Saturday, December 9, 2023

मराठ्यांकडे 20 टक्के तर, आमच्याकडे 80 टक्के मतं, ; भुजबळांनी OBC मेळाव्यात गणितच मांडलं!...भुजबळ म्हणाले...जरांगेवर कारवाई का नाही? आमचा संयम संपला तर...?

वेध माझा ऑनलाईन। मराठ्यांकडे 20 टक्के , आमच्याकडे 80 टक्के मतं आहेत. ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण आहे. प्रत्येक जमातीला ब्रॅकेट आहे.  ओबीसी समाजाला सरकारी नोकऱ्या फक्त 9 टक्के मिळाल्यात.  आधी 27 टक्के जागा भरा मग इतर गोष्टी करा, असे म्हणत छगन भुजबळ  यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडले.  इंदापूर येथील सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका, आमची इतर कोणताही मागणी नाही, असेही भुजबळ यावेळी म्हणाले. 

ते म्हणाले  ... आरक्षण हा गरिबी हटावण्याचा कार्यक्रम नाही आरक्षणावर अनेक नेते बोलायला तयार नाहीत. कसली भीती वाटते आहे? मतांची भीती वाटते का? त्यांच्याकडे मते आहेत आमच्याकडे नाहीत का? त्यांची 20 टक्के आणि 80 आमची आहेत. हर्षवर्धन पाटील, विजयसिंह पाटील तुम्हाला कुणबी सर्टीफिकेट पाहिजे आहेत का? सांगा ना पाहिजे का नाही? तळागाळातील लोकांना वरती आणले पाहिजेत, आमचे लोक गरिब का राहिले असते पण त्यांना काही कळतच नाही. आम्हाला 27 टक्के आरक्षण आहे. यात अनेक जाती आहेत. सरकारमध्ये फक्त आम्हाला 9 टक्के आरक्षण आहे. ते 27 टक्के भरा मग बाकीचे काही करा. लोकसेवा आयोगात 85 टक्के मराठा समाज आहे, सारथी, अण्णाभाऊ साठे, ews मधील 85 टक्के मराठा समाजाचे, कुणबी आहेत ते आमच्यात आहे. पंजाबराव देशमुख कृषी योजना त्यात मराठा समाज आहे, असे म्हणत भुजबळ यांनी सगळे गणीतच मांडले.

मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देणं ताबडतोब थांबवा
कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात जाती निहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामध्ये अडचण काय आहे? बिहार करू शकते तर तुम्ही का जनगणना करीत नाही. मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यायचे सुरु आहे ते थांबवा. न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे जात आहेत आणि करून घेत आहेत. आमच्या 27 टक्केंतील आरक्षण दिले पाहिजे. पण ओबीसी मधून आरक्षण देता कामा नये. हे जर ऐकू कुणाला गेलं नाही, न्याय आपल्याला मिळाला नाही. तर पडळकर म्हणाल्याप्रमाणे सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है.. असंच करावे लागेल. 

कायदा फक्त आम्हालाच का? जरांगेंवर कारवाई का नाही? 
मी काही बोललो की, काही विद्वान लोक बोलायला लागतात की दोन जातीत भांडणे लागत आहेत. जरांगे यांच्या सभा रात्री उशिरा चालते, पोलीस कारवाई करीत नाही. कायदा फक्त आपल्याला त्यांना नाही. मी 15 दिवसांनी एकदा बोलतो, सौ सुनार की एक लोहार... काही बोलावे लागते, सगळंच ऐकून घ्यायची सवय नाही.  राज्यात अशांतता निर्माण कोण करते? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला  

 भुजबळांचे जरांगेंना चॅलेंज -
जरांगेची सभा होती म्हणून अधिकर्यांनी सुट्टी जाहीर केली. अधिकर्यांना अधिकारी म्हणून वागणूक असली पाहिजे. तो येवल्याचे एडपट म्हणतो. 1985 साली त्यांचा जन्म झाला होता की नाही त्यावेळी महापौर आणि आमदार झालो होतो. तू ग्रामपंचायत सरपंच होऊन दाखव, असे आवाहनही यावेळी भुजबळांनी जरांगेंना दिले. 

आमचा संयम संपला तर...
घनसावंगी येथे नेत्यांना गावबंदी आणि त्याच शेजारी रोहित पवार यांचे स्वागत. त्याच गावात एका तरुणाने प्रश्न विचारला तर तो दुसऱ्या दिवशी दवाखान्यात होता, त्याला मारहाण केली. पोलिसांना सांगितले गाव बंदीचं बोर्ड काढा पण काढले नाहीत. आमचा संयम संपला तर  क्रोधाला कुणीही आवर घालू शकत नाही.. त्यामुळे पोलिसांनी , सरकारनं लवकर लक्ष घालावे, असे भुजबळ म्हणाले. 

...यांना घाबरलात तर मातीमोल व्हाल - 
24 डिसेंबरनंतर भुजबळ, सरकारला बघतो म्हणतो. सरकार पण ऐकून घेतय. घाबराल, हिंम्मत जर हारलात तर मातीमोल व्हाल. म्हणून भीतीला मारा, असे भुजबळांनी आव्हान केले.  प्रकाश आंबेडकर यांचे आम्ही आभारी आहोत. पवार साहेबांना आणि इतर नेत्यांना मला सांगायचे आहे. तुमचा राग माझ्यावर असू शकतो पण माझा राग ओबीसी वर काढू नका. तुम्ही ओबीसी लढाई लढलात. पण वाचवण्यासाठी पण तुम्हीच यायला पाहिजे राग काढण्याची ही वेळ नाही, असे भुजबळ म्हणाले. 


No comments:

Post a Comment