Sunday, May 11, 2025

100 हून जास्त दहशतवाद्यांचा खात्मा / 35 ते 40 पाकिस्तानी सैनिकांसह अनेक अधिकारीही मारले गेले;

वेध माझा ऑनलाइन।
पहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला असून मुरिदके, भावलपूरसह नऊ ठिकाणी हल्ले करुन 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना मारल्याची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. पाकिस्तानच्या दहशतवादाला उद्ध्वस्त करणे हेच ऑपरेशन सिंदूरचे ध्येय असल्याचंही ते म्हणाले. भारतीय सेनेच्या कारवाईत 35 ते 40 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा झाला असून त्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे अशी माहिती देण्यात आली. ऑपरेशन सिंदूरमध्ये करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी लष्कराच्या तीनही दलांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

No comments:

Post a Comment