वेध माझा ऑनलाइन
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावात अमेरिकेने मध्यस्थी केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानने काल (10 मे) सायंकाळी युद्धबंदी जाहीर केली. मात्र युद्धबंदीनंतरही भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरुच राहणार असल्याचं भारतीय वायुसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही, अशी अधिकृत भूमिका भारतीय वायुसेनेकडून स्पष्ट करण्यात आली आहे. आतापर्यंत दिलेली जबाबदारी वायूदलानं चोखपणे बजावली आहे. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील भारतीय वायुसेनेने म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment