वेध माझा ऑनलाइन
नागपूरमध्ये राजभवन येथे 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी महायुतीत अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रीमंडळात डच्चू देण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आले आहे. यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चेला उधाण आलं आहे. अशातच आता छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना मोठे आवाहन केलं आहे.
याशिवाय राज्यातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन मी पुढचा विचार करणार आहे. तसेच लोकशाहीत तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कारण राज्यात कुठेही वातावरण बिघडू नका असं मी सांगितल आहे. तसेच मला मंत्रिपद कोणी नाकारलं? हे शोधण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. तसेच माझं मंत्रिपद कोणी नाकारलं हे देखील शोधावं लागणार आहे.तसेच प्रत्येक पक्षाचा निर्णय प्रमुख घेत असतो. त्यामुळे भाजपचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात, तर शिवसेनेचा निर्णय हा एकनाथ शिंदे घेतात. अगदी त्याप्रमाणे आमच्या गटाचा निर्णय अजित पवार घेतात असे आमदार छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, प्रत्येकाला मंत्रिपद हवं असतं. परंतु, प्रश्न मंत्रिपदाचा नाही, मात्र ज्याप्रकारे अवहेलना करण्यात आली, त्याचा आहे. तसेच मला त्यांनीच लोकसभेत उभे राहा असे सांगितलं होतं. तर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देखील सांगितले आहे. तर सगळी तयारी झाली सर्व लोक आले आहेत. तर त्यांना आठ पंधरा दिवसात नाव जाहीर करायचे होते. मात्र त्यांनी एक महिना लावला मी माघार घेतली असं देखील छगन भुजबळ म्हणाले आहेत.
No comments:
Post a Comment