Friday, February 3, 2023

पाणीप्रश्नाबाबत कराडचे माजी नगरसेवक थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला ; ..... अन्यथा कराडात जनआंदोलन उभे करणार ; दिला निवेदनातून इशारा ; या योजनेची सखोल चौकशी करण्याचीही केली मागणी ;

वेध माझा ऑनलाईन - कराडचे पाणी पेटले असल्याची परिस्थिती कराड शहरात निर्माण झाली असतानाच आज कराडच्या काही माजी नगरसेवकांनी थेट साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यानाच या संदर्भात निवेदन देत कराडची पाणीपट्टी पूर्वीप्रमाणेच लागू करा किंवा या बिलावर 30 टक्के सवलत द्या अन्यथा कराडात जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा दिला आहे या योजनेची सखोल चौकशीही झाली पाहिजे अशी मागणीही या निवेदनातुन करण्यात आली आहे

आज कराडचे माजी नगरसेवक फारुख पटवेकर, इंद्रजित गुजर अप्पा माने संजय शिंदे तसेच त्यांचे सहकारी ऍड अमित जाधव आदीनी सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी याची भेट घेऊन त्यांना कराडच्या वाढीव पाणीपट्टी बिलाबाबत निवेदन दिले

निवेदनात म्हटले आहे की, कराडच्या वाढीव पाणीबीलाची भरमसाठ रक्कम शहर वासीयांना परवडणारी नाहीये या निर्णयामुळे लोक त्रस्त आहेत 24x7 पाणीपुरवठा योजनेसाठी म्हणून लोकांकडून 2500 रुपये पालिकेकडून घेण्यात आले मात्र सकाळी आणि सायंकाळी एक- एक तास पाणी पुरवठा नागरिकांना होत आहे बसवलेल्या या नवीन मीटर मधून येणाऱ्या हवेच्या बिलासाहित पाण्याची भरमसाठ बिले येत असल्याने नागरिकांमध्ये  मोठा रोष आहे अनेक वर्षापासून रखडलेली ही योजना अद्यापही पूर्ण झालेली नाही  इथून पुढे शहरवासीयांना पूर्वीप्रमाणेच पाण्याची बिले देण्यात यावीत किंवा 30 टक्के सरसकट सवलत नागरिकांना या बिलात मिळावी अन्यथा जनआंदोलन उभे करू असा इशारा देत या योजनेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही या निवेदनातुन करण्यात आली आहे
दरम्यान कराड शहरात पालिकेने मीटर प्रमाणे पाणी बिल आकारणी सुरू केली आहे  यामधून बिलाची रक्कम भरमसाठ आल्याने कराडच्या लोकशाही आघाडीने पाणी बिलात नागरिकांना 20 टक्के सूट द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर शहर काँग्रेस तसेच बाळासाहेबांची शिवसेनेचे शहर अध्यक्ष राजेंद्र माने यांनी सी ओ डाके यांची भेट घेऊन 30 टक्के सवलतीची मागणी केली आहे यशवन्त विकास आघाडीने तर  50 टक्के सवलत देण्याची मागणी केली आहे आणि कराडच्या माजी नगरसेवकांनी आज थेट जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेऊन याबाबतची आपली मागणीदेखील केली आहे दरम्यान याबाबत कराडचे सी ओ डाके यांनी कालच स्पष्ट केले आहे की याबाबत आपण कोणताही निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही याविषयावरचा अंतिम निर्णय 6 फेब्रुवारीला सर्व पक्षीय नेत्यांना बोलावून त्यांच्यासमोरच घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे दरम्यान या माजी नगरसेवकांच्या भेटीनंतर जिल्हाधिकारी जयवंशी यांनी कराडचे सीओ रमाकांत डाके याना या प्रश्नाविषयी योग्य तो निर्णय घ्या अशी फोन करून तात्काळ सूचना केल्याची माहितीही या नगरसेवकांनी दिली

No comments:

Post a Comment