वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्रात सध्या भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात सलोखा होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक होत आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचीही भेट झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत चांगल्या गोष्टी ठाकरे यांची शिवसेना बोलू लागली आहे. त्यावरुन शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे
शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले की, जे घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणत होते, मुख्यमंत्री देवेंद्रजींना यांना फडतूस म्हणत होते, एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील, अशी टोकाची भाषा बोलणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असे वाटले नव्हते. सरडा रंग बदलतो पण अशा प्रकारची नवीन जात मी पहिल्यांदा बघितली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, लोकांनी ज्यांना झिडकारल, लोकांच्या, बाळासाहेबांच्या, हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा केली, त्यांना जनतेने जागा दाखवून दिली, मतदारांनी त्यांचा कचरा केला. ‘तुम लढो हम कपडे सांभालते’ हे तसे ‘तुम लढो हम बुके देके आते’ असे करत आहेत.
No comments:
Post a Comment