वेध माझा ऑनलाइन - शहराची वॉर्ड रचना व आरक्षण प्रक्रिया पूर्ण होऊन आता तोंडावर येऊन ठेपलेली येथील पालिकेची निवडणूक पक्षीय विचारधारेशी बांधील असणे येथील जनतेला अपेक्षित आहे म्हणूनच ही निवडणुक पक्षचिन्हावर होण्याबाबत मागणी होत आहे. या निवडणुकीतून भाजपाने पक्षचिन्ह घेऊन लढणार असे जाहीर केले आहे तर काँग्रेस देखील पक्षचिन्ह घेऊन लढेल अशी चर्चा आहे शहरातील राष्ट्रवादी पार्टी म्हणून ओळख असणाऱ्या लोकशाही आघाडीने आपण आघाडी म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते शशिकांत शिंदे यांनी आम्ही महाआघाडी म्हणून एकत्र येऊन ही निवडणूक लढू असे काही दिवसांपूर्वी कराड येथे आले असता सांगून टाकले आहे
एकूणच शहरातील राजकारणाचा "ट्रेंड' बदलेल अशी ही निवडणूक यावेळी होईल अशी अशा आहे... संधीसाधू राजकारण त्यामुळे थांबेल आणि ते थांबवण्यासाठी आवश्यक घडामोडी पडद्यामागे सुरू झाल्याचे समजते म्हणूनच...इथले आमदार खासदार मंत्री अजूनही गप्प आहेत ? अशीही चर्चा आहे...
येथील पालिका निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे.राज्याच्या राजकारणाचा परिणाम नेहमीच स्थानीक राजकारणावर दिसून येतो. त्यानुसार त्या त्या ठिकाणी घडामोडी घडत असतात..त्याचेच प्रत्यंतर झालेल्या पदवीधर निवडणूकित दिसून आले. अपवाद वगळता झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकाही याच धर्तीवर पार पडल्या व निकालदेखील त्याच प्रमाणात दिसून आले. येथील नगरपरिषदेची सद्य परिस्थीती पहिली तर, स्वच्छ सर्वेक्षणच्या नावाखाली इतर कामाना तितकेसे महत्व शहरात दिले गेले नाही असे गेल्या पंचवार्षिक मध्ये दिसून आले आहे. त्यामुळे अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबीतच आहेत. येथील काही लोकप्रतिनिधींनी आपल्या वॉर्डामधील कामे होण्यासाठीचे प्रयत्न डोळ्यासमोर निवडणूक ठेवून सुरू ठेवले आहेत. त्यापैकी काहींच्या बाबतीत "वेळ निघून गेल्याचे" प्रत्यंतर येण्याची शक्यता आहे, तर काहीजण सातत्याने लोकांची कामे करत जनतेच्या मनातील आपली जागा "अभाधित" ठेवण्यात यशस्वी होतील अशीही शक्यता आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे.भाजपाचे संख्याबळ अधिक असूनदेखील ते विरोधात आहेत. असे असताना महाविकास आघाडीची संकल्पना पदवीधर व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत लोकांना फारशी रुचनार नाही अशी अनेकांची धारणा होती मात्र ती सपशेल फोल ठरली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पदवीधर निवडणुकीत याच महाविकास आघाडीला सुशिक्षित मततदारांनी अक्षरशः डोक्यावर घेत भाजपला बाजूला केले व आपला कौल दिला. ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र भावकीचे गणित दिसून आले, तेथील राजकारणात पारंपरिक विरोध व जुळवाजुळवीचे राजकारण असे स्वरूप पहायला मिळाले मात्र शहरातून महाविकास आघाडी पसंतीस उतरल्याने दिसले, म्हणजेच ग्रामीण व शहरी भागात राजकारणाचे गणित वेगवेगळे घडत असल्याचे जाणवले.त्यामुळे शहरी राजकारणात पक्षीय राजकारणाचा फॉर्म्युला महाविकास आघाडी म्हणून यशस्वी झाला हे सिद्ध झाले.
कराड शहरातील लोकांनादेखील यावेळची पालिका निवडणूक वेगळ्या धाटणीची हवी आहे.दरम्यान यापूर्वीच्या झालेल्या येथील काही निवडणुकीच्या माध्यमातून आपला केवळ वापरच झाला... अशी इथल्या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची भावना झाल्याचे समजते,... म्हणूनच एकमेकांच्या विरोधात उभे राहून दोघांचेही नुकसान करून घेण्याच्या मानसिकतेत काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आता दिसत नाहीत, त्यामुळे कदाचित दोन्ही काँग्रेस महाविकास आघाडीचा फॉर्म्युला घेऊन निवडणुकीत उतरतील असा अंदाज आहे... आता ताकही फुंकून पीत कराड पालिका निवडणुकीसाठी पुढची वाटचाल करताना दोन्ही काँग्रेसची भूमिका दिसेल हेही तितकेच खरे आहे... तर दुसरीकडे आमचाही शहराच्या राजकारणात सोयीपुरता वापर झाला अशी चर्चा भाजपाचे नेतेही शहरात करताना दिसत आहेत.
गेल्या पंचवार्षिक कालावधीत शहराच्या राजकारणात लोकशाही आघाडी,जनशक्ती आघाडी,आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणारे नगरसेवक, व भाजपाचे नगरसेवक असे चार गट कार्यरत राहिले. मात्र होणाऱ्या यावर्षीच्या निवडणुकीत नव्याने काही पक्ष पार्ट्या किंवा युत्या पुढें येतात का?हे पाहणे महत्वाचे आहे, दरम्यान गेल्या पंचवार्षिक मध्ये जनशक्ती आघाडीमध्ये उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांना मानणारे नगरसेवक,जाधव समर्थक नगरसेवक, आणि यादव समर्थक नगरसेवक असे मिळून सत्तारूढ म्हणून दिसले, तर नगराध्यक्षपद भाजपकडे होते. भाजपाने मागील निवडणूक पक्षचिन्हावरच लढली होती त्यावेळी नगराध्यक्षपदासाठी त्यांना पक्षचिन्हाचा फायदाच झाला.याहीवेळी पुन्हा भाजपा पक्षचिन्हावरच लढणार आहे.काँग्रेसची देखील पक्ष चिन्हावरच लढण्याची मानसिकता दिसत आहे तर, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आम्ही महाआघाडी म्हणून लढू असे जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी कराडात येऊन स्पष्ट केले आहे मात्र येथील राष्ट्रवादीचा मानला जाणारा पालिकेतील गट लोकशाही आघाडी म्हणून लढेल असे आघाडीच्या नेत्यांकडून काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते... पण प्रत्यक्ष लढण्याची वेळ आल्यास त्यांची भूमिका काय असणार हेही पहावे लागणार आहे...ऐनवेळी दोन्ही काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून एकत्र येवून लढतील असा कयास आहे...शहरातील संधीसाधू राजकारणाला दूर ठेवण्यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र येणार असल्याचे समजते... त्याकरिता शिवसेनेला बरोबर घेत या निवडणुकीत 15 -15 - 1 किंवा 14 - 14 - 3 असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे...हे घडवून आणण्यासाठी पडद्यामागच्या हालचाली सुरूही झाल्या आहेत ? म्हणूनच इथले आमदार, खासदार, मंत्री अजूनही गप्प आहेत ? अशीही चर्चा आहे...
No comments:
Post a Comment