वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला असला, तरी निवडणूक प्रक्रियेवरून होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मात्र अजूनही सुरूच आहेत. निवडणूक निकाला विरोधात याचिका दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 35 आमदारांच्या विरोधात याचिका दाखल झाल आहेत. याचिका मुंबई आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल झाले असून विजयी उमेदवारांच्या निवडीला आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीतील कवित्व अजूनही पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमधील बारा पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. सर्वाधिक महिला अहिल्या नगर जिल्ह्यातून आठ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीमधील पराभूत झालेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रशांत जगताप, अजित गव्हाणे, महेश कोठे, नरेश मणेरा, सुनील भुसारा, मनोहर मढवी, राहुल कलाटे, वसंत गीते, संदीप नाईक, रमेश बागवे यांनी उच्च न्यायालयामध्ये निवडणूक निकाल विरोधामध्ये धाव घेतली आहे,
No comments:
Post a Comment