Monday, March 23, 2026

भरधाव ओम्नी गाडीने कोल्हापूर नाका ते कन्याशाळा परिसरात येइपर्यंत 3 ते 4 जणांना उडवले ; त्यात एका माजी नगरसेवकांचा समावेश ; उपचारासाठी सर्वांना कोटेजमध्ये केले ऍडमिट ;


वेध माझा ऑनलाइन।
एका  भरधाव ओम्नी गाडीने कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका मार्गे कन्याशाळा परिसरापर्यंत येईतोपर्यंत 3 ते 4 जणांना उडवल्याची घटना नुकतीच (म्हणजे आज रात्री 12 च्या सुमारास) घडली आहे त्यात एक महिला गंभीर असून जखमीमध्ये एका माजी नगरसेवकांचा समावेश आहे सर्व जखमींना उपचारासाठी कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे समजते
घटनास्थळी पोलीस पोहोचले असून त्यांनी ओमनी ड्राईव्हरला ताब्यात घेतले आहे 
3 ते 4 जणांमध्ये काहीजण गंभीर आहेत अशीही माहिती आहे

सातारा पोलीस अधीक्षकांना आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा; नीलम गोरे यांचे आदेश ; वस्तुस्थिती अहवाल न मागवता पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश कसे दिले? मंत्री जयकुमार गोरेंचा सवाल ; निलंबन तात्काळ स्थगित करण्याचे गोरेंची मागणी;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष  भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीचे पडसाद आज विधिमंडळात उमटल्याचं पाहायला मिळालं. सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन विधान परिषदेत भाजप आणि शिवसेनेत जुंपली. सातारा पोलीस अधीक्षकांना आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, जिल्हा परिषद आवारातील सीसीटीव्ही फुटेज सादर करावं. या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावं, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. पण, आता निलम गोऱ्हे यांनी दिलेले आदेश कायम राहणार का?  असा प्रश्न उपस्थित होत आहे. सभापती राम शिंदे निलम गोऱ्हे यांच्या आदेशाला स्थगिती देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा SP यांच्या निलंबनाचे आदेश कायम राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सभापती राम शिंदे हे, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देणार की, आदेश कायम ठेवणार? याबाबत चर्चा सुरू आहेत. 
भाजपच्या करारनाम्याचा शिवसेनेकडून हिशेब घेण्यात आला.  भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'मुळे महायुतीतील शिंदेसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन सदस्य फुटल्याने भाजपची सत्ता आली. या घडामोडींचे विधिमंडळात आणि राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत. 
 सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन विधान परिषदेत भाजप शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. एसपीचं निलंबन करण्याचे आदेश उपसभापती निलम गोऱ्हेंनी सरकारला दिले आहेत. सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

मंत्री गोरे म्हणाले...
दरम्यान  वस्तुस्थिती अहवाल न मागवता पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश कसे दिले? असा सवाल मंत्री जयकुमार गोरेंनी केलाय. एसपींचं निलंबन तात्काळ स्थगित करण्याची मागणी जयकुमार गोरेंनी केलीये.
 
जयकुमार गोरेंचे आक्षेप...
शंभुराज देसाई,मकरंद पाटील हे मंत्री जि.प.आवारात गेलेच कसे?
देसाई,पाटील या मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश का मोडले? 
वस्तुस्थिती समजून न घेता चर्चेवर आधारीत निलंबनाचे आदेश कसे दिले?
जि.परिषद निवडणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था का मोडली?
बंदोबस्तावरील पोलिसांना शिवीगाळ का केली?
पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश स्थगित करा
जि.परिषद आवारात पाच हजार कार्यकर्ते कोणाच्या आदेशाने आले?

सातारा जि. परिषदेत शिवसेना-राष्ट्रवादी युतीनं 65 पैकी 35 जागा मिळवून बहुमत स्पष्ट केलं. तर, भाजप 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. साताऱ्यात बहुमतासाठी 33 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपनं 6 सदस्य फोडून स्वतःचा अध्यक्ष बनवला. भाजपनं शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 3 सदस्य फोडले. भाजपनं एका अपक्षाचाही पाठिंबा मिळवत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. तर, इतर दोन सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.


Sunday, March 22, 2026

जि प च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांची मदत झाल्याचं प्रिया शिंदेंनी केलं कबूल ;


वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या प्रिया शिंदे विजयी झाल्या तर उपाध्यक्षपदी राजू भोसले विजयी झाले आहेत. भाजपनं जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पराभव केला. यानंतर दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आले. आज जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे आणि उपाध्यक्ष राजू भोसले यांनी कराड येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं. यावेळी प्रिया शिंदे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महेश शिंदे यांची मदत झाल्याचं कबूल केलं. याशिवाय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे पाईक असून त्यामुळंच त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो असल्याचं प्रिया शिंदे म्हणाल्या.   

सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया महेश शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. 

प्रिया शिंदे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणिमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या सहकार्यानं संधी मिळाल्याचं म्हटलं. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे.  2014 पासून भाजप सत्तेत आल्यानंतर विकासाचा डोंगर  उभा राहिलेला आहे. आमच्या मतदारसंघाची आणि भागाची प्रगती वेगानं झाली आहे.  आज प्रथम जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आलेली आहे. देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारानं पूर्ण जिल्हा विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्रात आयडॉल होईल यासाठी जिल्हा परिषद सदस्यांना समवेत घेऊन विकासात्मक आणि संघटनात्मक काम मोठ्या पद्धतीनं करणार आहोत.  आमदार महेश शिंदे यांची मदत झालेली आहे. त्यांच्यामुळंच आम्ही इथं आहोत, असं प्रिया शिंदे यांनी म्हटलं.   

आम्ही यशवंत विचारांचे पाईक आहोत, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करुन, त्यांचे विचार पुढं नेण्यासाठी, त्यांच्या विचारानं जिल्हा परिषद चालवण्यासाठी त्यांची प्रेरणा घेण्यासाठी इथं आलो आहे. यशवंत विचारांचा खून केल्याचा भाजपवर होणारा आरोप चुकीचा असल्याचं ही प्रिया शिंदे यांनी म्हटलं. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा आदर करुन आमचं प्रत्येक पाऊल असेल, असं शिंदेंनी म्हटलं.


मंत्री शंभूराज देसाई म्हणाले...सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी प्रशासन,पोलीस घरगड्यासारखे वागले...लोकशाहीचा गळा घोटाळा गेला...

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी प्रशासन भाजपच्या बाजूने घरगडी असल्यासारखे वागले मी आणि मकरंद आबा असे आम्ही दोन मंत्री जिल्ह्यात असताना आम्हाला 10, 10 पोलिस मागे ओढत होते आमचे सदस्य संख्या सर्वाधिक होती लोकांनी आम्हाला कौल दिला असताना लोकशाहीचा गळा घोटून भाजपने सत्ता स्थापन केली जरी हे क्षणिक सुख भाजपला झाले असले तरी यापुढे सातारा जिल्ह्यात याचे पडसाद नक्कीच उमटणार आहेत असा इशारा देत झालेल्या एकूणच या घटनेबाबत ना शंभराज देसाई यांनी जाहीर निषेध केला तसेच जे या निवडीवेळी  सभासद फुटले त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचेही ते म्हणाले खोट्या केसेस टाकून या निवडणुकीसाठी प्रशासनाने लोकशाहीचा खून केला असा आरोपही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे
पालकमंत्री शंभूराजे देसाई हे देवदर्शनला आले तरी संपूर्ण सातारा शहराला वेठीस धरतात 

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले...अपयश झाकण्यासाठी पालकमंत्री खोटे आरोप करत आहेत ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया लोकशाही पद्धतीनेच पार पडली आहे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम अजिबात या प्रक्रियेत झालेले नाही आपले अपयश झाकण्यासाठी आमचे विरोधक आमच्यावर खोटे आरोप करत आहेत असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री ना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे विरोधक जिंकले तर ती लोकशाही आणि आम्ही जिंकलो तर ती दांडगाई हा कुठला न्याय असा सवाल ही त्यांनी यावेळी केला
यावेळी मंत्री जयकुमार गोरे कराडचे आमदार मनोज घोरपडे डॉ अतुल भोसले विक्रम पावसकर तसेच भाजपचे साताऱ्याचे विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते 

ना भोसले म्हणाले आम्ही लोकशाही पद्धतीनेच ही निवडणूक लढलो आहे आम्ही भाजप चे मंत्री कोणीही त्या ठिकाणी आवारात आमचे वाहन घेऊन गेलो नाही फक्त निवडीनंतर अभिनंदन करायला आम्ही दोघे मंत्री त्याठिकाणी गेलो
आमच्या सदस्यांनी मतदान केले त्यानंतर सेने-राष्ट्रवादी चा लोकांनी आम्हाला मतदान केले ते त्यांना न करता आम्हाला का केले? याचा अर्थ त्या सदस्यांवर दबाव होता असाच त्याचा अर्थ होतो, आणि शंभूराजे देसाई आपले अपयश लपवण्यासाठी आमच्यावर खोटे आरोप करत आहेत असेही शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले आहेत

Saturday, March 21, 2026

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचे पडसाद राज्याच्या कॅबिनेट बैठकीत उमटणार ? शंभूराज देसाई भाजपच्या काही मंत्र्यांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त करणार ?

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. स्थापनेनंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले आहे. या निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ केवळ 28 सदस्यांपर्यंत मर्यादित असतानाही, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रणनीती आखत अतिरिक्त पाठिंबा मिळवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे भाजपला एकूण 33 सदस्यांचा पाठिंबा मिळाला आणि सत्ता हस्तगत करण्यात यश आले. या पार्श्वभूमीवर प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, या निकालामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. या निकालाचे पडसाद आता थेट राज्याच्या कॅबिनेट बैठकीत उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे  
दरम्यान या बैठकीत शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री प्रशासनाच्या भूमिकेबाबत तसेच भाजपच्या काही मंत्र्यांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त करणार आहेत.

या निवडणुकीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, शेवटच्या क्षणी भाजपने राजकीय डावपेच रचत काही सदस्यांना आपल्या बाजूला वळवले, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या ‘पळवापळवी’मुळे महायुतीतील समन्वयावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे या शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी असल्याने या निकालाला अधिक राजकीय रंग चढला आहे. एका बाजूला भाजपचा विजय, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी, अशा दुहेरी परिस्थितीत साताऱ्यातील राजकारण तापले आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीदरम्यान पोलिसांच्या मदतीने राजकीय खेळी करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे हा मुद्दा आता केवळ स्थानिक पातळीवर न राहता राज्याच्या सत्ताकेंद्रात पोहोचण्याची चिन्हे आहेत. येत्या मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री प्रशासनाच्या भूमिकेबाबत तसेच भाजपच्या काही मंत्र्यांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त करणार आहेत. त्यामुळे ही बैठक केवळ नियमित कामकाजापुरती मर्यादित न राहता राजकीय वादांनी गाजण्याची शक्यता आहे.


Friday, March 20, 2026

मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना अस्मान दाखवत भाजपने सातारा जिल्हा परिषद केली काबीज ; राज्यभरात झाला चर्चेचा विषय ;

वेध माझा ऑनलाइन
32 जागांवर संख्याबळ दाखवत भाजपकडून सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची निवड करण्यात आली. राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
 
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात आज प्रचंड थरार पाहायला मिळाला. कोणालाही बहुमत नसल्याने अध्यक्षपदावर कोण बाजी मारणार याची उत्सुकता असताना भाजपने शेवटच्या क्षणी आपला अध्यक्ष केला. त्यामुळे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना अस्मान दाखवत भाजपने सातारा जिल्हा परिषद काबीज केली आहे. त्यामुळे सिनेस्टाईल थरार जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत दिसून आला. 32 जागांवर संख्याबळ दाखवत भाजपकडून अध्यक्षपदी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची निवड करण्यात आली. राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करूनही राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे संख्याबळ 31 दाखवू शकले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते 35 चे बहुमत असतानाही भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. प्रिया शिंदे या शिंदेसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत.

जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत सिनेस्टाईल थरार ; झटापटीत मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हाताला लागलं!

वेध माझा  ऑनलाइन
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात आज प्रचंड थरार पाहायला मिळाला. भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडण्याचा जोरदार प्रयत्न शेवटपर्यंत सुरू होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा कथित प्लॅनही आखण्यात आले होता. 

या सगळ्या घडामोडींमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावत पोलिसांच्या वॉचवर असलेल्या सदस्यांना थेट आपल्या गाडीतून सुरक्षित सभागृहात पोहोचवलं. सभागृहात घेऊन जाताना झालेल्या झटापटीमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला देखील लागले. मकरंद पाटील यांच्या गाडीतूनही काही सदस्यांना आणण्यात आले. त्यामुळे सिनेस्टाईल थरार जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत पाहायला मिळाला. 
कामेस कांबळे, अनिल देसाई यांच्यासह काही सदस्यांना टार्गेट केल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मात्र आपली संपूर्ण ताकद लावून सर्व सदस्यांना सुखरूप सभागृहात पोहोचवलं. त्यामुळे भाजपाचा डाव फसल्याचं चित्र त्यावेळीतरी स्पष्ट दिसून आले. 



Thursday, March 19, 2026

विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवणे आणि संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्याचा गंभीर आरोप ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्यातील कराड येथे एक अतिशय लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. येथील एका कॉलेजमधील प्रोफेसरवर आपल्या विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवणे आणि संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी प्रोफेसरला अटक केली असून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

नेमकं काय घडलं?
हा प्रकार कराड तालुक्यातील उंब्रज परिसरातील एका कॉलेजशी संबंधित आहे. आरोपानुसार, कॉलेजमध्ये शिकवणारा प्रोफेसरने १२ मार्च रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थिनीला आपत्तिजनक आणि अश्लील संदेश पाठवले. त्याचबरोबर संबंध ठेवण्यासाठी दबावही टाकला. या मेसेजमुळे विद्यार्थिनी खूप त्रस्त झाली. तिने ताबडतोब ही बाब कुटुंबियांना सांगितली. कुटुंबीयांनी गंभीरतेने घेत विद्यार्थिनीला घेऊन उंब्रज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली

तक्रार मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई केली. प्रकरणाचे गांभीर्य पाहता आरोपी प्रोफेसरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. आरोपीने यापूर्वी अशा प्रकारच्या हरकती केल्या आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. विद्यार्थिनीने दिलेले पुरावे आणि डिजिटल साक्ष्यांचाही तपास करण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिक आणि पालकांनी अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

गॅस तुटवड्यावर भारत सरकारचा मोठा निर्णय ; तेल कंपन्यांना आदेश !;

वेध माझा ऑनलाइन।
मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावामुळे जगभरात ऊर्जा संकटाची भीती निर्माण झाली आहे.  इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला असून सर्व तेल आणि गॅस कंपन्यांना थेट आदेश जारी केला आहे.
या निर्णयामुळे आता देशातील ऊर्जा उत्पादन आणि पुरवठ्याची अचूक माहिती सरकारकडे उपलब्ध होणार आहे. संभाव्य ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. सरकारने घेतलेल्या या पावलामुळे भविष्यात इंधन आणि गॅस पुरवठ्यावरील नियंत्रण अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

सरकारने काय दिला आदेश? :
या पार्श्वभूमीवर भारत सरकारने Essential Commodities Act 1955 अंतर्गत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार देशातील सर्व तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन तसेच पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या उत्पादन, साठा आणि वितरणाबाबतची माहिती सरकारला देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे आता सरकारला देशात किती कच्चे तेल उत्पादन होते, किती निर्यात होते, तसेच नैसर्गिक वायूचा किती पुरवठा केला जातो याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. यामध्ये गॅस उत्पादक कंपन्या, LNG आयातदार, गॅस पाइपलाइन ऑपरेटर, सिटी गॅस वितरण कंपन्या आणि पेट्रोकेमिकल उद्योगांचाही समावेश असेल.
सरकारच्या या आदेशामुळे ऊर्जा क्षेत्रातील पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच भविष्यात उद्भवू शकणाऱ्या गॅस किंवा इंधन तुटवड्याच्या संकटावर नियंत्रण ठेवण्यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.


वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अचानक हवामानात बदल ; सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट ! राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या हालचाली वाढल्या

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अचानक हवामानात बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळ्याला अजून काही महिने बाकी असतानाच राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या हालचाली वाढल्या आहेत
हवामान खात्याने गुरुवार, 19 मार्च रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे

दिलेल्या माहितीनुसार सध्या मध्य प्रदेश परिसरावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीपासून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे विश्लेषणातून समोर आले आहे. वातावरणात आर्द्रता वाढल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यात जळगाव, नाशिक, अहिल्यानगर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये ताशी सुमारे 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः नाशिक जिल्हा आणि घाटमाथ्यावरील भागांसाठी गुरुवारचा दिवस अधिक संवेदनशील मानला जात आहे.
राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्येही हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. तसेच नागपूर, अकोला, अमरावती आणि गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भ विभागातही यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. या भागांत ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याबरोबरच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.



माझी प्रेयसी हो, अन्यथा नवऱ्याचा मृत्यू होईल; भीती दाखवून अशोक खरातने केले कांड; प्रत्येकाला चीड येईल अशी बातमी...

वेध माझा ऑनलाइन।
स्वतःला कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ, अंकशास्त्रज्ञ आणि भविष्यवेत्ता म्हणवणारे 'कॅप्टन' अशोक खरात यांना नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ मार्च २०२६ रोजी बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक केली आहे. एका ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, न्यायालयाने खरात यांना २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाने नाशिकबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खरात यांचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला आहे.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार २०१९ ते २०२५ या कालावधीत घडला. २०१९ मध्ये कॅनडा कॉर्नर येथील खरात यांच्या कार्यालयात तिची त्यांच्याशी ओळख झाली. खरात यांनी स्वतःला दैवी शक्ती असल्याचा दावा करून महिलेचा विश्वास संपादन केला. तिच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याचे, समस्या सुटण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी विविध विधी करण्याचे सांगितले.
खरात यांनी महिलेला वारंवार कार्यालयात बोलावले. काही बदल दिसल्यास ते आपल्या 'शक्ती'चे फलित असल्याचे सांगितले. या काळात महिलेचा २०२१ मध्ये ठरलेला साखरपुडा मोडला. खरात यांनी सगळे सुरळीत होईल असे सांगून ५० हजार रुपये घेतले आणि 'पुष्कराज' खडा देऊन कल्याणाचे आश्वासन दिले. 
 नोव्हेंबर २०२२ मध्ये खरात यांनी महिलेला कार्यालयात बोलावले. प्रसाद म्हणून पेढा आणि पाणी दिल्यानंतर महिलेला गुंगी आली. भीती दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
नंतर महिलेचे लग्न ठरले आणि ते यशस्वीपणे पार पडले. खरात यांनी हे आपल्या 'कृपे'मुळे झाल्याचा दावा केला. लग्नानंतरही आशीर्वादासाठी कार्यालयात बोलावले आणि पुन्हा त्याच पद्धतीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. लग्नानंतर खरात यांनी महिलेला धमकावले. "प्रेयसी झाली नाही तर परमेश्वराचा कोप होईल, नवऱ्याचा मृत्यू होईल" अशा भीती दाखवल्या. या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि भीतीमुळे महिलेला अखेर सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागली.


Tuesday, March 17, 2026

शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या चिमुकलीवर अॅसिड हल्ला ; कुठे घडली घटना ? काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन
शिर्डीतील लोणी गावात संतापजनक घटना घडली असून शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या चिमुकलीवर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनं अहिल्यानगर जिल्हा हादरला असून थेट विधिमंडळात याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. शिर्डीतील घटना अत्यंत निंदानजनक असून राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असा सवाल आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. तर, मंत्री आदिती तटकरे, आमदार मनिषा कायंदे यांनीही या घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला सोडलं जाणार नाही, असे सांगितले. आता, अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घटनेवर प्रतिक्रिया दिलीय. 
 
शिर्डीतील अॅसिड हल्ला प्ररकणाची मी माहिती घेतली आहे, 13 वर्षाची मुलगी आहे, रस्त्यावर थांबून त्या मुलाने तिच्यावर अॅसिड फेकलं. खरंतर ग्रामीण भाग आहे, त्याच्यामुळे तिथे जवळपास सीसीटीव्ही नाहीत. पण हा मुलगा गावातलाच असू शकतो, त्यामुळे पोलिसांचा तपास जलद गतीने सुरू आहे. पोलीस कसून तपास करत आहेत, आजच आरोपी पकडला जाईल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. तसेच, अशा घटनांमध्ये जे आरोपी असतात त्यांना कठोरातील कठोर शिक्षा आणि कारवाई व्हायला हवी असे माझे वैयक्तिक मत आहे, असेही विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना महिन्याभरात कार्यान्वित करा ; मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश ;

वेध माझा ऑनलाईन।
: उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात आज मंत्रालयात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासमवेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची व्यापक बैठक घेतली. यावेळी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करुन, ही योजना येत्या महिन्याभरात कार्यान्वित करा, असे स्पष्ट आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे या योजनेअंतर्गत येणाऱ्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरुपी सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी १० मार्च रोजी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी अधिवेशन संपण्यापूर्वी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन, प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली होती. 

त्यानुसार आज मंत्रालयात पाणीपुरवठा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि आ.डॉ. भोसले, कराड पंचायत समितीच्या सभापती सौ. नंदाताई यादव, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व पं.स. सदस्य ॲड. नरेंद्र नांगरे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. 

बैठकीत प्रारंभी आ.डॉ. भोसले यांनी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेबाबतचे वास्तव चित्र पाणीपुरवठा मंत्र्यांसमोर सादर केले. ते म्हणाले, उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या योजनेवर आतापर्यंत सुमारे ८० टक्के खर्च झाला आहे. पण दरम्यानच्या काळात या योजनेअंतर्गत समाविष्ट १७ गावांपैकी काही गावांनी स्वतःच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवल्यामुळे, त्या गावांना आता या प्रादेशिक योजनेतील पाण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळे योजनेच्या मूळ आराखड्यात आवश्यक बदल करून, प्रत्यक्षात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांना या योजनेतील पाण्याचा लाभ देणे आवश्यक आहे. उर्वरित निधी तात्काळ उपलब्ध झाल्यास ही योजना लवकर कार्यान्वित होऊ शकते. तसेच याचा लाभ कराड दक्षिणमधील कोयना वसाहत, नांदलापूर या गावांसह मलकापूर शहराच्या विस्तारित भागालाही करुन देता येईल. 

यानंतर पाणीपुरवठा मंत्री ना. पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून योजनेच्या कामाचा आढावा घेऊन, अपूर्ण कामे ताबडतोब पूर्ण करण्याचे आदेश बजाविले. तसेच येत्या महिन्याभरात ही योजना कार्यान्वित करावी, अशी स्पष्ट सूचना केली. यासाठी आवश्यक निधीची तरतूद महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. तसेच योजना कार्यान्वित झाल्यानंतर कोयना वसाहत, नांदलापूर या गावांसह मलकापूर शहराच्या विस्तारित भागाला या पाण्याचा लाभ मिळवून देण्याबाबतचा आराखडाही तातडीने सादर करावा, असे अधिकाऱ्यांना सांगितले. 

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे मंत्रालय स्तरावर पाणीपुरवठा मंत्र्यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन, कार्यवाहीच्या सूचना दिल्याने उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळणार आहे. तसेच या योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागण्यास मदत होणार आहे. 

यावेळी माजी जि.प. सदस्य शंकरराव खबाले, सचिन पाचपुते, अरुण यादव यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद पाणीपुरठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



महिन्याभरात योजना कार्यान्वित करा; उद्‌घाटनाला मी येणार..!

उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करुन, ही योजना महिन्याभरात कार्यान्वित करा, असे स्पष्ट आदेश पाणीपुरवठा मंत्री. ना. गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच या योजनेच्या उद्‌घाटनासाठी स्वत: उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून प्रतिक्रिया काय ?

वेध माझा ऑनलाईन।
राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील दोन्ही सदस्यांचे अकाली निधन झाल्याने येथे निवडणूक जाहीर झाली असून 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे. मात्र, दोन्ही मतदारसंघात काहींनी निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. बारामती मतदारसंघात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट पवार कुटुंबीयांवर टीका करत येथील निवडणूक बिनविरोध करण्यास विरोध दर्शवला. आता, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी भूमिका मांडली आहे.  

अजित पवारांच्या निधनानंतर होणारी बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. आपण निवडणूक लढवावी यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह असल्याचं ते म्हणाले. तसेच दादांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी शपथविधी होतो, मग आम्हीच त्यांच्या निधनाचं दुःख का व्यक्त करायचं, असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. हाकेंच्या या भूमिकेवर आता पवार कुटुंबीयांतून पहिली प्रतिक्रिया आली आहे. 

बारामती पोटनिवडणुकीसंदर्भाने बोलताना, याबाबत सुप्रियाताईंनी भूमिका मांडली आहे, बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. काकींसाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणार. आम्ही सुनेत्रा काकींना साथ देऊ, बारामतीचे प्रश्न काकींच्या साथीने सोडवू, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले. तर, लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले.  प्रत्येकाला निवडणुकी लढण्याचा अधिकार आहे, कोणी कुठेही निवडणूक लढू शकतो, ही लोकशाही आहे, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि नूतन सभापती सौ. नंदाताई यादव यांचे विशेष अभिनंदन ;


वेध माझा ऑनलाईन।
कराड पंचायत समितीत प्रथमच भाजपाची सत्ता आणल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि नूतन सभापती सौ. नंदाताई यादव यांचे विशेष अभिनंदन केले. कराड तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळवून देण्यासाठी, राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

कराड पंचायत समितीवर तब्बल ६४ वर्षानंतर प्रथमच भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकवला आहे. सोमवारी (ता. १६) झालेल्या निवड प्रक्रियेत भाजपाच्या सौ. नंदाताई यादव यांची नूतन सभापती म्हणून निवड झाली. या निवडीमुळे कराड तालुक्यात भाजपाला नवे बळ मिळाले आहे.

या निवडीनंतर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सौ. नंदाताई यादव यांनी मुंबई येथे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी त्यांचा सत्कार करून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार डॉ. भोसले यांनीही या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत, कराड तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले.

नूतन सभापती सौ. यादव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना जनतेने आणि पक्षाने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. आ.डॉ. अतुलबाबांच्यामुळे मला एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली असून, या पदाला न्याय देत, कराड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे, असे नमूद केले.

दरम्यान, सौ. यादव यांनी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासमवेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील, मत्स्योद्योग मंत्री ना. नितेश राणे, सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाट यांची भेट घेतली. या मान्यवरांनी सभापती निवडीबद्दल सौ. यादव यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, पंचायत समिती सदस्य ॲड. नरेंद्र नांगरे-पाटील, माजी जि.प. सदस्य शंकरराव खबाले, सचिन पाचपुते, अरुण यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Sunday, March 15, 2026

5 राज्याच्या निवडणुकीसाठी तारीख ठरली ; बिगुल वाजलं ;

वेध माझा ऑनलाइन।
भारतीय निवडणूक आयोगाने  आज, 15 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता ऐतिहासिक घोषणा करत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजवले आहे. 2021 च्या तुलनेत यावेळी अत्यंत कमी टप्प्यांत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यावर आयोगाने भर दिला आहे.

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल वगळता इतर सर्व राज्यांत एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, केवळ बंगालमध्येच एप्रिल महिन्याच्या 23 आणि 29 तारखेला असे दोन टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. दुसरीकडे, उर्वरित सर्व ठिकाणी एकाच दिवशी मतदान प्रक्रिया राबवली जाईल. यामध्ये 23 एप्रिलला तमिळनाडूतील मतदार आपला हक्क बजावतील, तर 9 एप्रिल रोजी आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका पार पडतील.

गेल्या 2021 च्या विधानसभा रणधुमाळीत तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीत एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या असल्या तरी, आसाममध्ये तीन तर बंगालमध्ये तब्बल आठ टप्प्यांत ही प्रक्रिया राबवावी लागली होती. मात्र, यंदा राजकीय हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी निवडणूक यंत्रणेने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर, बंगालसारख्या संवेदनशील राज्यात मतदानाचे टप्पे कमी करून केंद्रीय सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या पाचही राज्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारांची मुदत आगामी मे आणि जून 2026 मध्ये संपुष्टात येत आहे. आयोगाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, बंगालच्या विधानसभेचा कार्यकाळ 7 मे रोजी, तर तमिळनाडूचा 10 मे रोजी पूर्ण होत आहे. याव्यतिरिक्त आसामची मुदत 20 मे ला आणि केरळ विधानसभेची मुदत 23 मे रोजी संपणार आहे.

बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? ; काय आहे बातमी?

 वेध माझा ऑनलाइन।
बारामती विधानसभा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी  विधानसभा या दोन्ही ठिकाणी बिनविरोध पोटनिवडणूक झाली पाहिजे. मात्र, आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही लढायला तयार आहोत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आवाहन आणि इशारा दोन्हीही दिलं आहे. 
बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांचे निधन झाल्यामुळे या दोन्ही मतदारसंघात पुढील महिन्यातच निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर येथील मतदारसंघात निवडणुकांच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी येथील निवडणुका बिनविरोध होण्याची मागणी केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात निधन झाले. तेव्हापासून राहुरी विधानसभेची जागा रिक्त आहे. त्यामुळे, आता या जागेवर पोटनिवडणूक होणार असून निवडणुकीत भाजप राहुरी मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवरही पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील दोन विधानसभा पोटनिवडणुकीची लवकरच घोषणा करु शकते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबतच दोन्ही जागांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची मागणी केली आहे.  

 उमेदवार कोण?

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा याच महिन्यात होण्याची शक्यता आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. तर भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक होईल. बारामती मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित झालं असून सध्या त्या राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. तर, राहुरी मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा आहे. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी दिली होती. त्यामुळे, येथील उमेदवार कोण, याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. 


सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ;

वेध माझा ऑनलाईन।
मध्य महाराष्ट्रात  हवामानाचा वेगळाच चित्र दिसण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. सातारा सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे  आणि अहिल्यानगर परिसरात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याच कारणामुळे या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात  मात्र सध्या उन्हाची तीव्रता कायम आहे. नाशिक धुळे  नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये तापमान 37 ते 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेचा त्रास नागरिकांना जाणवू शकतो. मात्र 15 मार्चपासून या भागात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून वातावरणात काही प्रमाणात बदल होऊ शकतो.
मराठवाडा भागातही उष्णतेचा प्रभाव कमी होत असताना काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. बीड आणि धाराशिव येथे वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडू शकतो, तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागांमध्ये वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. या भागातील तापमान 36 ते 39 अंश सेल्सियसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.


रेशनधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; देशातील मोठ्या धान्यसाठ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय ;

वेध माझा ऑनलाइन
मोफत धान्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्य मिळावे यासाठी केंद्र सरकारने राज्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. जून 2026 पर्यंत वितरित होणारे तांदूळ आणि गहू केंद्रीय साठ्यातून आगाऊ उचलून नागरिकांपर्यंत तातडीने पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशातील मोठ्या धान्यसाठ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यांना केंद्र सरकारचे स्पष्ट निर्देश :
मोफत धान्य वितरण योजनेअंतर्गत केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. जून 2026 पर्यंतच्या कालावधीसाठी आवश्यक असलेले तांदूळ आणि गहू हे केंद्रीय साठ्यातून आधीच उचलून लाभार्थ्यांमध्ये वाटप करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात राज्यांच्या अन्न सचिवांना पत्र पाठवून माहिती देण्यात आली आहे. अंतर्गत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
केंद्राच्या पत्रानुसार, आगामी गहू खरेदी हंगाम सुरू होणार असल्यामुळे गोदामांवर ताण येऊ नये यासाठी राज्यांनी नियोजित वाटपातील धान्य लवकर उचलावे. साठवणूक क्षमता आणि वाहतूक व्यवस्थेवरील दबाव लक्षात घेऊन लाभार्थ्यांपर्यंत धान्य त्वरित पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी गोदामांमध्ये नव्याने खरेदी होणाऱ्या धान्यासाठी जागा उपलब्ध होईल.
या प्रक्रियेसाठी केंद्र सरकारने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनाही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारांशी समन्वय साधून आवश्यक तेवढा धान्यसाठा गोदामांमध्ये उपलब्ध राहील याची खात्री करण्यास सांगितले आहे. तसेच नवीन धान्य खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गुरुवारपर्यंत एफसीआयकडे सुमारे 37.2 दशलक्ष टन तांदूळ आणि 23.5 दशलक्ष टन गहू उपलब्ध होता. म्हणजेच एकूण धान्यसाठा सुमारे 60.7 दशलक्ष टन इतका आहे. हा साठा 1 एप्रिलपर्यंत आवश्यक असलेल्या बफर स्टॉकपेक्षा जवळपास 185 टक्के जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

या निर्णयामुळे देशातील सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना थेट फायदा होणार आहे. एकाच वेळी आगाऊ धान्य वितरण केल्यास दोन महत्त्वाचे फायदे होणार आहेत. एक म्हणजे नव्याने खरेदी होणाऱ्या धान्यासाठी गोदामांमध्ये जागा उपलब्ध होईल आणि दुसरे म्हणजे पुरवठा साखळीवरील ताण कमी होईल. तसेच वाढत्या साठ्यामुळे सरकारने सुरू ठेवत खुल्या बाजारातही धान्य विक्री करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.



विशिष्ठ ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळणार नाही.;रिफिलिंगवरही बंदी ; केंद्र सरकारने गॅस वितरणाबाबत अत्यंत कडक पाऊल उचलले ; काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन।
देशभरात जाणवणाऱ्या एलपीजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गॅस वितरणाबाबत अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर ताण आल्याने, गॅसचा साठा वाचवण्यासाठी आणि तो गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. ज्यानुसार ठरावीक लोकांना गॅस सिलिंडर घेता येणार नाही.

या नवीन निर्णयानुसार, आता विशिष्ट ग्राहकांना नवीन सिलिंडर मिळणार नाहीत आणि रिफिलिंगवरही बंदी घालण्यात आली आहे.
कोणाला मिळणार नाही एलपीजी सिलिंडर?
नवीन नियमांनुसार, ज्या कुटुंबांकडे आधीच पाईपद्वारे नैसर्गिक वायू  कनेक्शन आहे, त्यांना आता घरगुती एलपीजी सिलिंडर मिळणार नाहीत. सरकारने या संदर्भात स्पष्ट अटी घातल्या आहेत:
पीएनजी ग्राहकांना त्यांच्याकडील विद्यमान एलपीजी सिलिंडर आता पुन्हा भरून घेता येणार नाहीत.
ज्यांच्याकडे पीएनजी सुविधा उपलब्ध आहे, असे नागरिक आता नवीन एलपीजी कनेक्शनसाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत.

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आज वाजणार ;


वेध माझा ऑनलाइन।
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आज वाजणार आहे. भारतीय निवडणूक आयोग आज देशभरातील पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा करणार आहे. यासाठी देशाची राजधानी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आज दुपारी ठीक 4वाजता एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होताच संबंधित ठिकाणी तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू होईल.

निवडणूक आयोग खालील पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करेल:

1.पश्चिम बंगाल
2.मिळनाडू
3.आसाम
4. केरळ
5.पुद्दुचेरी (केंद्रशासित प्रदेश)

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी हे निवडणुकांच्या तारखा, टप्पे आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती देतील. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करताच संबंधित राज्यांमध्ये तात्काळ ‘निवडणूक आचारसंहिता’  लागू होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी पश्चिम बंगालमध्ये 2011 नंतर प्रथमच अत्यंत कमी टप्प्यांत (बहुधा 1 किंवा 2 टप्प्यात) मतदान होऊ शकते. मागील 2021 च्या निवडणुकीत तिथे 8 टप्प्यांत मतदान झाले होते.
या राज्यांमधील सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ मे ते जून 2026 दरम्यान संपत आहे (उदा. पश्चिम बंगाल 7 मे, तामिळनाडू 10 मे). त्यामुळे सर्व निवडणूक प्रक्रिया 15 जून 2026 पूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे.

निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली आणि दुसरी यादी जाहीर केली असून एकूण 126 पैकी 65 उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा इतिहास पाहता तिथे केंद्रीय सुरक्षा दलांची मोठी तुकडी तैनात केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या निवडणूक आयोगाच्या या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


Saturday, March 14, 2026

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल ; २९ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी विमानवाहू व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्या पायाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तब्बल २९ वर्षांपूर्वी कुस्तीच्या आखाड्यात झालेली जुनी दुखापत पुन्हा बळावल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर मुरलीधर मोहोळ यांना आता किमान एक महिना सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

 मुरलीधर मोहोळ हे एक निष्णात कुस्तीगीर होते पण...
राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी मुरलीधर मोहोळ हे एक निष्णात कुस्तीगीर होते. २९ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. या एका दुखापतीमुळे त्यांचे कुस्तीचे स्वप्न अर्धवट राहिले. त्यामुळे त्यांना कुस्ती कायमची सोडावी लागली होती. इतकी वर्षे त्यांनी या वेदनांकडे दुर्लक्ष केले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा त्रास प्रचंड वाढला होता. अखेर वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

भाजपचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी दिलेला शब्द पाळला ; काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन।
उंब्रज परिसरात छ शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहत आहे,  मी याकामी नक्कीच मदत करणार... असा शब्द मी दिला होता... तो शब्द पाळण्यासाठी आज मी पुन्हा येथे आलो आहे... असे म्हणत भाजप चे कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी या पुतळ्याच्या मूर्तिकारास  5 लाख रुपयांचा चेक देत... दिलेला आपला शब्द पाळला आहे... तसेच याकामी सर्वांनी मदत करावी अशी हाकदेखील त्यांनी यावेळी परिसरातील जनतेला दिली... 

दरम्यान...  याकामी दिलेला शब्द रामकृष्ण वेताळ यांनी पाळला आहे,... त्यामुळे परिसरातील पुढारी म्हणवणाऱ्या इतरांनीदेखील आपली जबाबदारी ओळखून या कामासाठी सढळ हाताने मदत करावी अशी अपेक्षा याच परिसरातील जनतेकडून व्यक्त होताना दिसत आहे...

इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यावर भीषण हल्ला; नेता गंभीर जखमी? अमेरिकेनं पुरावा दिला ;

वेध माझा ऑनलाइन।
मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिका आणि इस्त्रायलचे इराणवर भीषण हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनेई हे देखील जखमी झाल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे.
इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि 28 फेब्रुवारी रोजी मध्य पूर्वेत एका भीषण युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात अमेरिकेनं देखील उडी घेतली. अमेरिकेनं त्यापूर्वीच युद्धाची तयारी पूर्ण केली होती. दरम्यान युद्धाच्या दुसऱ्या दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर जोरदार हल्ले करण्यात आले आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यानंतर इराण जेवढ्यावेळेस नव्या सर्वोच्च नेत्याची निवड करेल तेवढ्यावेळेस आम्ही त्याला मारू अशी धमकी इस्त्रायलकडून इराणला देण्यात आली होती. मात्र इराणने पुन्हा एकदा आपल्या नव्या सर्वोच्च नेत्याची निवड केली. आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली. दरम्यान काही दिवसांपूर्वी मोजतबा खामेनेई हे देखील अमेरिका आणि इराणच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असल्याची बातमी समोर आली होती. त्यावर आता अमेरिकेकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे
अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी मोठा दावा केला आहे, इरानचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई हे युद्धात जखमी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांचा चेहरादेखील पूर्णपणे खराब झाल्याची शक्यता आहे, असं हेगसेथ यांनी म्हटलं आहे. मोजतबा खामेनेई सध्या अशा अवस्थेमध्ये आहेत की ते आता त्यांच्या देशाचं नेतृत्व देखील करू शकणार नाहीत, इराणचं नेतृत्व भित्र आहे. लपून बसलं आहे. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांचा आणि त्यांच्या काही नातेवाईकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणच्या सर्वोच्च नेत्याचा एकही फोटो किंवा व्हिडीओ समोर आला नसल्याचे पीट हेगसेथ यांनी म्हटलं आहे.

नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब - गॅस टंचाईवरून राऊतांचा हल्लाबोलसंजय राऊत

वेध माझा ऑनलाइन।
आखाती युद्धाचा भारतावर, विशेषतः गॅस टंचाईच्या रूपात, गंभीर परिणाम होत आहे. यामुळे नागरिक आणि हॉटेल व्यवसायिक त्रस्त आहेत, अनेकांना गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या परिस्थितीवरून सरकार आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे, कोविड काळातील परिस्थितीची आठवण करून देत सरकारच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आखाती देशातील युद्धाच संपूर्ण जगावर परिणाम होत असून भारतातही लोकांच्या आयुष्यावर परिणाम होताना दिसत आहे. एकीकडे युद्धामुळे निर्यातीवर परिणाम झाला असून अनेक शतकऱ्यांचा माल देशात अडकून सडत चालला आहे, त्यांचं नुकसान होतंय. तर दुसरीकडे गॅस टंचाई असून लोकांना गॅस सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहवा लागतंय, हॉटेल मालकांना चुलीचा सहारा घ्यावा लगोतय. तर काहींवर हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली आहे. देशात गोंधळाची परिस्थिती असून महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी हे चित्र दिसत आहे. गॅस टंचाईच्या याच मुद्यावरू शिवसेना ठाके गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.
माझ्या घरात ही परिस्थिती आहे, माझ्या पत्नीला दोन दिवसांपासून सिलेंडर मिळत नाहीये सकालपासून मला 60-70 लोकं भेटले, सिलेंडर कुठून मिळवायचा विचारत होते. राजधानी दिल्लीत एका घोषणेने धूम माजवली आहे, ती म्हणजे नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब.. त्याचं उत्तर नरेंद्र मोदीनी दिलं पाहिजे असा टोला राऊतांनी मारला.
देशभरात मोठमोठ्या रांगा लागल्या आहे सिलेंडरसाठी. लखनऊ, मुंबई, कलकत्ता, चेन्नई, दिल्ली ते अगदी जम्मूपर्यंत हीच स्थिती आहे. नोदबंदीनंतर आता लोकं सिलेंडरसाठी लाईनीत उभे आहेत. नोटबंदीच्या वेळेस ज्या रांगा लागल्या, त्या रांगेत लोकं मारली गेली, तेच आता सिलेंडरच्या रांगेत होऊ शकतं अशी भयंकर स्थिती निर्माण झाल्याचं चित्र देशभरात दिसतंय.  हे  सरकार जनता विरोधी आहे, आंतराराष्ट्रीय राजकारणात सरकार संपूर्ण अपयशी ठरल्यामुळे आपल्या देशावर ही परिस्थिती ओढावली आहे. लोकांना रांगेत उभं करणं आणि मारणं हा भारतीय जनता पार्टीचा छंद आहे, असा घणाघाती हल्लााही राऊतांनी चढवला.

मोदींंवर खोचक शब्दांत टीका
कोविडच्या काळात जसं सांभाळून घेतलं, ही परिस्थिती देखील सांभाळेन, असं म्हणत पंतप्रधानांनी लोकांना न घाबरण्याचं आवाहन केलं. मात्र त्यांच्या या विधानावरूनही राऊतांनी मोदींवर जोरदार टीका केली. हो, हो, कोविडच्या काळात त्यांनीदेश सांभाळला ना. गंगा नदीत लोकांची प्रेतं वहात होती, गुजरातमध्ये चिता जाळण्यासाठी स्मशानभूमीत लोकांना जागा मिळत नव्हती ..,  असा खोचक टोला हाणत, काय सांभाळलं यांनी असा रोकठोक सवाल राऊत यांनी विचारला.




Friday, March 13, 2026

कराड व शिराळा तालुक्यातील एकूण ४१ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार / आमदार डॉ. अतुलबाबा भोसले

वेध माझा ऑनलाइन।
 कराड दक्षिणमधील सुमारे २५ गावांतील हजारो शेतकरी व ग्रामस्थांच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी, वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फीडरवर आणावी, अशी आग्रही मागणी भाजपाचे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी  विधानसभेत लक्षवेधीद्वारे केली. आ.डॉ. भोसले यांच्या या मागणीची तत्काळ दखल घेत, राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वाकुर्डे योजना येत्या काळात सोलर फिडरवर आणण्याची घोषणा सभागृहात केली.
दरम्यान वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फिडरवर आल्यास, कराड व शिराळा तालुक्यातील एकूण ४१ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना या लाभ मिळणार असल्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सकाळच्या सत्रातील कामकाजावेळी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून, वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेच्या महत्वपूर्ण प्रश्नाकडे राज्याचे लक्ष वेधले. 

ते म्हणाले, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना राबविण्यात येत असून, या योजनेला १९ डिसेंबर १९९८ रोजी मान्यता देण्यात आली. त्यानंतर २००४ मध्ये पहिली सुधारित मान्यता, तर २०२१ मध्ये दुसरी सुधारित मान्यता शासनाकडून देण्यात आली. आतापर्यंत या योजनेवर सुमारे १,३४९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, या योजनेमुळे सुमारे २८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. कराड तालुक्यातील सुमारे २५ गावांतील हजारो ग्रामस्थ शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वाकुर्डे योजनेवर अवलंबून आहेत. दरवर्षी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने, हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. 

या योजनेतील विजेच्या खर्चाबाबत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी ८१-१९ टक्क्यांचे सूत्र लागू करुन, शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. ज्यामध्ये वीज बिलातील ८१ टक्के खर्च शासनाकडून आणि १९ टक्के खर्च शेतकऱ्यांकडून भरण्याची व्यवस्था केली. मात्र १९ टक्के हा खर्चदेखील अनेक लहान व गरीब शेतकऱ्यांना पेलवणे कठीण जाते. त्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील या योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांमधील शेतकऱ्यांच्या वीज बिलातील काही हिस्सा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भरला जात असल्याचे आ.डॉ. भोसले यांनी सांगितले. 

या योजनेसाठी एकूण १६.३३ मेगावॅट विजेची आवश्यकता असून, १४ पंपांसाठी मोठ्या प्रमाणावर वीज खर्च होत असल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारचे सौरऊर्जा निर्मिती वाढविण्याचे धोरण लक्षात घेता, वाकुर्डे उपसा सिंचन योजना सोलर फीडर आणावी, अशी आग्रही मागणी आ.डॉ. भोसले यांनी केली. ही योजना सोलर फिडरवर आणल्यास विजेवरील खर्च कमी होऊन, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मांडलेल्या या लक्षवेधीची तत्काळ दखल घेत, याला उत्तर देताना राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील सर्व वीजपंप सोलरवर आणण्याचे धोरण घेत असल्याचे सांगितले. तसेच येत्या काळात वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फिडरवर आणण्याची घोषणा करत, त्यामुळे शेतकऱ्यांवर कुठलाही भार पडणार नसल्याची ग्वाही दिली.

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लागणार असून, त्याचा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या निर्णयाबद्दल जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे व भाजपा- महायुती सरकारचे आभार मानले आहेत. 

चौकट 

४१ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना होणार लाभ
वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात २८ हजार हेक्टर क्षेत्र येते. तसेच येत्या काळात शासनाच्या प्रस्तावित शिराळा उपसा जलसिंचन योजनेत १३ हजार हेक्टर लाभक्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फिडरवर आल्यास, कराड व शिराळा तालुक्यातील एकूण ४१ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना या लाभ मिळणार असल्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले. 


सर्वात मोठी बातमी ! आता चीनकडून मोठ्या युद्धाची तयारी सुरू? ;जगभरात खळबळ ; वाचा बातमी;

वेध माझा ऑनलाइन।
एकीकडे अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 14 वा दिवस आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. जर अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली तर जगात तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं अशी स्थिती निर्माण झाली आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे संपूर्ण जगभरात इंधनाचा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. जग सध्या वेगळ्याच तणावात असातना आता चीनने जगाचं टेन्शन आणखी वाढवलं आहे. आता चीनकडून आशिया खंडात मोठ्या युद्धाची तयारी सुरू झाली आहे. इस्ट चायनाच्या एका सॅटेलाइट इमेजमुळे हा मोठा खुलासा झाला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या इमेजमध्ये चीनचे एकाचवेळी तब्बल दोन हजार मासे पकडणारे जहाजं सोबत दिसत आहेत. या जहाजांच्या माध्यमातून चीन ईस्ट चायनाचा समुद्र ब्लॉक करण्याचा अभ्यास करत असल्याचा दावा केला जात आहे.

वृत्तसंस्था एएफपीने नासाच्या हवाल्यानं हे सॅटेलाईट चित्र प्रसारित केलं आहे. हे चित्र समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे. या जहाजांच्या माध्यमातून चीन ईस्ट चायनाचा समुद्र ब्लॉक करण्याचा अभ्यास करत असल्याचा दावा केला जात आहे. युद्धाच्या वेळी जपान, फिलिपाइन्स आणि तैवान यांचा मार्ग एकाच वेळी या ठिकाणावरून रोखता यावा यासाठी ही चीनची तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार चीनने पूर्व चीनी समुद्रात 400 किलोमीटरपर्यंत या जहाजांची अशा पद्धतीने रचना केली आहे की, कोणत्याही दिशेनं शत्रू राष्ट्रांवर सहज हल्ला केला जाऊ शकतो. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, चीन सध्या एका मोठ्या युद्धाची तयारी करत आहे. हे युद्ध भविष्यात तैवान, जपान किंवा फिलिफिन्सविरोधात होऊ शकतं.

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची चव्हाण साहेबांना आदरांजली ; समाधीस्थळी येऊन झाल्या नतमस्तक...म्हणाल्या...समाधीस्थळी येताच मनात ऊर्जा, धैर्य आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते : चव्हाण साहेबांच्या आदर्शांवर राज्याच्या विकासासाठी कार्य करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.”

वेध माझा ऑनलाइन।
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रीती संगमावर श्रद्धेचा अनोखा संगमअनुभवायला मिळाला.उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी समाधीसमोर नतमस्तक होऊन पुष्पचक्र अर्पण केले, काही क्षण शांत उभ्या राहून महान नेत्याच्या स्मृतींना विनम्र वंदन केले आणि त्यांच्या आदर्शांच्या मार्गावर चालण्याचे संकल्प व्यक्त केला. 

यावेळी प्रीतीसंगम परिसरात सकाळपासूनच श्रद्धा, आदर आणि भावनांनी भारलेले वातावरण निर्माण झाले होते.उपस्थितांनी , यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली. विद्यार्थी, नागरिक आणि मान्यवर एकत्र येऊन भावपूर्ण अभिवादन करताना दिसले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार बाळासाहेब पाटील, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
“स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य महाराष्ट्रासाठी दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्या समाधीस्थळी येताच मनात ऊर्जा, धैर्य आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते. त्यांच्या आदर्शांवर चालत राज्याच्या विकासासाठी कार्य करणे हीच खरी आदरांजली ठरेल.”

एलपीजी सिलेंडरचा काळाबाजार ; राज्यभरात पुरवठा विभागाची धडाधड कारवाई सुरू;

वेध माझा ऑनलाईन
एकीकडे  घरगुती गॅस सिलेंडर मिळवा यासाठी नागरीक लांबच लांब रांगामध्ये उभे ठाकले आहे. भर उन्हात अबालवृद्ध आणि महिलांना गॅस एजन्सीबाहेर सिलेंडर नोंदणीसाठी उभे राहावे लागत आहेत. तीन चार तास रांगेत उभे राहिल्यानंतर सिलेंडर मिळत असल्याची ओरड नागरीक करत आहेत. त्यातच एलपीजी सिलेंडरचा काळाबाजार आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी राज्यभरात पुरवठा विभागाने धडाधड कारवाई सुरू केली आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक कारणासाठी वापर होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे.



घरगुती ते व्यावसायिक गॅसबाबत सरकारची मोठी कारवाई ; घेतले 10 सर्वात मोठे निर्णय ;

वेध माझा ऑनलाइन।
गॅसच्या अभूतपूर्व टंचाईने राष्ट्र आणि राज्य होरपळले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळ चालकांना मोठा फटका बसला. तर कामगार बेरोजगारीच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यातच सर्वसामान्यांची दोन वेळच्या जेवणासाठीची कसरत लांबच लांब रांगामधून दिसली. त्यावर मात करण्यासाठी मोदी सरकारने त्यासाठी दहा दमदार निर्णय घेतले आहे.

 गेल्या दोन दिवसांपासून एका गॅस सिलेंडरसाठी जे काही महाभारत सुरू आहे, ते उभा देश पाहत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, चहा, वडापाव आणि इतर खाद्यपदार्थ तयार करणारे छोटे व्यावसायिक, खानावळ चालक हे तर मेटाकुटीला आले आहे. गॅसच उपलब्ध नसल्याने अनेकांनी व्यवसाय बंद केला आहे. त्यामुळे कामगारांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर सर्वसामान्यांच्या रोजच्या कटकटीत अजून एकीची वाढ झाली. त्यांना काम सोडून सिलेंडर बुकिंगसाठी एजन्सीबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहेत. तहानभूक विसरून कुटुंबासाठी अनेकांची जीवघेणी कसरत सुरू आहे. तर या धामधुमीत काळाबाजार आणि हेराफेरी करणाऱ्यांनी हात धुवून घेतले आहे. पण मोदी सरकारने या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी जालीम उपाय केले आहेत.


सरकारचे 10 निर्णय

1). देशभरातली रिफायनरींना LPG उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले. खासगी आणि सरकारी तेल उत्पादक कंपन्यांना घरगुती LPG उत्पादन वाढवण्यास सांगितले. उत्पादन क्षमता वाढवण्यात आली. लवकरच पुरवठा सुरळीत होईल.

2). साठेबाजीला आळा घालण्यासाठी आणि काळा बाजार रोखण्यासाठी बुकिंगमध्ये अंतर वाढवले. गॅस बुकिंगमधील अंतर 21 दिवसांवरून 25 दिवस केले. त्यामुळे एकाच व्यक्तीला अधिक वेळा गॅस बुकिंग करता येणार नाही. गरजूंना गॅस मिळेल.

3). घरगुती LPG, PNG आणि वाहनांसाठीच्या CNG ला सरकारने प्राथमिकता दिली. रुग्णालये, शाळा, आश्रम, वसतिगृह आणि सर्वसामान्यांना गॅस पुरवठ्यात प्राधान्य दिले.

4). व्यावसायिक गॅस पुरवठा पण लवकरच सुरळीत होणार आहे. सध्याच्या पुरवठ्यात 20 टक्के कपात करण्यात आली आहे. तोडगा काढण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत केली.

5). अतिरिक्त उत्पादन झालेले LPG केवळ IOCL, BPCL आणि HPCL कंपन्यांना देण्याचा आदेश दिला. त्यामुळे सर्वसामान्यांना अगोदर गॅस सिलेंडर पुरवठा होईल.

6). देशभरात काळाबाजार रोखण्यासाठी आणि दलालांना चाप बसवण्यासाठी ESMA लागू केला. धाडसत्र सुरू केले. संबंधितांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात आले.

7). आखातातील पुरवठा विस्कळीत झाल्यानंतर पर्यायी मार्ग शोधले. नवीन देशाशी गॅस पुरवठ्याबाबत झटपट करार केले. लवकरच गॅसच्या नवीन खेपा भारतात येतील.

8). रशियाकडून खरेदी वाढवली. या मार्च महिन्यातील सुरुवातीच्या या 11 दिवसात रशियाकडून इंधन खरेदी 50% वाढवली. आयात वाढवून 15 लाख बॅरल प्रति दिवसावर पोहचले. IOC आणि रिलायन्सने 3 कोटी बॅरलसाठी करार केला.

9). LNG साठी अमेरिकेसोबत नवीन व्यापारी करार केला. GAIL ने LNG साठी अमेरिकेसोबत सौदा केला.

10). लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका खंडातील देशाशी इंधन खरेदीसाठी नवीन करार केला. गुयानासोबत पहिल्यांदाच करार करत 40 लाख बॅरल इंधन खरेदी केली. याशिवाय नायजेरिया आणि अंगोला देशाकडून इंधन मागवण्यात आले आहे. ते लवकरच देशात पोहचेल.
मोदी सरकारने हे दहा दमदार निर्णय घेतले आहे.

मराठी न शिकवणाऱ्या शाळांना दणका ; ज्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही, त्यांची मान्यता रद्द केली जाईल ; शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विधानसभेत घोषणा ; काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्रातील ज्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही, अशा संस्थांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. ज्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही, त्यांची मान्यता रद्द केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत केली. मुंबईतील अनेक आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये मराठी भाषा डावलली जात असल्याच्या मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सरकारकडून ही भूमिका स्पष्ट करण्यात आली.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार हारूण खान यांनी मुंबईतील इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी शिकवले जात नसल्याचे सांगितले होते. तसेच अनेक इंटरनॅशनल शाळा मराठीला केवळ तिसरी भाषा म्हणून दुय्यम स्थान देत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. यावर मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले. राज्यातील प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची गय केली जाणार नाही. आगामी शैक्षणिक वर्षात अशा शाळांची पुन्हा तपासणी केली जाईल. तसेच दोषी संस्थांवर कडक कारवाई होईल, असे दादा भुसे यांनी म्हटले

Wednesday, March 11, 2026

स्व यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उद्या ( 12 मार्च ) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सकाळी 8 वाजता प्रीतिसंगावरील समाधीस्थळी आदरांजली वाहणार ;

वेध माझा ऑनलाइन।
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची उद्या (12 मार्च) 113 वी जयंती आहे. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सकाळी 8 वाजता प्रीतिसंगावरील समाधीस्थळी आदरांजली वाहणार आहेत. 
यशवंतरावांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी देवराष्ट्रे (जि. सांगली) येथे झाला. कातांतराने त्यांचे कुटुंब कराडला आले. कराडच्या मातीत त्यांचे बालपण गेले. विद्यार्थी दशेतच ते स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी झाले. त्यांची सामाजिक, राजकीय जडणघडण कराडमध्येच झाली. 

कराड शहराच्या वाढीव भागासाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा व भुयारी गटार, मलप्रक्रिया केंद्र आणि ११ लाख लिटरच्या पाणी टाकीच्या कामाचे भूमिपूजन ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत नगराध्यक्ष यादव यांच्या पाठपुराव्याने शहराच्या वाढीव भागासाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेंतर्गत १०.५ एमएलडी क्षमतेचे मलप्रक्रिया केंद्र आणि ११ लाख लिटरच्या पाणी टाकीच्या कामाचे भूमिपूजन पार पडले.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, बांधकाम सभापती अख्तर आंबेकरी, जयवंत पाटील, पाणी पुरवठा सभापती अल्ताफ शिकलगार, नगरसेवक जयंत पाटील, प्रवीण पवार, सुहास जगताप, सुप्रिया खराडे, योगिता जगताप आदी उपस्थित होते.

शहरात भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नसल्याचे सांगत नगराध्यक्ष यादव म्हणाले, शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्या प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. भविष्यातील सुमारे तीन लाख लोकसंख्येचा विचार करून पाणीपुरवठा व ड्रेनेज व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून हद्दवाढ भागात ११ लाख लिटर क्षमतेची उंच पाण्याची टाकी आणि मलप्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे.

या प्रकल्पामुळे दरडोई १४० लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. वारुंजी जॅकवेल येथे चार मोटर बसविण्यात येणार आहेत. भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. अतिरिक्त वाया जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाईल. २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेमुळे पाण्याची बचत होणार आहे. सौरऊर्जेमुळे सुमारे साडेचार कोटी रुपयांची आर्थिक बचत होणार आहे. बाहेरचे नागरिकही शहरातील पाणी पिण्यास येतील. मलप्रक्रिया केंद्र आणि ११ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीची योजना २०२३ मध्येच तयार केली होती. शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाण्याच्या टाक्यांचेही पुनर्बाधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील ४० वर्षे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहील. शुद्धीकरण प्रक्रियेनंतर नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणार आहे.

माजी मंत्री पाटील म्हणाले, "शहराला कृष्णा आणि कोयना नद्यांचे पाणी उपलब्ध असल्याने शहरवासीय नशिबवान आहेत. नागरीकरण वेगाने वाढत असल्याने पाण्याची मागणीही वाढत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे."

मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर म्हणाले, "उपलब्ध निधीतून शहरातील आवश्यक ठिकाणी ड्रेनेज पंपिंग स्टेशन उभारणे, नवीन यंत्रसामग्री बसविणे आदी कामे करण्यात येतील." नगरसेवक प्रवीण पवार यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया खराडे यांनी आभार मानले.

अधिवेशन संपण्यापूर्वी विशेष बैठक घेऊन उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावणार ; आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीवर पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची ग्वाही ;

वेध माझा ऑनलाइन।
: उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी घेऊन, प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना विधानसभेत दिली.

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेबाबत आज पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, उंडाळे योजनेवर आतापर्यंत सुमारे ८० टक्के खर्च झालेला असून, केवळ २० टक्के खर्च शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित निधी तात्काळ उपलब्ध करून दिल्यास ही योजना लवकर कार्यान्वित होऊ शकते. या योजनेअंतर्गत १८ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याने प्रकल्पातील प्रलंबित कामे लवकर पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे सांगून, संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावण्याची मागणी आ.डॉ. भोसले यांनी केली.

यावर उत्तर देताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अधिवेशन संपण्यापूर्वीच संबंधित विभागांची विशेष बैठक घेऊन प्रलंबित कामांचा आढावा घेतला जाईल व ती कामे लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असे स्पष्ट केले.

यामुळे उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पाणीपुरवठा मंत्र्यांसोबत मंत्रालयात केव्हा बैठक होते, याकडे या भागातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. 


Tuesday, March 10, 2026

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता मिळणार ; शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपयांची रक्कम थेट जमा केली जाणार ;

वेध माझा ऑनलाइन।
देशभरातील कोट्यवधी शेतकरी ज्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या पीएम किसान योजनेच्या २२ व्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारकडून या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर करण्यात आली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थी शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी २ हजार रुपयांच्या स्वरूपात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
 
२ हजार रुपयांचा हप्ता  ; 
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्च रोजी वितरित केला जाणार आहे. या दिवशी देशभरातील कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपयांची रक्कम थेट जमा केली जाईल. या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विविध खर्चासाठी काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये विविध चर्चा सुरू होत्या. अनेकांनी होळीपूर्वी हा हप्ता जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र आता कृषी विभागाकडून अधिकृत माहिती देण्यात आली असून होळीनंतर हा हप्ता वितरित केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतात गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता ; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय ;

वेध माझा ऑनलाइन।
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशभरात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात साठा करू नये यासाठी सरकारने ही कठोर पावले उचलली आहेत.

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे भारतात व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत आहे. घरगुती गॅस उपलब्ध असला तरी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

ESMA कायदा नेमका काय आहे? :

सरकारने लागू केलेला Essential Services Maintenance Act हा कायदा अत्यावश्यक सेवांचा पुरवठा अखंडित राहावा यासाठी तयार करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक, आरोग्यसेवा, ऊर्जा आणि इंधन यांसारख्या सेवांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.
या कायद्याअंतर्गत सरकारला काही आपत्कालीन अधिकार मिळतात. जर कोणत्याही कारणामुळे अत्यावश्यक सेवांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता असेल तर सरकार थेट हस्तक्षेप करून आवश्यक आदेश जारी करू शकते. त्यामुळे गॅस, वीज किंवा वाहतूक यांसारख्या सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवता येतो.

.

संयुक्त अरब अमिरातीचे माजी राजदूत हुसैन हसन मिर्झा म्हणाले; .हे युद्ध केवळ नरेंद्र मोदीच थांबवू शकतात ;

वेध माझा ऑनलाइन।

गेल्या आठवड्याभरापासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. दिवसेंदिवस हे युद्ध अधिकच तीव्र होत चाललं आहे.युद्धामध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याचं पाहयला मिळालं. या संघर्षामुळे संपूर्ण जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग दाटले आहेत. अशातच हे युद्ध केवळ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच थांबवू शकतात असा मोठा दावा संयुक्त अरब अमिरातीचे भारतातील पहिले उच्चायुक्त आणि माजी राजदूत हुसैन हसन मिर्झा यांनी केला आहे.

हुसैन हसन मिर्झा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावावर भाष्य केले. त्यांच्या मते, “भारत एक महान देश आहे. पंतप्रधान मोदींचे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी अत्यंत मजबूत आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मोदी नुकतेच इस्रायल दौऱ्यावर होते, तर दुसरीकडे भारत हा इराणचा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे. त्यामुळे मोदींनी केवळ एक फोन कॉल केल्यास या रक्तरंजित युद्धावर नक्कीच तोडगा निघू शकतो आणि हा विनाश थांबू शकतो.”

Monday, March 9, 2026

राज्यात उन्हाचा कहर वाढतोय ; काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा ; .

वेध माझा ऑनलाइन
राज्यात मार्चच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळांना सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान झपाट्याने वाढत असून काही भागात उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. राज्यात उन्हाचा कहर वाढत असून नागरिक गरमीने हैराण झाले आहेत. काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट सांगितली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट नोंदवली गेली. याशिवाय सोलापूर येथे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. वाशीम, वर्धा, अमरावती आणि ब्रह्मपुरी या भागांमध्येही तापमान जवळपास 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याचे नोंदवले गेले आहे. दुसरीकडे निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी तापमान 11.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.
हवामान खात्याने 10 मार्चसाठी कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या कोकणातील जिल्ह्यांसह अकोला, अमरावती आणि वर्धा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय रत्नागिरी, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान तज्ञांच्या मते, बिहारपासून मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे तापमानात वाढ होत आहे. दरम्यान पुढील काही दिवस राज्यात उन्हाचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता सध्या कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

इराण अमेरिका युद्ध लवकरच थांबण्याची शक्यता! ; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले संकेत ;

वेध माझा ऑनलाईन।
10 दिवसांपासून संपूर्ण जगाच्या जीवाला घोर लावलेल्या इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध लवकरच थांबण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनी तसे संकेत दिले आहेत. इराणविरुद्धचे युद्ध लवकरच संपेल. इस्रायल आणि अमेरिकेने 28 फेब्रुवारीला युद्ध सुरु झाल्यापासून इराणमधील 5000 ठिकाणांना लक्ष्य केले आहे. आपल्याला काही लोकांना समूळ नष्ट करायचे होते म्हणून आपण हे लहानसे युद्ध केले. आपण या युद्धात अगोदरच अनेक प्रकारे जिंकलो आहोत. मात्र, आपण आवश्यक तितके जिंकलेलो नाही, असेही ट्रम्प  यांनी म्हटले
मध्यपूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या तणावादरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की युद्ध आता जवळजवळ संपले आहे. त्यांनी इराणला पुढील कोणत्याही गैरप्रकारांचा प्रयत्न करण्याविरुद्ध कडक इशाराही दिला. सोमवारी सीबीएस न्यूजशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, युद्ध आता जवळजवळ संपले आहे. दरम्यान 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर लष्करी हल्ला केला. ही संयुक्त लष्करी कारवाई हळूहळू एका मोठ्या संघर्षात रूपांतरित झाली, ज्यामुळे मध्यपूर्वेतील अनेक देश प्रादेशिक युद्धाच्या उंबरठ्यावर आले. सीबीएस न्यूजच्या पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की संघर्ष आता मोठ्या प्रमाणात संपला आहे.

पुढे बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, इराणच्या लष्करी क्षमतेचे मोठे नुकसान झाले आहे. ते म्हणाले, "त्यांच्याकडे आता नौदल राहिलेले नाही. त्यांची संपर्क यंत्रणा गेली आहे आणि त्यांची हवाई दल जवळजवळ संपली आहे. त्यांची क्षेपणास्त्र प्रणाली कोलमडली आहे. त्यांचे ड्रोन सर्वत्र पाडले जात आहेत आणि त्यांचे ड्रोन बनवण्याचे कारखाने नष्ट झाले आहेत." ट्रम्प यांनी दावा केला की तेहरानकडे आता लष्करी ताकदीच्या बाबतीत जवळजवळ काहीही शिल्लक नाही. युद्ध सुरू झाले तेव्हा ट्रम्प म्हणाले होते की, इराणविरुद्ध अमेरिकेची कारवाई किमान चार ते पाच आठवडे चालेल. परंतु सोमवारी त्यांनी सांगितले की अमेरिका त्यांच्या दिलेल्या मुदतीपेक्षा खूप पुढे गेली आहे आणि संघर्ष लवकरच संपू शकतो.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणलाही कडक इशारा दिला. त्यांनी म्हटले की इस्लामिक रिपब्लिकने कोणत्याही युक्त्या किंवा नवीन युक्त्या वापरून पाहू नयेत. ट्रम्प म्हणाले, "त्यांनी त्यांच्याकडे जे काही होते ते सर्व वापरले आहे. आता, जर त्यांनी कोणत्याही युक्त्या वापरून पाहिल्या तर त्या देशाचा अंत होईल. जर त्यांनी काही चुकीचे केले तर इराण संपेल आणि त्याचे नाव पुन्हा कधीही ऐकू येणार नाही."
ट्रम्प यांनी असेही म्हटले की होर्मुझची सामुद्रधुनी आता उघडी आहे आणि जहाजे त्यातून जात आहेत. त्यांनी असा दावा केला की अमेरिका या महत्त्वाच्या सागरी मार्गाचा ताबा घेण्याचा विचार करत आहे.

 

साताऱ्यातील एका नामांकित स्कूलमध्ये 24 मुलांना मारहाण, धमकी देऊन त्यांचे लैगिंक शोषण केल्याची धक्कादायक घटना आली समोर ; संबंधित केअरटेकरला अटक; साताऱ्यात खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन
साताऱ्यातील एका नामांकित स्कूलमधील केअरटेकरने तब्बल 24 मुलांना मारहाण, धमकी देऊन त्यांचे लैगिंक शोषण, मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर सातारा शहर पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून संबंधित केअरटेकरला अटक केली आहे. 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 
इंग्रजी माध्यमाच्या एका नामांकित स्कूलमधील तीन मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्कूल प्रशासनातील अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून संबंधित केअरटेकरवर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला तसेच त्याला अटकही करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आणखी काही मुलांचे लैगिंक शोषण आणि मारहाण करून पैसे उकळल्याचे समोर आले.
गेल्या काही वर्षांपासून त्याच्याकडून हा प्रकार सुरू होता यामुळे सातारा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.


इराण युद्ध सुरु ; भारतात अनेक शहरात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची मोठी गर्दी ; एलपीजी सिलिंडर संदर्भात गोंधळ ;

वेध माझा ऑनलाईन।
इराण युद्ध सुरु असताना भारतात एलपीजी सिलिंडर संदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक शहरात आणि गावात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. लोक रिकामे सिलिंडर घेऊन एजन्सीच्या बाहेर उभे आहेत. लवकरात लवकर गॅस सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकारने आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की देशातील एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. मात्र, ही स्थिती मुख्यत्वे घाबरल्यामुळे होत असलेल्या बुकींग आणि काही स्थानिक पातळीवर बुकींगच्या समस्यांमुळे येत आहे.

सोमवारी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात देखील असे प्रकार पाहायला मिळाले आहेत. अनेक लोक आपले रिकामे सिलिंडर घेऊन रांगेत उभे होते आणि गॅस सिलिंडर मिळण्याची वाट पाहात होते. याच धर्तीवर उत्तर प्रदेशातही सीतापूर जिल्ह्यातील बर्डपूर गावातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लोक आपले रिकामे सिलिंडर घेऊन गॅस एजन्सीच्या बाहेर बसलेले दिसत होते.असे म्हटले जात आहे की हा व्हिडीओ सात मार्च रोजीचा आहे. त्यादिवशी मोठ्या संख्येने लोक गॅस सिलिंडरच्या रांगेत उभे होते.
अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे की एलपीजीची वास्तविक कमतरता नाही. अनेक लोकांनी सांगितले त्यांना सहज गॅस सिलिंडर मिळत आहेत. एजन्सीला सिलिंडरचा पुरवठा देखील होत आहे. उत्तर प्रदेशातील एका महिलेने दावा केला की तिला १५०० रुपये देऊन काळ्या बाजारात सिलिंडर खरेदी करावा लागला आहे. महिलेने सांगितले की रमजानचा महिला चालू असून गॅसची गरज जास्त असल्याने मजबूरीमुळे तिला काळ्या बाजारातून सिलिंडर घ्यावा लागत आहे.

गॅस सिलिंडर बुकिंगमधील अंतर वाढवले :

मिळालेल्या माहितीनुसार घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी लागणाऱ्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी दोन सिलिंडर बुकिंगमध्ये किमान 21 दिवसांचे अंतर ठेवणे आवश्यक होते, मात्र आता हे अंतर वाढवून 25 दिवस करण्यात आले आहे. हा निर्णय केंद्रातील पेट्रोलियम मंत्रालय यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. या बदलामागे मुख्य उद्देश म्हणजे बाजारात होणारी साठेबाजी आणि ब्लॅक मार्केटिंग रोखणे हा आहे. 
सरकारकडून असेही स्पष्ट करण्यात आले आहे की देशात सध्या घरगुती गॅस, पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला नाही. तरीही भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या नव्या नियमामुळे ग्राहकांना पुन्हा सिलिंडर बुक करण्यासाठी आधीपेक्षा अधिक दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 गॅस दरवाढीमुळे वाढला आर्थिक ताण 

दरम्यान, पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली, तर व्यावसायिक वापरासाठी असलेल्या सिलिंडरच्या दरात 114.5 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन च्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली येथे 14.2 किलोचा नॉन-सब्सिडी एलपीजी सिलिंडर आता 913 रुपयांना मिळत आहे. यापूर्वी त्याची किंमत 853 रुपये होती. 

इतर शहरांमध्येही दरवाढ दिसून येत आहे. 

मुंबई येथे नॉन-सब्सिडी एलपीजी सिलिंडरची किंमत 912.50 रुपये झाली आहे. कोलकाता  येथे हा दर 939 रुपये असून चेन्नई मध्ये 14 किलोच्या सिलिंडरसाठी 928.50 रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत वाढून आता 1,883 रुपये झाली आहे. या बदलांमुळे घरगुती बजेटवर तसेच व्यावसायिक क्षेत्रावर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कराड दक्षिणमधील ३३.६७ कोटींच्या विकासकामांना राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी ; आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश

वेध माझा ऑनलाइन
राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना, कराड दक्षिणमधील विकासकामांना मोठया प्रमाणावर निधी मंजूर केला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमधील ३३ कोटी ६७ लाख रुपयांच्या विकासकामांना अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. 

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणण्यासाठी आ.डॉ. अतुलबाबा भोसले सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात कराड दक्षिणमधील रस्ते सुधारणा व पुलांच्या बांधकामांसाठी भरघोस निधी मिळावा, यासाठी आ.डॉ. भोसले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातात्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेत ना. फडणवीस यांनी नाबार्ड व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध विकासकामांसाठी ३३ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर केला आहे. 
यामध्ये कराड दक्षिणमधील रा. म. ४ ते कोयना वसाहत - जखिणवाडी – नांदलापूर -  पाचवड फाटा - मुनावळे - कालेटेक - नारायणवाडी - आटके जाधव मळा - ठोंबरे मळा - रेठरे बु. रस्ता प्रजिमा-८० कि.मी. १६/९०० ते १९/४०० (भाग - जाधव मळा ते रा. मा. १४८) रस्त्याची नवीन रिटेनिंग वॉल बांधण्यासह रस्ता सुधारणा करणे (३ कोटी), रा. म. ४ ते कोयना वसाहत - जखिणवाडी - नांदलापूर - पाचवड फाटा - मुनावळे - कालेटेक - नारायणवाडी - आटके जाधव मळा - ठोंबरे मळा - रेठरे बु. रस्ता प्रजिमा-८० कि.मी. ०/०० ते ४/५०० (भाग कोयना वसाहत ते नांदलापूर)ची सुधारणा करणे (३ कोटी), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पाचवडेश्वर - कोडोली - दुशेरे - शेणोली स्टेशन रस्ता प्रजिमा ६५ किमी ७/०० ते १२/०० ची सुधारणा करणे (१ कोटी), येणके - आणे - कोळे - कोळेवाडी ते पुनर्वसित घारेवाडी प्रजिमा-७६ कि.मी. १०/५०० ते १३/३०० (कोळेवाडी ते बामणवाडी)ची सुधारणा करणे (२ कोटी), आटके टप्पा ते आटके जाधव मळा - रेठरे बु. व्हाया डंगारे वस्ती – पवार मळा - खुबी रस्ता प्रजिमा- ७७ कि.मी. ६/०० ते ८/००० व १८/७०० ते १९/३०० रस्त्याची सुधारणा करणे (१.५० कोटी), कालेटेक - काले - संजयनगर - कालवडे - नांदगाव - साळशिरंबे - पाचुंब्री रस्ता प्रजिमा-७३ कि.मी. ०/०० ते ४/५०० (भाग कालेटेक ते कालवडे) रस्ता सुधारणा करणे (३ कोटी), वाखाण वस्ती कराड - ढेबेवाडी रस्ता प्रजिमा-५५ कि.मी. १४/०० ते १७/०० (भाग - विंग ते घारेवाडी)मध्ये रस्त्याची सुधारणा व दुतर्फा बंदिस्त गटर बांधकाम करणे (१.५० कोटी), वाखाण वस्ती कराड ते ढेबेवाडी रस्ता प्रजिमा-५५ कि.मी. ७/२०० ते ८/०० (भाग बैलबाजार रस्ता (रा. मा. १४४) ते ढेबेवाडी फाटा)मध्ये काँक्रीट रस्त्याचे चौपदरीकरण बांधकाम करणे (१० कोटी), नांदगाव दक्षिण मांड नदीवर कि.मी. १/४०० मध्ये मोठ्या पुलाचे बांधकाम करणे (६.७३ कोटी), कराड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करणे (१.९३ कोटी) अशा एकूण ३३ कोटी ६७ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कराड दक्षिणमधील या महत्वपूर्ण कामांना मंजुरी मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. तसेच याबद्दल मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले व आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह भाजपा-महायुती सरकारचे आभार व्यक्त केले जात आहेत. 


Sunday, March 8, 2026

पुण्यात दुमजली उड्डाणपुलाचे उद्घाटन ; या पुलाला अजितदादांचे नाव देणार ;

वेध माझा ऑनलाइन।
पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान या पुलाला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी पुढे आली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी विद्यापीठ चौकात उभारण्यात आलेला दुमजली उड्डाणपूल हा शहरातील महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प मानला जात आहे. या पुलाचे उद्घाटन करताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष मागणी मांडली. त्यांच्या मते या प्रकल्पाची संकल्पना आणि त्यासाठीचा पाठपुरावा अजित पवार यांनी सातत्याने आणि आक्रमकपणे केला होता. 
मोहोळ यांनी सांगितले की, या पुलाच्या उभारणीमागे अजित पवार यांची दूरदृष्टी मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी इच्छा अनेकांची आहे. त्यांच्या या मागणीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या प्रस्तावाला समर्थन दर्शवले. त्यांनी स्पष्ट केले की, पुलाच्या उभारणीसाठी अजित पवार यांनी मोठा पुढाकार घेतला होता आणि त्यामुळे त्यांचे नाव देण्यास ते सहमत आहेत.


इराण भारताला कोणती मदत करणार ? घेतला मोठा निर्णय; काय आहे बातमी-?

वेध माझा ऑनलाइन।
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता अनेक देशांनी व्यक्त केली होती.

या पार्श्वभूमीवर इराणने काही दिवसांपूर्वी होर्मुज सामुद्रधुनीबाबत कठोर भूमिका घेतली होती. चीन वगळता इतर देशांच्या तेलवाहू जहाजांना या मार्गातून जाण्यास बंदी घालण्याचा इशारा देण्यात आला होता. या घोषणेमुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधन पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली होती.
मात्र आता भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सने आपला निर्णय बदलत होर्मुज सामुद्रधुनीचा वापर काही देशांसाठी खुला ठेवण्याची घोषणा केली आहे. या नव्या निर्णयानुसार अमेरिका, इस्त्रायल, युरोपियन देश आणि त्यांचे सहयोगी राष्ट्र यांच्यासाठीच हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
यामुळे भारतासारख्या देशांना या मार्गाने तेलाची वाहतूक सुरू ठेवण्याची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे भारतातील संभाव्य इंधन टंचाईचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. जागतिक बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भारतासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

१ एप्रिल पासून कोणते नियम होणार लागू? ; अनेक कुटुंबांची नावे रेशन यादीतून वगळली जाण्याची शक्यता ; राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी मोठा बदल लागू होणार ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी मोठा बदल लागू होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने पात्रतेचे निकष कडक करत नवीन नियम जाहीर केले आहेत. १ एप्रिल २०२६ पासून हे नियम लागू होणार असून अपात्र लाभार्थ्यांची छाननी केली जाणार आहे. या प्रक्रियेनंतर अनेक कुटुंबांची नावे रेशन यादीतून वगळली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रेशन कार्ड योजनेचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचावा यासाठी प्रशासनाने पात्रतेचे नियम अधिक कठोर केले आहेत. ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ या संकल्पनेला प्रभावी बनवण्यासाठी ही सुधारणा करण्यात आली आहे. सरकारने उत्पन्न आणि मालमत्तेच्या आधारे लाभार्थ्यांची नव्याने तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या नियमांनुसार शहरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास ते रेशन योजनेसाठी अपात्र ठरतील. ग्रामीण भागात ही मर्यादा दोन लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन जसे की कार किंवा ट्रॅक्टर आहे, अशा कुटुंबांनाही आता स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय १०० चौरस मीटरपेक्षा मोठा प्लॉट, फ्लॅट किंवा पक्के घर असलेल्या कुटुंबांनाही या यादीतून वगळले जाईल.
नवीन नियमांबरोबरच प्रशासकीय प्रक्रियेतही बदल करण्यात आले आहेत. सर्व रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन आधार पडताळणी करून केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित व्यक्तीचे रेशन कार्ड तात्काळ बंद केले जाऊ शकते.
याशिवाय घरात एसी  किंवा जनरेटरसारख्या सुविधा असलेल्या कुटुंबांनाही या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुटुंबातील एखादी व्यक्ती आयकर भरत असल्यास त्या संपूर्ण कुटुंबाला रेशनचा लाभ मिळणार नाही. प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर कोणी आपली खरी आर्थिक स्थिती लपवून लाभ घेत असल्याचे तपासात आढळले, तर त्याचे रेशन कार्ड रद्द करण्यात येईल. तसेच आतापर्यंत घेतलेल्या धान्याची बाजारभावानुसार वसुली केली जाईल आणि आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. 
या नव्या छाननी मोहिमेमुळे देशभरातील सुमारे ७० लाख अपात्र रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्यक्षात गरिबी रेषेखालील आणि गरजू कुटुंबांना धान्याचा पुरवठा अधिक सुरळीत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील कोणता आरोपी आता येणार जेलबाहेर ?

वेध माझा ऑनलाइन
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित आरोपी जयराम चाटे याला न्यायालयाने मर्यादित स्वरूपात दिलासा दिला असून काही तासांसाठी जेलबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

धार्मिक विधीसाठी न्यायालयाची मुभा :
संतोष देशमुख हत्या प्रकरणात जयराम चाटे हा आरोपी म्हणून अटकेत आहे आणि त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर सर्व आरोपींना तुरुंगात ठेवण्यात आले असून त्यापैकी एक आरोपी अजूनही फरार असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून त्याचा शोध अनेक महिन्यांपासून घेतला जात असला तरी अद्याप तो सापडलेला नाही. 
दरम्यान जयराम चाटे याने आपल्या दिवंगत भावाच्या धार्मिक विधीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्याचा भाऊ श्रीराम चाटे यांच्या बाराव्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी गावात उपस्थित राहण्याची परवानगी मागण्यात आली होती. या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर जिल्हा न्यायालयाने त्याला मर्यादित कालावधीसाठी बाहेर जाण्याची परवानगी मंजूर केली. १३ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत तो पोलिस बंदोबस्तात या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार आहे.
या निर्णयाबाबत सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपीला बाहेर सोडल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद केला होता. मात्र आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर सर्व अटींचे पालन करण्याची तयारी दर्शवली. तसेच पोलिस बंदोबस्तासाठी लागणारा खर्चही भरण्याची जबाबदारी स्वीकारली.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून मकोका विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी मानवतावादी दृष्टीकोनातून हा निर्णय दिला. त्यामुळे जवळपास १४ महिन्यांनंतर जयराम चाटे काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येणार आहे. मात्र त्याला पोलिसांच्या कडक बंदोबस्तात गावी नेले जाईल आणि धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात आणण्यात येणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण उघड झाल्यापासून कोणताही आरोपी इतक्या कालावधीनंतर बाहेर आला नव्हता, त्यामुळे ही घटना या प्रकरणातील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले/ सध्या वाढलेले तेलाचे दर लवकरच कमी होतील...

वेध माझा ऑनलाइन।
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जगभरात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र या परिस्थितीतही तेलाच्या दरांबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, सध्या वाढलेले तेलाचे दर लवकरच कमी होतील आणि बाजारात पुन्हा स्थिरता येऊ शकते. 

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. अमेरिकन लष्कराने इराणी नौदलावर लक्ष्य साधत मोठी कारवाई केली असून काही युद्धनौका बुडवल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारवाईला ट्रम्प यांनी केवळ मर्यादित पाऊल असल्याचे सांगितले. त्याच वेळी अमेरिकन सैन्य आणि इस्रायली हवाई दल  तेहरान परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर बॉम्बहल्ले करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दुसरीकडे इराणकडूनही प्रत्युत्तर दिले जात असून अमेरिकेच्या आखाती देशांमधील लष्करी तळांवर हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सौदी अरेबिया येथील तेल रिफायनरीवर झालेल्या हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. या संघर्षात दुबई  विमानतळालाही लक्ष्य करण्यात आले असून इराणकडून तेथेही हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या युद्धाचा प्रभाव संपूर्ण प्रदेशात जाणवत आहे.
या घडामोडींमध्ये ट्रम्प यांनी तेलाच्या किमतींबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की युद्ध सुरू होण्यापूर्वीच तेलाच्या दरांमध्ये वाढ होईल असा अंदाज होता आणि तो खरा ठरला. मात्र ज्या वेगाने दर वाढले आहेत, त्याच वेगाने ते खाली येण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे भविष्यात तेल बाजारात मोठा बदल दिसू शकतो, असे त्यांनी सूचित केले
यावेळी त्यांनी हमास हल्ल्याचाही उल्लेख केला आणि ७ ऑक्टोबर २०२३ ची घटना विसरू नये असे म्हटले. ट्रम्प यांच्या मते इराणी राजवटीविरोधातील कारवाई केवळ अमेरिकेसाठी किंवा इस्रायल साठी नाही, तर संपूर्ण जगाच्या सुरक्षिततेसाठी केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाचे दर प्रचंड वाढले असून त्याचा परिणाम जगभरातील महागाईवर होत आहे. अनेक देशांना इंधन आणि गॅसच्या टंचाईसारख्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचेही स्पष्ट झाले आहे

Friday, February 27, 2026

कराड पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत विरोधी नेते वाटेगावकर व सत्ताधारी यांच्यात खडाजंगी ; नगरसेवक शिकलगार आणि वाटेगावकर एकमेकांना भिडले;

वेध माझा ऑनलाइन।
काल शुक्रवारी कराड पालिकेची अर्थसंकल्पीय सभा कराडच्या प्रीतिसंगम येथे स्व चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी पार पडली यावेळी सत्ताधारी व विरोधक (भाजप)  नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली वाटेगावकर व अल्ताफ शिकलगार यांच्यात यावेळी
जोरदार शाब्दिक चकमक झाली 
दरम्यान 314 कोटींचा हा अर्थसंकल्प यावेळी बहुमताने मंजूर करण्यात आला
दरम्यान या सभेत माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला पण माझा आवाज हे  लोक कधीच दाबू शकणार नाहीत असेही वाटेगावकर या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले

दरम्यान या अर्थसंकल्पाला विरोधीपक्ष नेते विजय वाटेगावकर यांनी भर सभेत "बोगस'  म्हटले याचा धागा पकडत नगरसेवक अल्ताफ शिकलगार आणि वाटेगावकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली
यावेळी शिकलगार मधेच उठून बोलले की
एकीकडे आम्ही सहकार्य करू असे म्हणायचे आणि दुसरीकडे चुका दाखवायच्या आणि अर्थसंकल्प बोगस असल्याचे बोलायचे आम्हाला मूर्ख समजायच चाललंय का?  

यावर उत्तर देताना वाटेगावकर म्हणाले
आम्हाला जनतेने सत्ताधारी लोकांना प्रश्न विचारायलाच पालिकेत निवडून पाठवले आहे आम्ही तुम्हा सत्ताधार्यांना प्रश्न नाही विचारायचा... तर मग कोणाला विचारायचा? असे म्हणत हा अर्थसंकल्प व आकडेवारी बोगस असल्याचा पुनरुच्चार पुन्हा 2 ते 3 वेळ यावेळी केला यावरून सत्ताधारी व वाटेगावकर यांच्यात जोरदार खडाजंगी पहायला मिळाली 

या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी नेते  वाटेगावकर म्हणाले...
हा अर्थसंकल्प व आकडेवारी बोगस वाटते त्यामुळे  आम्ही सुचवलेले बदल त्यात झाले पाहिजेत... तसेच आमच्या पार्टी च्या इतर नगरसेवकांनी सांगितलेल्या सूचनांनुसार त्यामधून बदलदेखील केले गेले पाहिजेत... आणि आम्हाला ते दाखवुनच हे बजेट पुढे पाठवले जावे असे आम्ही सत्ताधार्यांना सांगितले आहे... 
या सभेत माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला पण माझा आवाज हे  लोक कधीच दाबू शकणार नाहीत असेही ते या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले
लोकहितासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेऊ शहरातील लोकांचे नुकसान होऊ देणार नाही
असेही त्यांनी स्पष्ट केले
या सभेबाबत मी वारंवार माहिती मागत होतो पण आम्हाला या सभेबाबत  माहिती दिली नाही तर फक्त सभेपुर्वीची नोटीसच दिली गेली आम्हीदेखील नगरसेवक आहोत त्यामुळे आम्हालाही याबाबत कल्पना देणे, विश्वासात घेणे गरजेचे होते असेही वाटेगावकर यावेळी म्हणाले
दरम्यान भाजपच्या शिवाजी पवार अजय पावसकर व दिग्विजय डूबल या तिघांनी देखील सत्ताधार्यांना प्रश्न विचारले आणि पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी काही सूचना देखील केल्या तसेच शिकलगार आणि वाटेगावकर यांच्यातील झालेल्या बाचाबाचीवेळी  वाटेगावकर यांच्या बाजूने भाजपचे हेच तिघे खंबीरपणे बोलताना दिसले 

तर शिकलगार यांच्या बाजूने सत्ताधारी नगरसेवक उभे राहिलेले दिसले 
दरम्यान शिकलगार आणि वाटेगावकर यांच्यातील झालेल्या या वादावादीची सध्या  जोरदार चर्चा सुरू आहे

Thursday, February 26, 2026

कराड दक्षिणमधील १३५ भजनी मंडळांना ३३.७५ लाखांचे अनुदान मंजूर : आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचे विशेष प्रयत्न;

वेध माझा ऑनलाइन।
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमधील तब्बल १३५ भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ३३ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. राज्याज्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून अनुदानाची रक्कम लवकरच भजनी मंडळांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. 
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना अनुदान दिले जाते. भाजपा-महायुती सरकारने गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून दर्जा देण्यात आला आहे. याअंतर्गत भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली होती. 

त्यानुसार कराड दक्षिणमधील जास्तीत जास्त भजनी मंडळांना या अनुदानाचा लाभ मिळावा, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विशेष मोहिम राबवित भजनी मंडळांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी प्रयत्न केले. या माध्यमातून नोंदविण्यात आलेल्या कराड दक्षिणमधील तब्बल १३५ भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ३३ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. लाभार्थी भजनी मंडळांच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरच जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या अनुदानामुळे भजनी मंडळांना आवश्यक साहित्य खरेदीस मोठी मदत होणार असून, ग्रामीण भागातील सांस्कृतिक परंपरा आणि वारकरी संप्रदायाची परंपरा अधिक बळकट होण्यास हातभार लागणार आहे. या निर्णयाबद्दल कराड दक्षिणमधील सर्व भजनी मंडळांच्यावतीने आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.


Wednesday, February 25, 2026

अपक्ष नगरसेविका तेजश्री पाटसकर यांना कराड पालिकेत स्वतंत्र केबिन ; विकासकामांना गती देण्याचा नगरसेविका सौ पाटसकर यांचा निर्धार :

वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मधून निवडून आलेल्या अपक्ष नगरसेविका सौ. तेजश्री सुदर्शन पाटसकर यांच्या पालिकेतील स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे आणि तत्परतेने सोडविण्याच्या उद्देशाने हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

या कार्यालयाचे उद्घाटन सौ. आशा विष्णू पाटसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक विजयसिंह यादव, नगरसेवक जयंतकाका पाटील, विष्णुकाका पाटसकर, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर तसेच लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीचे सर्व नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास स्थानिक कार्यकर्ते, नागरिक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नगरसेविका तेजश्री पाटसकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रभागातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, प्रकाशयोजना यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी बोलताना नगरसेविका तेजश्री पाटसकर यांनी सांगितले की, “ जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी व विकासकामांना गती देण्यासाठी हे स्वतंत्र कार्यालय महत्त्वपूर्ण ठरेल. नागरिकांनी कोणत्याही समस्येसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.”
नवीन कार्यालयामुळे प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिकांना त्यांच्या प्रश्नांसाठी थेट प्रतिनिधींशी संपर्क साधणे सुलभ होणार असून प्रशासनाशी समन्वय अधिक प्रभावीपणे साधता येणार आहे. त्यामुळे प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.