वेध माझा ऑनलाइन
धनंजय मुंडे हे पाप करण्यासाठी ओबीसींचा आसरा घेतात, आपली पापं झाकण्यासाठी ते ओबीसींच्या मागे लपतात अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत आपण मागे हटणार नाही, त्यांने कितीही गुन्हे दाखल केले तरी बेहत्तर असंही जरांगे म्हणाले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील पैठण येथे मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मनोज जरांगे बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले की, "संतोष देशमुखांच्या भावाला धमक्या दिल्यानंतर आपण त्या गुंडांच्या विरोधात बोललो. तर आपल्यावरच केसेस दाखल करण्याचं षडयंत्र केलं जातंय. हे काम धनंजय मुंडे यांच्या लाभार्थी बगलबच्च्यांचं काम आहे. तुमच्या लाभार्थी टोळींना आंदोलनं करायला लावता, आरोपीच्या मागे उभे राहता. हे चुकीचं नाही का? उद्या तुमच्या घरातील कुणी मेले तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का? जर आरोपीला साथ द्यायचं असं झालं तर राज्यात इतर ठिकाणीही असेच प्रकार घडतील."
No comments:
Post a Comment