यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम युवा नेते रामकृष्ण वेताळ जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे तालुकाध्यक्ष धनंजय पाटील शहर अध्यक्ष एकनाथ बागडी माजी नगरसेवक सुहास जगताप श्री पेंढारकर महिला आघाडीच्या नेत्या सौ स्वाती पिसाळ सीमा घार्गे शीतल चौगुले
तसेच युवा नेते प्रशांत कुलकर्णी अजय पावसकर संतोष काळे दिलीप जाधव सागर माने धनंजय माने सुनील शिंदे सागर शिवदास धनंजय खोत विशाल कुलकर्णी दिलीप रामदासी शैलेंद्र गोंदकर नितीन शाह सौरभ शाह सागर मिरजकर मानसिंग कदम भरत देसाई धनंजय खैर संतोष हिंगसे रविकुमार अवसरे विषवनाथ फुटाणे ओंकार ढेरे प्रकाश जाधव गणेश मोहिते हर्षद मोहिते रमेश मोहिते सागर लादे नितीन वास्के तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले या सर्व राज्यातील विजयाचे श्रेय निवडणुकीत झटणारे सर्व कार्यकर्ते मतदार यांना दिले पाहिजे तसेच आपल्या देशाला स्वयंपूर्ण व सुरक्षित बनवायचे असेल तर नरेंद्र मोदिशिवाय पर्याय नाही हे जनतेने जाणले आहे विरोधातील इंडिया आघाडी ने या तिन्ही राज्यांत भाजप विरोधात कितीही अपप्रचार केला तरी जनतेने त्यांना थारा दिला नाही काहिठिकानी मोफत सुविधा देण्याची आश्वासने देत मतदारांना ओढण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला मात्र नरेंद्र मोदींवरील विश्वास आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम यामुळे भाजप ला याठिकाणी विजय मिळाला आहे महाराष्ट्रात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुती चे 45 हुन अधिक तर विधानसभेला 225 हुन अधिक उमेदवार निर्विवाद निवडून येतील असा विश्वास देखील जिल्हाध्यक्ष कदम यांनी व्यक्त केला
दरम्यान 3 राज्यातील भाजप च्या भरघोस यशामुळे सातारा जिल्हा भाजप च्या पदाधिकाऱ्यांनी कराडच्या चावडी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत व पेढे वाटून आनंद व्यक्त केला... देश का नेता कैसा हो...नरेंद्र मोदी जैसा हो...भाजप चा विजय असो...अशा घोषणांनी चावडी चौक दणाणून सोडला तेथे असलेल्या दुकानात जाऊन जिल्हाध्यक्ष कदम यांनी पेढे वाटप केले संगीताच्या तालावर सर्व पदाधिकाऱ्यांनी डान्स करत आपला आनंद त्याठिकाणी व्यक्त केला
No comments:
Post a Comment