे दर अशा अनेक बाबींचा विचार करून कारखान्यात रॉ शुगरची निर्मिती करण्याचे धोरण सर्वत्र अंगीकारण्यात आले आहे. या रॉ शुगरला आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली मागणी आणि केंद्र सरकारचे सकारात्मक निर्यात धोरण याचा विचार करून, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी 2020-21 या गळीत हंगामात रॉ शुगर उत्पादित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच या हंगामात 5 लाख क्िंवटल कच्ची साखर तयार करून ती निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्यानुसार कारखान्यात उत्पादित केलेल्या साखरेचा पहिला ट्रक निर्यातीसाठी काही दिवसापूर्वी पाठविण्यात आला.
यावेळी या ट्रकचे विधिवत पूजन कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, की केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत कृष्णा कारखान्याने साखर निर्यातीचा हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, या निर्णयाचा लाभ कारखान्यास होणार आहे.
याप्रसंगी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, संजय पाटील, गिरीश पाटील, सुजित मोरे, अमोल गुरव, ब्रिजराज मोहिते, दिलीपराव पाटील, पांडुरंग होनमाने, गुणवंतराव पाटील, निवास थोरात, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, रघुनाथ मोहिते, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, सेक्रेटरी मुकेश पवार, जनरल मॅनेजर (टेक्निकल) पी. डी. राक्षे आदींसह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कराड तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंच निवडी खालील प्रमाणे...

कराड - 
कराड तालुक्यातील काही  ग्रामपंचायत्तीच्या नूतन सरपंच व उपसरपंच निवडी नुकत्याच पार पडल्या. त्याची माहिती खालीलप्रमाणे...
   
बनवडी ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच प्रदीप मोहनराव पाटील उपसरपंच विकास तानाजी करांडे. 
 कालवडे ग्रामपंचायतीचे सरपंच सुदाम मोटे व उपसरपंच शुभम थोरात .  
नांदलापूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद  रिक्त असून उपसरपंच मानसिंग लावंड.
मालखेड ग्रामपंचायतीचे सरपंच इंद्रजित कृष्णा ठोंबरे व उपसरपंच युवराज दिलीप पवार.पोतले  ग्रामपंचायतीचे सरपंच शंकर ऊर्फ संदीप पाटील व उपसरपंच अविनाश गुरव.वाठार ग्रामपंचायतीचे सरपंच शोभाताई  माणिक पाटील व उपसरपंच अभिजित दिनकर  मोरे .खुबी      ग्रामपंचायत  सरपंच   मालती प्रवीण माने,  उपसरपंच संजय कृष्णा काशिद.कार्वे  ग्रामपंचायत      सरपंच संदीप शांताराम भांबुरे, उपसरपंच प्रवीण काकासो पाटील.
गोळेश्वर ग्रामपंचायत      सरपंच चंद्रकांत काशीद, उपसरपंच प्रकाश जाधव.
शेरे ग्रामपंचायत    सरपंच संगीता निकम, उपसरपंच समीर  सयाजी पाटील.
साळशिरंबे ग्रामपंचायत     सरपंच प्रमिला कुंभार, उपसरपंच अभिजित चवरे. अशी काही ग्रामपंचायतींच्या नूतन सरपंच उपसरपंच यांची नावे आहेत.
कराड -प्रतिनिधी ,
कराड तालुक्यातील काही  ग्रामपंचायत्तीच्या नूतन सरपंच व उपसरपंच निवडी नुकत्याच पार पडल्या.
   
झालेल्या निवडी खालील प्रमाणे थोडक्यात...
बनवडी ग्रामपंचायतीचे नूतन सरपंचपदी प्रदीप मोहनराव पाटील तर उपसरपंचपदी विकास तानाजी करांडे. कालवडे ग्रामपंचायतीचे सरपंचपदी सुदाम मोटे व उपसरपंचपदी शुभम थोरात .  
नांदलापूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद  रिक्त असून उपसरपंचपदी मानसिंग लावंड.
मालखेड ग्रामपंचायतीचे सरपंच इंद्रजित कृष्णा ठोंबरे व उपसरपंच युवराज दिलीप पवार.पोतले  ग्रामपंचायतीचे सरपंच शंकर ऊर्फ संदीप पाटील व उपसरपंच अविनाश गुरव.वाठार ग्रामपंचायतीचे सरपंच शोभाताई  माणिक पाटील व उपसरपंच अभिजित दिनकर  मोरे .खुबी      ग्रामपंचायत  सरपंच   मालती प्रवीण माने,  उपसरपंच संजय कृष्णा काशिद.कार्वे  ग्रामपंचायत      सरपंच संदीप शांताराम भांबुरे, उपसरपंच प्रवीण काकासो पाटील.
गोळेश्वर ग्रामपंचायत      सरपंच चंद्रकांत काशीद, उपसरपंच प्रकाश जाधव.
शेरे ग्रामपंचायत    सरपंच संगीता निकम, उपसरपंच समीर  सयाजी पाटील.
साळशिरंबे ग्रामपंचायत     सरपंच प्रमिला कुंभार, उपसरपंच अभिजित चवरे.

साखरपुड्यातुन 14 तोळे सोने असलेली पर्स लंपास : अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

कराड - साखरपुड्याच्या कार्यक्रमातून  14 तोळे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. येथील एका हॉटेल लॉनमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमातून एका महिलेचे सुमारे 5 लाख रूपये किमतीचे 14 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. रविवारी 21 रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली सविता सुधीर पाटील (वय 41) रा. वारूंजी विमानतळ ता. कराड यांनी रात्री उशिरा याबाबतची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.  

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील एका हॉटेल लॉनमध्ये सविता पाटील या त्यांच्या नातेवाईकाचा साखरपुडा होता. या कार्यक्रमासाठी त्या त्यांच्या मुलासोबत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या सोन्याच्या बांगड्या व ब्रेसलेट पर्समध्ये काढून ठेवल्या,दरम्यान, साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना त्यांच्या नणंदेची मुलगी ऋतुजा साळुंखे हिने सविता यांच्याजवळ तिच्या भावाची जुनी अंगठी त्यांच्या पर्समध्ये ठेवायला दिली. दरम्यान, साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास सविता पाटील यांनी  नवरीमुलीसोबत फोटो काढण्यासाठी त्यांच्या जवळची पर्स शेजारच्या सोफ्यावर ठेवली. फोटो काढून झाल्यानंतर त्या पर्स घेण्यासाठी सोफ्याकडे गेल्या असता त्यांना सदर ठिकाणी पर्स  दिसली नाही. पर्सबाबत पाटील यांनी पै-पाहुण्यांना विचारणा केली. मात्र, पर्सबाबत कोणालाच काही माहिती नसल्याचे त्यांनी  सांगितले. यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांची पर्स चोरली असल्याबाबत त्यांची खात्री झाली त्यानंतर सविता पाटील यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे या पर्समध्ये सविता पाटील यांचे  सुमारे 4 लाख 20 हजार रूपये किमतीचे सोन्याच्या 6 बांगड्या, 35 हजार रूपये किमतीचे 1 तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, 25 हजार रूपये किमतीची सोन्याची 7 ग्रँम वजनाची अंगठी असा एकूण  सुमारे 4 लाख 80 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. ही पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने साखरपुड्याच्या कार्यक्रमात एकच गदारोळ उडाला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वामी करीत आहेत. 

36 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

ल सातारा दि. 23 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 36 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले  असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 2, सदरबझार 1,  प्रतापगंज पेठ 1, विकास नगर 1, खिंडवाडी 1,
*कराड तालुक्यातील* कराड 3,विद्यानगर 1, कर्वे नाका 1,
*फलटण तालुक्यातील* फलटण 1,गुणवरे 1, तांबवे 3,  
*खटाव तालुक्यातील* खटाव 1, नेर 1,
*माण तालुक्यातील* मोगराळे 1, बिजवडी 1,  
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 3, तांदुळवाडी 1, त्रिपुटी 1,
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 1, लोणंद 1, खंडाळा 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* येरणे 1, दांडेघर 1, 
*जावली तालुक्यातील* आरडे 2
  *इतर*धामणी 1,  कारंडी 1, 
*बाहेरील जिल्हृयातील* खानापूर 1,
 *एकूण नमुने -340089*
*एकूण बाधित -58064*  
*घरी सोडण्यात आलेले -55274*  
*मृत्यू -1848* 
*उपचारार्थ रुग्ण-942* 

0000

Monday, February 22, 2021

कराड पालिकेच्या वतीने सत्कार...

कराड

येथील नगरपालिकेने विविध उद्योगात कार्य करणाऱ्या महिला बचत गटांसह विविध संस्था व योध्यांचा करण्यात आला. यामध्ये शाकंभरी, विघ्नहर्ता महिला बचत, सिटी कंप्यूटर इंस्टिट्यूट व शोएब सय्यद यांचा समावेश असून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्धल पालिकेच्या वतीने हा सत्कार केला.

     शहरातील शुक्रवार पेठेत दहा महिलांचा शाकंभरी महिला बचत गट गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यरत आहे. याच गटातील चार महिला व एका युवकाने मिळवून ओम शिवरत्न कापूर व्यवसाय सुरु केला असून त्यांना बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कर्जही मिळाले. या गटाने सामाजिक बांधिलकी जपत  कोरोना महामारीत दहा दिवस कार्वे नाकाश्री हॉस्पिटल शेजारील झोपडपट्टीस्टेडियम परिसरातील घरे, हायवेवरील वीटभट्टी आदी. भागात संपूर्ण जेवण बनवून वितरित केले. तसेच त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण मास्कही तयार करून त्याचे वाटपही केले होते. अशाप्रकारे सामाजिक भान जपणाऱ्या व आपल्या बरोबर इतरही महिलांना प्रेरित करणाऱ्या या गटाचे काम कौतुकास्पद असल्याने  नगरपालिकेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. 

       तसेच शुक्रवार पेठेतील दहा महिलांचा विघ्नहर्ता महिला बचत गट 2008 सालापासून कार्यरत आहे. या गटाने ज्याला जमेल तसे पापड बनविणे, कुरडया विकणे, मेणबत्ती बनवणे, ब्लाऊज शिवणे आदी. व्यवसाय सुरु केले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या काळामध्ये आरोग्याची काळजी म्हणून इतरांसाठी जवळपास 2000 पेक्षा अधिक मास्कसह जीवनावश्यक वस्तूंचे, गरीब महिलांसाठी साड्यांचे वाटप, लहान मुलांना कपड्यांचे वाटप, खाऊचे वाटप केले. त्यांच्या या कामामुळे इतर बचत गटातील महिलांना, सेवाभावी संस्थांनाही यातून प्रेरणा मिळाली. अशाप्रकारे सामाजिक भान जपणाऱ्या व आपल्या बरोबर इतरही महिलांनाही प्रेरित करणाऱ्या बचत गटाचाही नगरपालिकेमार्फत सत्कार करण्यात आला.

       सिटी कंप्यूटर इंस्टिट्यूट, कराड ही संस्था मागील २० वर्षापासून शहर व परिसरात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कम्प्युटरकॉम्प्युटर टायपिंग, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग आदी. प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेने वरील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने स्वच्छता अभियानरक्तदान शिबिरे, वृक्षारोपण  व वृक्ष संवर्धन,रोजगार मेळावे, अन्नदान तसेच मोफत व्यवसायाभिमुख प्रशिक्षण असे अनेक वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले आहेत. सिटी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट, कराड या संस्थेतील विद्यार्थिनींनी कोरोना कालावधीमध्ये स्वतः 500 पेक्षा जास्त दर्जेदार मास्क बनवून त्याचे गरजूंना मोफत वाटप केले. याबद्धल त्यांचाही पालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.

        तसेच शनिवार पेठेतील शोएब सय्यद या अतिशय गरीब कुटुंबातील युवकानेही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आईचे घरकाम तर वडील इस्त्रीच्या दुकानात कामाला असून घरात दोघेजण भाऊ. घरचं परिस्थितीमुळे कसेतरी रडतखडत आठवीपर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. त्यानंतर वडिलांना हातभार लावायचा म्हणून बरीच छोटी-मोठी कामेही त्याने केली. यामधून मिळणाऱ्या पैशांवरच त्याचे कुटुंब चालत होते. त्यानंतर शोएबने कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यासाठी आवश्यक मशीन्स खरेदीसाठी त्याने पालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या विभागाकडे कर्जासाठी मदत मागितली. बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन त्याने त्याचा व्यवसाय सुरू केला. तसेच कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जोपासत त्याने उरलेल्या कपड्यातून मास्क तयार केले. याच काळात त्याने भाजीपाला वितरण, वारणा कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी आपल्या जमापुंजीतून एक वेळचे जेवण दिले. तसेच स्वतःच्या जीवाची काळजी न करता त्यांच्या शेजारील दोन कुटुंबातील लोकांना ऑक्सिजन मशीन लावून त्याचे प्राणही त्याने वाचविले. स्वतःच्या प्रतिकूल परिस्थितीतही दुसऱ्याचा विचार करून त्यांना आनंद देण्यासाठी झटणाऱ्या या मुलाचाही नगरपालिकेतर्फे सत्कार करून त्याचे कौतुक करण्यात आले.

खासदार उदयनराजे व श्रीनिवास पाटील यांच्यावर शेतकरी नेते पंजाबराव पाटील यांची टीका...

कराड
बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील दोन्ही खासदारांवर 
टीका केली आहे.शेतकरी अडचणीत असताना कॉलर उडवणारे शांत बसलेले आहेत तर मिशिला पिळ मारणारे घरात बसलेले आहेत असे टीकास्त्र बळीराजा संघटनेच्या पंजाबराव पाटील यांनी सोडले आहे .येथे वीज बिल निषेध मोर्चावेळी ते बोलत होते.

सातारा जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले व लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील या दोघांच्यावर पंजाबराव पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. कराड येथे विज कनेक्शन तोडणी विरोधात मोर्चा काढण्यात आला होता‌. तसेच तहसीलदार कार्यालयासमोर वीजबिले फाडून वाढीव बिलांचा निषेध करण्यात आला. त्यावेळी पंजाबराव यांनी सातरच्या दोन्ही खासदारांवर निशाणा साधला.
पंजाबराव पाटील म्हणाले, कोरोना काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकार वीज बीलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लुट करत असून ती कुठल्याही परिस्थिती खपवून घेतली जाणार नाही. सध्या शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणीही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज बिल भरू नये असे आम्ही जाहिरपणे सांगतो. शेतकरी अडचणीत असताना अशा परिस्थितीत कॉलर उडवणारे शांत तर मिशीला पीळ देणारे घरात बसल्याची टीका पंजाबराव पाटील यांनी केले.


95 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

सातारा दि. 22 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 95 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 4, खोजेवाडी 1, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, लिंब 4, 
*कराड तालुक्यातील* मसूर 1
*वाई तालुक्यातील* बावधन 3
*फलटण तालुक्यातील* फलटण 2, तांबवे 1, निंभोरे 1,  लक्ष्मीनगर 1, राजुरी 1, सगुनामाता नगर 2
*खटाव तालुक्यातील* नांदवळ 1, मांडवे 1, कातरखटाव 4, येराळवाडी 2, सिद्धेश्वर कुरोली 1,  नांदोशी 1, औंध 1, नेर 1, काटकरवाडी 1, फडतरवाडी 1, मायणी 1, अंबवडे 1,  
*माण तालुक्यातील* पवारवाडी 1, पिसाळवाडी 2, म्हसवड 1, दहिवडी 7, तुपेवाडी 2, भोवडी 1, बोडके 1, वावरहिरे 1, नरवणे 1, 
*कोरेगाव तालुक्यातील* न्हावी बु 1, कोरेगाव 5, ओगलेवाडी 1, आसनगाव 3, रणशिंगवाडी 1, वाठार स्टेशन 3, 
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 5,  शिरवळ 3, पळशी 1, खंडाळा 4, विंग 2, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 2, ताईघाट 1, 
*जावली तालुक्यातील* गणेशवाडी 1, कारंडी 1, महीगाव 1,  
  *इतर* हुबरणे 1,
*बाहेरील जिल्हृयातील* पुणे 1,
*1 बाधिताचा मृत्यु*
जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये पाडेगाव ता. खंडाळा येथील 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*एकूण नमुने -338585*
*एकूण बाधित -58031*  
*घरी सोडण्यात आलेले -55097*  
*मृत्यू -1848* 
*उपचारार्थ रुग्ण-1086* 

0000

, समजुतदारपणे सूचनांचं पालन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई
 देशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच जनतेशी संवाद साधला आणि लोकांना संभोधित केलं यावेळी ठाकरे म्हणाले,शिवरायांनी शत्रूशी लढण्याची जिद्द दिली.  कोरोनाचं युद्ध लढताना आपल्या हाती  मास्क हीच आपली ढाल आहे.
पाश्चिमात्य देशात लॉकडाऊन गेल्या एक दीड महिन्यापासून आहेत. ब्रिटनमध्ये तर वर्षभरापासून लॉकडाऊन. संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय अस सांगत समजुतदारपणे सूचनांचं पालन करा अस आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.


Sunday, February 21, 2021

53 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

सातारा दि. 21 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 53 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 2,  सदर बझार 1, बुधवार पेठ 1, तामजाई नगर 1, पिंपळवाडी 1, पोगरवाडी 1,  खिंडवाडी 1, बोरगाव 1, पिरवाडी गोरखपूर 2, 
*कराड तालुक्यातील* कराड 2, सोमवार पेठ 1,  मंगळवार पेठ 3, मलकापूर 1, साजूर 1, उंब्रज 1, शेणोली 1, 
*पाटण तालुक्यातील* बहुले 1, 
*वाई तालुक्यातील* कळंबे सर्जापूर 1, ब्राम्हणशाही 1, 

*फलटण तालुक्यातील* जाधववाडी 1, 
*खटाव तालुक्यातील* मायणी 1, खटाव 1, कातरखटाव 2,  
*माण तालुक्यातील* जाशी 1, दहिवडी 9, शेवरी 1, गोंदवले बु 1, 
*कोरेगाव तालुक्यातील*  कोरेगाव 2, आसनगाव 1, 

*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 1, पिंपरी बु 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* अकेगानी 1, 
*जावली तालुक्यातील*  मेढा 2, 
  *इतर* 1
*बाहेरील जिल्हृयातील* चेंबूर 1, 
*एकूण नमुने -337859*
*एकूण बाधित -57936*  
*घरी सोडण्यात आलेले -55090*  
*मृत्यू -1847* 
*उपचारार्थ रुग्ण-999* 

0000

Saturday, February 20, 2021

70 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

 सातारा दि. 20 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 70 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा उपचारादरम्यान  मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 7, संगमनगर 2, शहूपुरी 1, सैदापूर 1, कोडोली 1, वेळे 1, गोवे 1, देगाव 1, सातारा रोड 1, मोळाचा ओढा 1,
*कराड तालुक्यातील* मलकापूर 2, फडतरवाडी 1, पाडळी 3, गायकवाडवाडी 1, 

*पाटण तालुक्यातील* शेंडेवाडी 1, 
*वाई तालुक्यातील* आझर्डे 1, कवठे 2, माठेकरवाडी 1, , 

*फलटण तालुक्यातील* गुणवरे 1, 

*खटाव तालुक्यातील* नांदोशी 1, डंभेवाडी 1, जायगाव 1, पुसेगाव 1, कातरखटाव 2, मांडवे 2, 
*माण तालुक्यातील* दहिवडी 3, बिदाल 1, 
*कोरेगाव तालुक्यातील*  तारगाव 2, रुई 1, एकसळ 1, सासुर्वे 3, 

*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 1, लोणंद 1,  अहिरे 2, सुखेड 1, शिरवळ 2, 

*महाबळेश्वर तालुक्यातील* भिलार 4, महाबळेश्वर 1, पाचगणी 1, 
*जावली तालुक्यातील*  जावळी 1, करहर 1, पिंपळी 1, कारंडी 4, 
  *इतर* 1
*दोन बाधितांचा मृत्यू*
जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये इस्लामपूर, ता. वाळवा येथील 81 वर्षीय व खंडाळा येथील 57 वर्षीय महिला या दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान  मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने -335874*
*एकूण बाधित -57881*  
*घरी सोडण्यात आलेले -55049*  
*मृत्यू -1847* 
*उपचारार्थ रुग्ण-985* 

0000

Friday, February 19, 2021

.....आणि उदयनराजे पोहोचले शंभूराज देसाईंच्या घरी...

सातारा 
एकीकडे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले  यांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढत असताना, साताऱ्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे दिलजमाईचे संकेत आहेत. त्यानंतर आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. उदयनराजे भोसले हे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय खलबते रंगली.

दरम्यान, उदनयराजे आणि शंभूराज देसाई यांची ही काही पहिलीच भेट नाही. यापूर्वी अनेकवेळा दोन्ही नेते एकमेकांना भेटले आहेत. उदयनराजे आणि शंभूराज देसाई हे वर्गमित्र आहेत. यापूर्वीच्या भेटीत शंभूराज देसाईंनी ही माहिती दिली होती.
शंभुराज देसाई यांचे घराण्याचे घनिष्ठ संबंध आहेत. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत दोन दिवसात महत्वाच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार असल्याचे ते म्हणालेत. 8 मार्चपासून मराठा आरक्षण सुनावणी आहे. मराठा आरक्षणाबाबत कोणीही राजकारण करु नये. त्यादरम्यान अधिवेशन होत असल्यामुळे या विषयी चर्चा झाली. सातारा शहरात लष्कर प्रशिक्षण केंद्र आणण्याबाबत शंभुराज देसाईंसोबत चर्चा झाली. मराठा आरक्षणाबाबत लीड कायम मी घेतलंय पण आता ते गळाला आलंय. वकील सर्वच हुशार आहेत, परंतु जी आत्मियता लागते अशा वकिलांची नेमणूक करा. मी कोणाच्या विरोधात नाही पण यामध्ये विसंगती दिसून येते. जिल्हा बँकेची निवडणुक लागलीये याप्रश्नावर फलटणचे राजे,आमचे सातारचे राजे,लोकशाहीचे राजे कसली आखणी करताहेत हे काळ आणि वेळ सांगेल, असं उदयनराजे म्हणाले. 
उदयनराजे भोसले हे गेल्या काही दिवसांपासून दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात उदयनराजेंनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या.
दरम्यान, भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचे दिलजमाईचे संकेत आहेत. जावळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. “शिंदे साहेब तुम्ही आणि मी एकच आहोत हे बाहेरच्यांना माहित नाही. त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी आपल्या तिघांनाही कळत असतं” असं सूचक वक्तव्य सातारा-जावळीचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलं. त्यामुळे शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत घरवापसी करणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली. तर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडून आलेले खासदार उदयनराजे भोसले यांनीही खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. 14 सप्टेंबर 2019 रोजी उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. त्यानंतर भाजपने उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवलं.  त्यामुळे मूळचे राष्ट्रवादीचे असलेले दोन्ही राजे सध्या भाजपमध्ये आहेत.

77 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

 सातारा दि. 19 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 77 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 1, गोडोली 1, वाढे 1,शिनवार पेठ 1, सदर बझार 1, कासुरडे 1, आकले 1, शाहुनगर 1, गोजेगांव 1, 

*कराड तालुक्यातील* कराड 1, सावडे 2, खेर्डे 1,कालेटेक 1,  

*पाटण तालुक्यातील* वरपेवाडी 1, 

*वाई तालुक्यातील* रविवार पेठ 1, भुईंज 1, वासोले 1, कवठे 1,

*फलटण तालुक्यातील* फलटण 2, आसु 1, काळज 2, कोळकी 1, वाडळे 1, मंगळवार पेठ 1, पवार वाडी 1, 

*खटाव तालुक्यातील* खटाव 1, कातकरवडी 1, कातरखटाव 1, नेर 1, पुसेगांव 1, 

*माण तालुक्यातील* राजवाडी 1, दहीवडी 4, म्हसवड 1, 

*कोरेगाव तालुक्यातील*  कोरेगांव 2, सातेवाडी 1, वाठार स्टेशन 6, आसनगाव 3, 

*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 1, शिरवळ 3, अहिरे 2, लोणंद 2, देवघर 2, आसवली 1,

*महाबळेश्वर तालुक्यातील* भिलार 4, दरे 2,खिंगर 1,

*जावली तालुक्यातील*  जावली 1, हातगेघर 1, कुडाळ 2,आरडे 1,
  *इतर* वाल्हे गावठाण 2, 
बाहेरील जिल्ह्यातील 

*एकूण नमुने -333961*
*एकूण बाधित -57810*  
*घरी सोडण्यात आलेले -55016*  
*मृत्यू -1845* 
*उपचारार्थ रुग्ण-949* 

0000

पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील यांचे शिवछत्रपतीना अभिवादन...

कराड
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या  जयंतीनिमित् दत्त चौक कराड येथील त्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी तहसीलदार अमरदीप वाकडे, सुभाष पाटील(काका), नंदकुमार बटाणे, गंगाधर जाधव, सौरभ पाटील(तात्या), दादा शिंगन, संभाजी सुर्वे, शिवाजी पवार, अख्तर अंबेकरी, सादिक इनामदार, जयंत बेडेकर तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Thursday, February 18, 2021

कराडात लवकरच विमान प्रशिक्षण केंद होणार...


कराड :  
कराड मध्ये विमान प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या अनुषंगाने माजी  मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व विमान उड्डाण अकॅडमीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कराड विमानतळाची पाहणी केली.  येत्या दोन महिन्यात कराड मध्ये विमान प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

 शुक्रवारी पहिल्या दिवशी प्रशिक्षणासाठी एक विमान दाखल झाले असून दोन दिवसात आणखी एक विमान दाखल होत असल्याचे अकॅडमीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  प्रशिक्षणासाठी एकूण 8  विमाने असतील  60  विद्यार्थ्याची एक बॅच असेल. भारतात या पद्धतीची 10 विमान प्रशिक्षण केंद्र असून महाराष्ट्रात हे दुसरे केंद्र असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले
यावेळी अकॅडमीचे सीईओ परवेज दमानिया, डायरेक्टर अश्विन अडसूळ, मनोज प्रधान, विनोद  मेनन, विलास वरे यांच्यासह काँग्रेसचे कराड दक्षिण अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर अध्यक्ष राजेंद्र माने, इंद्रजीत चव्हाण,  नगरसेवक इंद्रजीत गुजर, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा आता 57 हजार पार...... सतर्कता बाळगा - ना शंभूराज देसाई यांचे आवाहन...

सातारा- जिल्ह्यात आज दिवसभरात 74 नवीन कोरोना बाधित सापडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा आता 57 हजार 825 वर पोहोचला आहे. राज्यात कोरोना बधितांच्या संख्या 5 हजाराच्या वर गेली असून आज 5 हजार 427 रूग्णांचे निदान झाले. राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 20 लाख 81 हजार 520 इतकी झाली आहे. राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 40 हजार 858 पर्यंत खाली आली आहे. ऍक्टिव्ह रुग्णांवर राज्यभरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबदारी घेतली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

दरम्यान, जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 55016 आहे. तर आज दिवसभरात सातारा जिल्ह्यात 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 1845 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतायत लोकांनी सतर्क राहावे, सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास पोलीस कारवाई करणार - गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 18 (जिमाका): राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबदारी घेतली पाहिजे. यासाठी   प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक गृह राज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
      रस्त्यावंर विना मास्क कोणी दिसल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना करुन  गृहराज्यमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, कोरोनाचा संसर्गाचा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील कमीत कमी 20 जणांची कोरोना चाचणी करावी. तसेच जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवावे. भाजी विक्रेते, दुकानदार, रेस्टॉरंटवाले यांची कोरोना चाचणी करण्यावर भर द्यावा.
नगर परिषद व मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये मास्क, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता या विषयी जनजागृती करावी. सध्या 100 नागरिकांच्या उपस्थित लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत आहे. परंतु लग्न समारंभात 500 ते 1000 नागरिक उपस्थित राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. जेथे लग्न समारंभ होत आहे तेथे भेट देवून शासनाने व प्रशासनाने दिल्या सूचनांचे पालन होते काय हे पहावे. पालन होत नसल्यास कारवाई करण्यात यावी. तसेच पोलीस विभागाने पेट्रोलींगचे प्रमाण वाढविले पाहिजे, अशा सूचना गृह (ग्रामीण)  राज्यमंत्री श्री. देसाई यांनी शेवटी केल्या.
00000