Saturday, May 16, 2020

संवेदनशील मनाचे नेते ; उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील

अजिंक्य गोवेकर
कराड
येथील पालिकेचे उपनगराध्यक्ष जयवंत(दादा)पाटील यांनी  आपल्या संवेदनशीलतेचे दर्शन नुकतेच शहराला दाखवून देत इतरांसमोर आपला आदर्श निर्माण केला आहे असे आता म्हणावे लागेल.कोरोना मुक्त रुग्णाचा खास त्या ठिकाणी जाऊन सत्कार करून त्या रुग्णाला मानसिक आधार देण्याचे  काम त्यांनी नुकतेच केले आहे. आपल्या माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने त्यांनी कळत न कळत दिल्याने राजकारन्यातील संवेदनशील माणूस त्यांच्यारूपाने कराडकरांना दिसला आहे.
सर्वत्र सध्या कोरोनाच्या थैमानाने सगळेच जण अक्षरशः भयभीत अवस्थेत आपले जीवन व्यथित करीत आहेत. अशा वेळी या लोकांना धीर देण्याची  गरज आहे.येथील रुक्मिणीनगर मधील एका महिलेला कोरोना झाल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाले.त्या महिलेची येथील खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर ती महिला पॉझिटिव्ह आहे असा अहवाल आला होता.त्यानंतर या महिलेला येथील कृष्णा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी या महिलेला कोरोनामुक्त म्हणून डिस्चार्ज देण्यात आला.
 सदर महिला मूळची मंगळवार पेठेतील आहे. त्यांच्या कुटुंबाचा जयवंतराव पाटील यांच्या कुटुंबाशी स्नेह आहे. सदर महिलेला डिस्चार्ज मिळाल्याचे समजताच दादां कृष्णा हॉस्पिटल येथे गेले. दादांना  पाहून प्रचंड दडपणाखाली असलेली ही रुग्ण महिला रडू लागली. त्यावेळी त्या महिलेचे सांत्वन करत दादांनी व कृष्णाच्या डॉक्टर्सनी त्याठिकानि तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व तिला मानसिक आधारही दिला.संवेदनशील जयवंतदादांची सामाजिक बांधिलकी व जनतेप्रती त्यांचा असणारा कर्तव्यदक्षपणा यानिमित्ताने कराडकरांसमोर आला.
राजकारण म्हटलं की... लोकांचा राजकारण्यांकडे बघण्याचा वेगवेगळा ड्रीष्टिकोन असतो मात्र येथे जयवन्तदादा सारखे लोकही आहेत की ज्यांना माणुसकी व इतरांच्या भावनांची कदर आहे हे या  घटनेमुळे लोकांना समजले. लॉक डाऊन काळात दादांनी दोन हजार कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप कोणतीही जाहिरातबाजी न करता केलं.लोकांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी दादा नेहमीच सतर्क व सज्ज असतात.शहराचे जबाबदार नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अतिक्रमण मोहिमेत व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानास मुख्याधिकारी डांगे हेच जबाबदार आहेत,डांगेनि शहराच वाटोळं केलं अशी रोखठोक व लोकांच्या मनातील प्रतिक्रिया देणारे शहरातील व्यापाऱ्यांचे ते नेते आहेत.याच कारणाने दादांना आपल म्हणणारा माणूस त्यांच्यापासून कधीच लांब गेलेला पाहायला मिळत नाही हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते.


No comments:

Post a Comment