वेध माझा ऑनलाइन
यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील अॅलर्ट झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आज पूरस्थितीचा आढावा घेतला. संभाव्य पूरस्थिती रोखण्यासाठी प्रशासनाने काय तयारी केली, याची माहिती त्यांनी संबंधितांकडून घेतली.
पूरपरिस्थितीच्या नियोजनाबाबत जयंत पाटील यांनी पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात संभाव्य पूर नियंत्रणाबाबत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. संभाव्य पूराचा धोका टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, पावसाच्या अतिरिक्त पाण्याचे नियोजन आदीचा आढावा घेतानाच शेजारच्या राज्यांशीही चर्चाही सुरू आहे आणि पावसाळा सुरू होण्याआधीही बैठका घेतली जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली तसेच संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यंत्रणा अॅलर्ट.....
2019 मध्ये पश्चिम महाराष्ट्राला पुराचा मोठा फटका बसला होता. त्यावेळी जयंत पाटील लोकांच्या मदतीला स्वतः उतरले होते. पाटील यांना स्वतः अनेक अडचणींचा त्यावेळी सामना करावा लागला होता. म्हणूनच या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेता पाटील यांनी संपूर्ण यंत्रणा अगोदरच अॅलर्ट केली आहे. या बैठकीला कृष्णा खोरे कार्यकारी संचालक मुंडे, मुख्य अभियंता गुणाले, राजपूत, सांगलीचे अधिक्षक अभियंता नाईक, पुणे अधिक्षक अभियंता चोपडे, प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता विजय पाटील आदी उपस्थित होते.
नदीचे वाहून जाणारे पाणी या कालावधीत, म्हैसाळ प्रकल्पमर्फत दुष्काळी भागाला सोडावे, सर्व तलाव, बंधारे भरून घ्यावेत, यामुळे जत, Kavtemahankal या भागात जमिनीतील पाणी पातळी उंचावेल व भाग सधन होण्यास मदत होईल.
ReplyDelete