वेध माझा ऑनलाइन।
शिवसेना जर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली नसती तर 14 ते 19 पर्यंत सारखाच कारभार झाला असता आणि त्या कारभाराच्या आधारावर याहून अधिक जागा आल्या असत्या. उद्धव ठाकरे सोबत असते तर आज जेवढं बहुमत मिळाले त्यापेक्षा जास्त बहुमत मिळालं असतं", असं वक्तव्य भाजप ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका वाहिनीशी बोलताना केलं होतं. आता दानवेंच्या या वक्तव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे आमच्या सोबत असते तर आमच्या अजून जागा आल्या असत्या अस रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या विधानांवर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे. त्यांचं हे मत जर देवेंद्र फडणीस यांना मान्य असेल तर आम्हालाही मान्य असणार आहे, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment