वेध माझा ऑनलाइन
भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर तो देश अनागोंदीच्या दिशेने चालला असल्याचं चित्र आहे. पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची उचलबांगडी केली जाणार आहे. असीम मुनीर याच्या हेकेखोरीमुळे पाकिस्तानवर युद्धाची वेळ आली असल्याचं मत तिथल्या नागरिकांचे आणि सत्ताधाऱ्यांचं झाल्याची माहिती आहे. त्याचमुळे असीम मुनीर याच्यावर देशद्रोहाचा खटलाही चालवला जाणार असल्याची माहिती आहे. पाकिस्ताच्या लष्करप्रमुखपदी आता शमशाद मिर्झा यांची नियुक्ती होण्याची चर्चा आहे. असीम मुनीर हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची भावना भारताची आहे. त्याच्या चिथावणीनंतरच दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांना चिथवायचं आणि नंतर भारताने प्रतिक्रिया दिल्यावर भारतावर हल्ला करायचा असा असीम मुनीर याचा डाव होता. पाकिस्तानी जनतेची आणि राज्यकर्त्यांची इच्छा नसतानाही असीम मुनीरच्या खुमखुमीमुळे पाकिस्तानवर युद्धाची वेळ आली असल्याची समज सर्वत्र आहे. आधीच पाकिस्तानची परिस्थिती ही डबघाईला आली होती. त्यात भारतासोबत कुरापत काढून असीम मुनीरने ही परिस्थिती आणल्याची भावना तिथल्या लोकांची आहे.
No comments:
Post a Comment