वेध माझा ऑनलाइन
बीड जिल्ह्यातील मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. तीन आरोपींचा खून झाला असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलेला आहे. त्यांच्या या दाव्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे.
बीड मधील राजकीय गुन्हेगारीचा आणि गुंडाशाहीचा प्रश्न सारखा समोर येत आहे. आणि यामुळेच पोलिस यंत्रणा आणि सीआयडीच्या तपासावर मोठे प्रश्नचिन्ह देखील उपलब्ध केले जात आहे. सरपंच संतोष देसाई यांच्या आरोपींना अटक करा अशी मागणी लोकांनी केलेली आहे. आणि त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी बीडमध्ये आज मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. अंजली दमनिया या ठिय्या आंदोलन करणार आहेत. आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणार आहे असे माहिती त्यांनी दिलेली आहे.
बीड मधील सर्वपक्षीय मोर्चा बद्दल बोलताना अंजली दमानिया यांनी सांगितले की, “सध्या तेथे राजकीय नाटक सुरू झालेले आहे. दीपक क्षीरसागर, सुरेश धस हे दुसरे धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडच आहेत. ते आपापल्या क्षेत्रातील काम करतात. अशा लोकांनी बोलावं हे हास्यास्पद आहे. आम्ही हातभर माणसं जोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा स्वीकारत नाही आणि वाल्मीक कराडला अटक केली जात नाही. तोपर्यंत आंदोलन करणार आहे.”
यापुढे अंजली दमानिया यांनी सांगितले की, “आरोपींना अटक करण्याची मागणी घेऊन आम्ही आलो होतो. परंतु मला एक अत्यंत धक्कादायक बातमी सांगायची आहे. ती म्हणजे काल रात्री जवळपासच्या 11. 30 आसपास मला फोन आला आणि त्यात सांगण्यात आले की, ते तीन आरोपी आता तुम्हाला कधीच मिळणार नाही. कारण त्यांचा मर्डर झालेला आहे. हे ऐकून मी ताबडतोब पोलीस निरीक्षकांना फोन करून त्याची माहिती दिली. ते मेसेज त्यांना सांगितले. त्याची चौकशी ते करतील परंतु मला यात कितीपत सत्यता आहे हे ठाऊक नाही. परंतु जर असं झालं असेल तर हे अत्यंत भयानक आहे.”
No comments:
Post a Comment