वेध माझा ऑनलाइन।
आखाती युद्धाचा भारतावर, विशेषतः गॅस टंचाईच्या रूपात, गंभीर परिणाम होत आहे. यामुळे नागरिक आणि हॉटेल व्यवसायिक त्रस्त आहेत, अनेकांना गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या परिस्थितीवरून सरकार आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे, कोविड काळातील परिस्थितीची आठवण करून देत सरकारच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आखाती देशातील युद्धाच संपूर्ण जगावर परिणाम होत असून भारतातही लोकांच्या आयुष्यावर परिणाम होताना दिसत आहे. एकीकडे युद्धामुळे निर्यातीवर परिणाम झाला असून अनेक शतकऱ्यांचा माल देशात अडकून सडत चालला आहे, त्यांचं नुकसान होतंय. तर दुसरीकडे गॅस टंचाई असून लोकांना गॅस सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहवा लागतंय, हॉटेल मालकांना चुलीचा सहारा घ्यावा लगोतय. तर काहींवर हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली आहे. देशात गोंधळाची परिस्थिती असून महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी हे चित्र दिसत आहे. गॅस टंचाईच्या याच मुद्यावरू शिवसेना ठाके गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.
माझ्या घरात ही परिस्थिती आहे, माझ्या पत्नीला दोन दिवसांपासून सिलेंडर मिळत नाहीये सकालपासून मला 60-70 लोकं भेटले, सिलेंडर कुठून मिळवायचा विचारत होते. राजधानी दिल्लीत एका घोषणेने धूम माजवली आहे, ती म्हणजे नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब.. त्याचं उत्तर नरेंद्र मोदीनी दिलं पाहिजे असा टोला राऊतांनी मारला.
देशभरात मोठमोठ्या रांगा लागल्या आहे सिलेंडरसाठी. लखनऊ, मुंबई, कलकत्ता, चेन्नई, दिल्ली ते अगदी जम्मूपर्यंत हीच स्थिती आहे. नोदबंदीनंतर आता लोकं सिलेंडरसाठी लाईनीत उभे आहेत. नोटबंदीच्या वेळेस ज्या रांगा लागल्या, त्या रांगेत लोकं मारली गेली, तेच आता सिलेंडरच्या रांगेत होऊ शकतं अशी भयंकर स्थिती निर्माण झाल्याचं चित्र देशभरात दिसतंय. हे सरकार जनता विरोधी आहे, आंतराराष्ट्रीय राजकारणात सरकार संपूर्ण अपयशी ठरल्यामुळे आपल्या देशावर ही परिस्थिती ओढावली आहे. लोकांना रांगेत उभं करणं आणि मारणं हा भारतीय जनता पार्टीचा छंद आहे, असा घणाघाती हल्लााही राऊतांनी चढवला.
मोदींंवर खोचक शब्दांत टीका
कोविडच्या काळात जसं सांभाळून घेतलं, ही परिस्थिती देखील सांभाळेन, असं म्हणत पंतप्रधानांनी लोकांना न घाबरण्याचं आवाहन केलं. मात्र त्यांच्या या विधानावरूनही राऊतांनी मोदींवर जोरदार टीका केली. हो, हो, कोविडच्या काळात त्यांनीदेश सांभाळला ना. गंगा नदीत लोकांची प्रेतं वहात होती, गुजरातमध्ये चिता जाळण्यासाठी स्मशानभूमीत लोकांना जागा मिळत नव्हती .., असा खोचक टोला हाणत, काय सांभाळलं यांनी असा रोकठोक सवाल राऊत यांनी विचारला.
No comments:
Post a Comment