कराड
गेल्या आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे त्याप्रमाणे कोयना धरणातून पाण्याचा केलेला विसर्ग यामुळे कोयना नदीला पूर येऊन या पुराचे पाणी कराड शहरातील काही भागातील घरात शिरले विशेषता पाटण कॉलनीतील रहिवाशांच्या घरात पाणी असल्याचे समजतात कराड नगर परिषदेचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी तात्काळ रात्रीच्या वेळी पाटण कॉलनी येथे धाव घेऊन येथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले त्यांना कराड परिषदेच्या शाळेत सर्व कुटुंबासहित ठेवण्यात आले आहे जोपर्यंत पूर परिस्थिती कमी होऊन जनजीवन पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत पूरग्रस्तांना चहा नाष्टा व जेवणाची जबाबदारी तसेच त्यांच्या आरोग्यासाठी लागणारे औषधे सर्व सुविधा पुरवण्याचे काम गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी हाती घेतले आहे
ज्या ज्या वेळी कराड शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली त्या त्या वेळी राजेंद्रसिंह यादव पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहेत राजेंद्रसिंह यादव यांनी पूरग्रस्तांच्या बद्दल घेतलेली सहकार्याची भूमिका याबद्दल पूरग्रस्तांनी राजेंद्रसिंह यादव यांना धन्यवाद दिले आहे यावेळी कराडनगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके नगर अभियंता ए आर पवार विजयसिंह यादव नगरसेवक हणमंतराव पवार बाळासाहेब यादव किरण पाटील गजेंद्र कांबळे निशांत ढेकळे ओमकार मुळे बापू देसाई नरेंद्र लिबे तसेच राजेंद्रसिंह यादव, विजय यादव मित्रपरिवार उपस्थित होते
तसेच कराड तालुक्यातील येरवळे येथे वांग नदी पात्राचे पाणी बौद्ध वस्तीत शिरल्याने येथील रहिवाशांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला ही माहिती मिळतात गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी तात्काळ येरवळे येथे जाऊन तेथील रहिवाशांची चौकशी करून जोपर्यंत पूर परिस्थिती कमी होत नाही तोपर्यंत बौद्ध वस्तीमधील रहिवाशांना अन्नदान सेवा देण्याची जबाबदारी राजेंद्रसिंह यादव यांनी घेतली आहे त्यांच्या दातृत्वामुळे येरवळे येथील रहिवाशांनी यादव यांना धन्यवाद दिले आहेत
आपल्या गावासाठी धावून आलेले राजेंद्रसिंह यादव यांचे गावकऱ्यांनी आभार मानलेत
No comments:
Post a Comment