अजिंंक्य गोवेकर
कराड
येथील पालिका कर्मचाऱ्यांवर तालुक्यातील कोबीड मृतदेहावर अंत्यविधी करण्याच्या कामाचा लोड येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मलकापूर प्रशासनाला त्यातील काही अंशी जबाबदारी दिली असताना मलकापूर प्रशासनाकडून मात्र याबाबत कोणताही प्रतिसाद कराडला मिळत नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर वेध माझा ने "मलकापूर प्रशासनाचे कराडला अद्याप सहकार्य नाहीच...' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून या प्रश्नाकडे संबंधितांचे लक्ष वेधले.त्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली आणि दखल घेतली गेली. मलकापूर प्रशासनाने कोविड रुग्णाच्या मृतदेहाचा अंत्यविधी करण्यास अखेर कालपासून सुरुवात केली.
मागील काही दिवसांपूर्वी शहरातील व तालुक्यातील कोविड रुग्णांची संख्या फार नव्हती मृत्युदर देखील खूपच कमी होता. त्यावेळी कलेक्टर साहेबांनी एक आदेश जारी केला होता की तालुक्यात कोठेही एखाद्याचा कोविड ने मृत्यु झाला तर त्याच्या अंत्यसंस्काराच्या सम्पूर्ण जबाबदारी ही कराड पालिकेची असेल,पण ज्यावेळी हा आदेश काढला त्यावेळचा पेशंट रेशीओ आणि मृत्युदर, आणि आताच्या घडीला झालेली त्यातील वाढ यामध्ये खूपच फरक आहे हे लक्षात घेऊन या आदेशामध्ये बदल करण्याबाबत विचार होण्याची गरज निर्माण झाली होती.
येथील पालिका कर्मचारी सध्याच्या घडीला रोज सरासरी 10 मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात.म्हणजे त्या मृतदेहाला त्याच्या ठिकाणी जाऊन त्याचे प्लास्टिक पॅकिंग करून स्मशानभूमीत मृतदेह नेऊन दहन देण्यापर्यंत सर्व सोपस्कार हेच लोक करतात. एक, एक करत रोज एवढ्या बॉडीना दहन देत त्यांचा दिवस आणि रात्र याच कामात जाते. या कामासाठी कर्मचाऱ्यांना पीपीई किट तबबल आठ,आठ तास घालावे लागते.या पीपीई किट मध्ये हवा जात नसल्या कारणाने कामगारांची त्यावेळी अक्षरशः गुदमरून घुसमट होत असते. कर्मचाऱ्यांवर,शारीरिक मानसिक खूपच ताण येतो.रात्री अपरात्री दोन कधी तीन वाजता फोन येतात त्यावेळी त्यांना तातडीने तालुक्याच्या भागात जावे लागते.असे कित्येक महिने रोज चालू आहे, या एकूणच परिस्थितीचा सहानुभूतीने विचार व्हावा, या समस्येवर ठोस उपाय काढावा,अशी मागणी वेध माझा ने "कलेक्टर साहेब कराड पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा माणूस म्हणून कधी विचार करणार...?' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून केली होती. ती प्रचंड व्हायरल झाली.त्याची दखल खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी घेत तातडीने ते येथे आले.येथील कर्मचाऱ्यांना जाऊन ते भेटले. त्यांचे त्यांनी धन्यवाद मानले.त्यांनी येथील सर्किट हौस येथे त्यानंतर मीटिंग घेत याबाबतचा नवीन आदेश काढून मलकापूर भागाला इथून पुढची कोविड रुग्णांच्या अंत्यविधी संदर्भातील काहीअंशी जबाबदारी दिली, त्यामुळे कराड पालिकेच्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी झाल्याच्या भावना व्यक्त झाल्या. मात्र त्यानंतर बरेच दिवस झाले तरी मलकापूरकडून कराड प्रशासनास याबाबत कसलेच सहकार्य होत नसल्याची माहिती समोर आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही अशी परिस्थिती असल्याचे लक्षात येताच वेध माझा ने या बाबतीत "मलकापूर प्रशासनाचे कराडला अद्यापही सहकार्य नाहीच' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून प्रशासन खडबडवले.हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले.राज्यभर व्हायरल झाले.त्याची ताबडतोब दखल घेत त्वरित हालचालीही झाल्या आणि कोविड मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास मलकापुर प्रशासनाकडून प्रारंभही झाला.बातमी व्हायरल झाल्यापासून काही तासातच याविषयी ठोस पाऊले उचलण्यात आली. मलकापूर प्रशासनाचे त्याबद्दल धन्यवाद मानले जात असतानाच वेध माझाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळे चर्चेत असलेल्या या प्रश्नावर पडदा पडला. वेध माझाचे येथील प्रशासनासह कर्मचारी वर्गाकडून तसेच सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment