Sunday, May 11, 2025

100 वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल,: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वेध माझा ऑनलाइन।
मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर, राज्यभरातून शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. संतापाची लाट पाहून सरकारने लवकरच पहिल्यापेक्षा उत्तम आणि दिमाखदार पुतळा उभारण्यात येईल, असे म्हटले होते. त्यानुसार, आज सिंधुदुर्गातील मालवण किल्ल्यावर छत्रपतींचा नवा पुतळा दिमाखात उभा राहिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण झाले. सुतार साहेबांनी उत्तम पुतळा तयार केलाय. जर वादळं आली, त्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करत हा पुतळा उभा करण्यात आला आहे. किमान 100 वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळा अनावरण सोहळ्यानंतर बोलताना दिली.

No comments:

Post a Comment