Sunday, May 11, 2025

नरेंद्र मोदी म्हणाले...पाकिस्तानमधून गोळ्या झाडल्या तर भारतातून तोफगोळे डागले जातील; अमेरिकेच्या मध्यस्तीनंतर नव्हे तर भारताने स्वतःच्या अटींवर शस्त्रसंधीची घोषणा केल्याची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन।
पाकिस्तानमधून गोळ्या झाडल्या तर भारतातून तोफगोळे डागले जातील असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. ऑपरेशन सिंदूर थांबणार नसून ते सुरुच असल्याचं भारताने स्पष्ट केलं. तसेच अमेरिकेच्या मध्यस्तीनंतर नव्हे तर भारताने स्वतःच्या अटींवर शस्त्रसंधीची घोषणा केल्याची माहिती आहे. 
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानवर अशा जखमा केल्या आहेत ज्या भरून येण्यास बराच वेळ लागेल. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याने 100 हून अधिक दहशतवाद्यांना नरकात पाठवले आणि 9 दहशतवादी तळ आणि पाकिस्तानचे लष्करी पायाभूत सुविधा नष्ट केल्या.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने जगभरातील मित्र राष्ट्रांशी चर्चा केली होती. या संभाषणात ऑपरेशन सिंदूरबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नसली तरी, भारताने ज्या देशांशी चर्चा केली त्या सर्व देशांना स्पष्टपणे सांगण्यात आले की यावेळी कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात भारताची भूमिका अगदी स्पष्ट होती.

No comments:

Post a Comment