वेध माझा ऑनलाइन
भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या मोहीमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले होते. या ऑपरेशनतंर्गत पीओकेमधील 9 ठिकाणी क्षेपणास्त्रांचा मारा करुन दहशतवादी तळ बेचिराख करण्यात आले. अवघ्या 25 मिनिटांत भारतीय वायूदलाने ही सगळी कामगिरी पार पाडत पाकिस्तानी सैन्याला चपराक लगावली. भारताची क्षेपणास्त्रे पाकिस्तानच्या रडारला पत्ता लागून न देता अचूक जाऊन लक्ष्यावर आदळली. भारतीय वायूदलाच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कर प्रचंड धास्तावले होते. त्यामुळे पाकिस्तानमधील प्रमुख शहरांमध्ये बुधवारी रात्री ब्लॅकआऊट करण्यात आला होता
दरम्यान पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे जवान दिनेश कुमार शहीद, 15 नागरिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे
No comments:
Post a Comment