Sunday, February 4, 2024

गुलाल उधळला मग, आता... परत उपोषण कशासाठी ? छगन भुजबळांचा जरांगे- पाटील यांना सवाल ...

वेध माझा ऑनलाइन। मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील चलो मुंबईचा नारा देत आंदोलन पुकारले. त्यानंतर सरकारने सगेसोयरेचा अध्यादेश काढून मराठा आंदोलनाची यशस्वी समाप्ती केली. या घटनेनंतर ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी या अध्यादेशावर हरकती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शनिवारी नगर येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ पूर्ण झाल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. मग आता मागासवर्गाचे सर्वेक्षण कशासाठी सुरु आहे असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाले म्हणून जरांगे यांनी गुलाल उधळला आहे. मग आता जरांगे पुन्हा उपोषण नेमके कशासाठी करताय असाही सवालही भुजबळ यांनी केला आहे.


बातमी...

No comments:

Post a Comment