कराड
येथील पालिका कर्मचाऱ्यांवर तालुक्यातील कोबीड रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्याच्या कामाचा लोड येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मलकापूर प्रशासनाला त्यातील काही अंशी जबाबदारी दिली आहे. मात्र मलकापूर प्रशासनाने ही जबाबदारी अद्याप उचललीच नसल्याचे दिसत असल्याने ही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची सरळ सरळ पायमल्ली आहे.काहीवेळा जागेचे तर काहीवेळा शववाहिकेचे कारण पुढे करून मलकापूर प्रशासन या जबाबदारी पासून लांब पळताना दिसतय, त्यामुळे आता कलेक्टर याबाबत काय कारवाई करणार हेच पहायचे आहे.
मागील काही दिवसांपूर्वी शहरातील व तालुक्यातील कोविड रुग्णांची संख्या फार नव्हती मृत्युदर देखील खूपच कमी होता. त्यावेळी कलेक्टर साहेबांनी एक आदेश जारी केला होता की तालुक्यात कोठेही एखाद्याचा कोविड ने मृत्यु झाला तर त्याच्या अंत्यसंस्काराच्या सम्पूर्ण जबाबदारी ही कराड पालिकेची असेल,त्यानुसार आजअखेर काम सुरू आहे. पण ज्यावेळी हा आदेश काढला त्यावेळचा पेशंट रेशीओ आणि मृत्युदर आणि यामध्ये आताच्या घडीला झालेली त्यातील प्रचंड वाढ यामध्ये खूपच फरक आहे हे लक्षात घेऊन या आदेशामध्ये बदल करण्याबाबत विचार होण्याची गरज निर्माण झाली होती.
येथील पालिका कर्मचारी सध्याच्या घडीला रोज सरासरी 10 मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात.म्हणजे त्या मृतदेहाला त्याच्या ठिकाणी जाऊन त्याचे प्लास्टिक पॅकिंग करून स्मशानभूमीत मृतदेह नेऊन दहन देण्यापर्यंत सर्व सोपस्कार हेच लोक करतात. एक, एक करत रोज एवढ्या बॉडीना दहन देत त्यांचा दिवस आणि रात्र याच कामात जाते. या कामासाठी कर्मचाऱ्यांना पीपीई किट तबबल आठ,आठ तास घालावे लागते.या पीपीई किट मध्ये हवा जात नसल्या कारणाने कामगारांची त्यावेळी अक्षरशः गुदमरून घुसमट होत असते. कर्मचाऱ्यांवर,शारीरिक मानसिक खूपच ताण येतो.रात्री अपरात्री दोन कधी तीन वाजता फोन येतात त्यावेळी त्यांना तातडीने तालुक्याच्या भागात जावे लागते.असे कित्येक महिने रोज चालू आहे, या एकूणच परिस्थितीचा सहानुभूतीने विचार व्हावा... या समस्येवर ठोस उपाय काढावा...अशी मागणी वेध माझा ने आपल्या बातमीतून केली होती. ती प्रचंड व्हायरल झाली.त्याची दखल खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी घेत तातडीने ते येथे आले.येथील कर्मचाऱ्यांना जाऊन ते भेटले. त्यांचे अक्षरशः हात जोडून त्यांनी धन्यवाद मानले. तुम्ही सर्वजण कोविड चे खरे योद्धे आहात असे गौरवोद्गार देखील त्यांनी यावेळी काढले. प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी येथील कर्मचाऱ्यांना दिले.दरम्यान,त्यांनी येथील सर्किट हौस येथे याबाबत मीटिंग घेत नवीन आदेश काढून मलकापूर भागाला इथून पुढची कोविड रुग्णांच्या अंत्यविधी संदर्भातील काहीशी जबाबदारी दिली, त्यामुळे अखेर कराड पालिकेच्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी झाल्याच्या भावना व्यक्त झाल्या. मात्र आजची खरी परिस्थिती अशी आहे की, अद्याप मलकपूरचे याबाबत कसलेही कराड पालिका प्रशासनाला सहकार्य नसल्याचे समोर आले आहे.नुसतीच 2 दिवस,4 दिवस अशी मुदत मागून त्यांच्याकडून नुसतीच चाल ढकल सुरू आहे. जिल्हाधीकारी शेखर सिंग यांनी सांगूनही त्याच्या आदेशाला मलकापूर प्रशासनाकडून हरताळ फासला जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सम्पूर्ण कराड तालुक्याचा अंत्यविधीचा ताण अद्यापही कराड पालीकेवरच आहे हे वास्तव आहे. कराडचे प्रशासन व कर्मचारी माणुसकी या नात्याने तो सहन देखील करत आहेत. मलकापूरच्या मुख्याधिकारी शववाहिका नसल्याचे कारण सांगत आहेत, तर जागेच्या अडचणीचे तुणतुणेही त्या वाजवताना दिसत आहेत. एकूणच निरनिराळी कारणे सांगून मलकापूर प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच धुडकावून लावत असल्याचा प्रतिक्रिया यानिमित्ताने येत असल्याने जिल्हाधिकारी याबाबत आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
No comments:
Post a Comment