वेध माझा ऑनलाइन
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यामध्ये बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय देखील समाविष्ट होते. ते नष्ट करण्यासाठी भारताने त्याचे सर्वात शक्तिशाली शस्त्र वापरले.
वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला भारताविरोधात बळ दिलं. त्यामुळेच भारताला त्यावर कडक उपाययोजना करत त्याच्या सर्वात शक्तिशाली शस्त्राचा वापर करावा लागला. पण हे सर्वात शक्तिशाली अस्त्र कोणतं हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ यांनी रविवारी संवाद साधताना काही संकेत दिले. ते म्हणाले की, "भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी ब्राह्मोसचा वापर केला. ब्राह्मोसचा आवाज रावळपिंडीपर्यंत ऐकू येत होता."
No comments:
Post a Comment