Sunday, October 1, 2023

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विनायक भोसले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा ;

वेध माझा ऑनलाइन।  येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्री. विनायक भोसले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त कोळे येथील जिजाऊ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

घारेवाडी येथील अमित माने मित्र परिवार आणि विंग येथील संजय खबाले मित्र परिवाराच्यावतीने कोळे येथे श्री. भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिजाऊ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना कपडे व अन्य जीवनावश्यक साहित्य प्रदान करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर देण्यात आला.

याप्रसंगी अमित माने, संजय खबाले, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सयाजी यादव, कृष्णा सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य हेमंत पाटील, आणेचे सरपंच किसन देसाई, उमेश घारे, सुरेश घारे, पांडुरंग सावंत, राहुल चव्हाण, सदाशिव चव्हाण, साहेबराव देसाई, अमृत नेमाणे, विकास कदम, युवराज शिंदे, अधिक देसाई, धनाजी कणसे, प्रतापसिंह पवार, संजय तोडकर, सचिन देसाई, सुनील थोरात, राजाभाऊ खबाले, राहुल यादव, धनाजी पाटील, दादासो गरुड, अस्लम देसाई, श्रीरंग पाटील, अविनाश पाटील यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


गोरगरीब जनतेचा लुटलेला पैसा पचवीण्याचे काम भाजपात गेल्यावर होत आहे ; आ पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप ;

वेध माझा ऑनलाइन।  जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे समाज माध्यमावर एक पत्र फिरत आहे की, कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नेमणे आहेत. ही जर बातमी खरी असेल तर कशा पद्धतीने सरकार चालत आहे? हा अत्यंत दुर्भाग्यपूर्ण निर्णय असू शकेल खाजगी 10 कंपन्यांच्या मार्फत 70 हजार नोकर भरती करण्याचे सरकारने जीआर काढलेला आहे, हा जीआर सर्वत्र उपलब्ध आहे. सरकारचा हा जो कारभार चालू आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू आहे या विरोधात सर्वांनी एकत्र उठाव करणे गरजेचे आहे जे लोक भाजपात गेले ते त्यांचा भ्रष्टाचार धुतला जावा यासाठी गेले. म्हणजे लुटलेला गोरगरीब जनतेचा पैसा सरळ सरळ पचवीण्याचे काम भाजपात गेल्यावर होत आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सवादे येथील कार्यक्रमात केला. 

सवादे येथे आ. चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 3 कोटी 36 लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उदघाट्न प्रसंगी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, अजितराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, माजी जि प सदस्य शंकरराव खबाले, नरेंद्र पाटील, नानासाहेब पाटील, बंडानाना जगताप, इंद्रजित चव्हाण, धनाजी थोरात, मुंबई प्रदेश काँग्रेसचे सचिव बाळासाहेब थोरात, उद्योजक वसंतराव चव्हाण, सोसायटी चेअरमन बाजीराव थोरात, कराड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन थोरात, दिपक पाटील, सुरेश साठे, सचिन थोरात, संजय येडेकर, निवास थोरात (भाऊ), सवादेच्या सरपंच जयश्री कदम, माजी सरपंच लक्ष्मी सुतार, माजी उपसरपंच पुजाराणी थोरात आदिसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

यापुढे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, नेहरूनी-इंदिरा गांधींनी लोकशाहीचा पाया भक्कम केला होता. सरकारी संस्था उभ्या करून देश सक्षम केला. इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले पण तोच आपला देश आज धार्मिक ध्रुवीकरणात अडकला आहे. जे लोक भाजपात गेले ते त्यांचा भ्रष्टाचार धुतला जावा यासाठी गेले. म्हणजे लुटलेला गोरगरीब जनतेचा पैसा सरळ सरळ पचवीण्याचे काम भाजपात गेल्यावर होत आहे. साम दाम दंड भेद चा वापर करून भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन त्यांच्यावरील आरोप धुवून टाकण्याचे राजकारण कुणालाही अपेक्षित नव्हते, इतका कधीही सत्तेचा गैरवापर झाला नाही तो आता केला जात आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील म्हणाले की, काकांनी मतदारसंघातील प्रत्येक घटकाचा विचार करीत त्यांना संरक्षण देऊन मतदारसंघ आबाधित ठेवला. या मतदारसंघाने जो विचार जपला तो विचार जपण्याचा प्रयत्न बाबा कसोशीने करत आहेत त्यांना आपण साथ देण्याची गरज आहे. यावेळी सचिन थोरात यांनी प्रास्ताविक केले तर सुरेश साठे यांनी आभार मानले.

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस पदी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते रामकृष्ण वेताळ यांची निवड ;

वेध माझा ऑनलाइन। भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस पदी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते रामकृष्ण वेताळ यांची निवड झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा  प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात,विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांनी किसान मोर्चा ची राज्य कार्यकारिणी मुंबई  येथे भाजपा प्रदेश कार्यालयात जाहीर केली आहे.

भारतीय जनता पार्टी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये रामकृष्ण वेताळ यांनी गेली २० वर्षे अत्यंत निष्ठेने व मोठ्या जोमाने काम सुरू ठेवले आहे. भाजपा किसान मोर्चाचे ते प्रदेश सचिव म्हणून याचबरोबर सध्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ प्रचार प्रमुख म्हणून देखील ते काम करीत आहेत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार व पक्षाने केलेले काम अत्यंत निष्ठेने ते लोकांच्या पर्यंत पोहोचवत आहेत 

रामकृष्ण वेताळ यांची किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अतुल  भोसले,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य भरत नाना पाटील,भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम,कराड उत्तर चे युवा नेते मनोज दादा घोरपडे, माजी आमदार मदन भोसले, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तात्या पाटील, भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद आप्पा गायकवाड, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, कराड तालुका अध्यक्ष महेश कुमार जाधव, पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार,ओबीसी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे बापू, सरचिटणीस शंकरराव शेजवळ,सूर्यकांत पडवळ,  सरचिटणीस शहाजी मोहिते, सौ.दिपाली ताई खोत यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक कोण आहे हे सर्वांना ठाऊक आहे.; शरद पवारांचा अजित पवारांना टोला ;

वेध माझा ऑनलाइन। महाराष्ट्रात आणि बाहेर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक कोण आहे ते सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे लोकांची भावना ही अनुकूल आहे, असे आमचे लोक सांगतात त्यामध्ये तथ्य आहे, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते रविवारी जुन्नर येथे बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला. ते म्हणाले, कोणी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा लोकशाहीमधील अधिकार आहे. त्यावर मी भाष्य करु इच्छित नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार की अजित पवार यावरुन पक्षातील दोन गटात वाद सुरु आहे. अजित पवार गटाने अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. यादरम्यान शरद पवार यांनी जुन्नर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत यावर सूचक भाष्य केले आहे.

जुन्नरमध्ये राष्ट्रावादी कोणाची यावर बोलताना शरद पवार म्हणाले, मी महाराष्ट्रात फिरत आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये स्वच्छ कल्पना आहे. सामान्य लोक काय विचार करतो हे महत्त्वाचे आहे. शनिवारी किल्लारीला गेलो होतो. त्याठिकाणी वीस हजार लोकं होती. राज्यात सगळीकडे हेच चित्र बघायला मिळत आहे.
वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा लोकशाहीमधील अधिकार आहे त्यावर मी भाष्य करणार नाही.मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक कोण आहे ते सर्वांना ठाऊक आहे असेही ते म्हणाले

आगामी निवडणुकीत जुन्नरचा राष्ट्रवादीचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला.यावर उत्तर देताना ते म्हणाले, निवडणूकांना अजून वेळ आहे.जुन्नर तालुक्यातील लोकांसर्भात माझा अनेक वर्षांतील अनुभव आहे.ते सहसा माझ्या शब्दाला कधी नकार देत नाहीत, असेही शरद पवार यांनी सांगितले

भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी एकनाथ बागडी यांची निवड ; राज्य कार्यकारिणी मुंबई येथे जाहीर ; एकनाथ बागडींचे सर्व स्तरातून होतय अभिनंदन ;

वेध माझा ऑनलाइन।  भारतीय जनता पार्टी  कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी कराड भाजपा शहराध्यक्ष श्री एकनाथ बागडी  यांची निवड झाली असून. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा  प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात,मा.विक्रांतजी पाटील मा.मुरलीअण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनात भाजपा कामगार   मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष यांनी श्री विजयजी हरगुडे कामगार मोर्चा ची राज्य कार्यकारिणी मुंबई  येथे भाजपा प्रदेश कार्यालयात जाहीर केली आहे.

एकनाथ बागडी यांनी भारतीय जनता पार्टी कराड शहरामध्ये 15 वर्षे अत्यंत निष्ठेने व मोठ्या जोमाने काम सुरू ठेवले आहे. भारतीय जनता पार्टीचे विचार व पक्षाने केलेले काम अत्यंत निष्ठेने ते लोकांच्या पर्यंत पोहोचवत आहेत 

एकनाथ बागडी यांची कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे, आमदार जयकुमार गोरे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अतुल  भोसले,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य भरत नाना पाटील,भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, तसेच शहर पदाधिकारी,बूथ अध्यक्ष,केंद्र प्रमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत

उदयनराजेंनी लावला थेट देवेंद्र फडणवीसांना फोन ...काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाईन। 
लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजना वेटणे-रणसिंगवाडी येथील शेतीला पाणी मिळण्याची कार्यवाही होणेबाबत गेली 7 दिवसांपासून येथील ग्रामस्थांकडून उपोषण केले जात आहे. 
दरम्यान, चालू असलेल्या आमरण उपोषणाला खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच भेट दिली व आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी उपोषणस्थळावरून थेट उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला.

तसेच यांच्याशी फोनवर संपर्क करून या गावातीळ ग्रामस्थांच्या व्यथा सांगितल्या. फोनवरून झालेल्या चर्चेनंतर हा पाणीप्रश्न 2 ते 3 दिवसात मार्गी लावण्याच्या बाबतीत उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

खासदार उदयनराजे भोसले यांनी उपोषणस्थळी भेट देत ग्रामस्थांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा वेटणे व रणसिंगवाडी या दोन्ही गावासाठी ०.१३ टीएमसी. पाणी उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले की, या पाण्याचा उपसा करुन दोन्ही गावातील ग्रामतळी, पाझर तलाव, बंधारे कायमस्वरूपी पुर्ण क्षमतेने भरुन मिळतील. याकामी बोगद्यावरच असलेली वेटणे येथील खड़खीरा (नलवडेवस्ती) या हद्दीतील ६ एकर शासकीय जमीन (गायरान) सोलर पॅनलसाठी उपलब्ध करुन देऊ असा ठराव दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी केला असल्याची माहिती ग्रामस्थांनी उदयनराजेंना दिली.त्यामुळे सोलर पॅनेलवर छोटी उपसा सिंचन योजना कार्यान्वीत करुन जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेतून विनामोबदला दोन्ही गावातील बेलमाळ तलाव, धबधबी तलाव, रणसिंगवाडी तलाव क्रमांक १ व रणसिंगवाडी तलाव क्रमांक २, खडखीरा (नलवडेवस्ती) ग्रामतळे, इनाम तलाव वेटणे, वेटणे ग्राम तलाव व दोन्ही गावातील बंधारे गरजेनुसार कायमस्वरुपी पुर्ण क्षमतेने भरून मिळावेत अशी आमची आग्रही मागणी आहे असेही यावेळी ते म्हणाले

पावसाने झोडपले ; कराड शहराच्या जवळील मार्गावर झाले गुडघाभर पाणी ; वाहतुकीची पहायला मिळाली कसरत ;

वेध माझा ऑनलाइन। संपूर्ण सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात देखील मुसळधार सुरू आहे. या पावसामुळे कराड शहर जवळचा मार्ग जलमय झाल्याने तिथली वाहतूक मंदावल्याचे चित्र निर्माण झाले होते 

आज दुपारी सुमारे तीन ते चार तास मुसळधार पावसाने शहर व परिसराला चागलेच झोडपले त्यामूळे शहराला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवर पाणीच पाणी साचले होते तसेच पुलाच्या सहापदरीकरण 
कामामुळेही ठिकठिकाणी पाणी साठल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे  वाहतूक मंदावली गेली व त्याठिकाणी एकूणच वाहतूकीची झालेली कसरत त्याठिकाणी पहायला मिळाली

शहरातील नागरी वस्तीत बहुतांशी ठिकाणी  पाणीच पाणी झालेले पहायला मिळाले अनेक ठिकाणी रस्त्यातील खड्डे पाण्यानी गच्च भरलेले आढळले त्यातून गाड्या जाताना अनेक ठिकाणी इतरांच्या अंगावर पाणी उडल्याने किरकोळ वाद होण्याचे प्रकार पहायला मिळाले पाऊस सुरू झाल्यापासून व्यापार पेठेत ग्राहकांची वर्दळ खूपच कमी  जाणवली लोक पावसात बाहेर पडलेच नाहीत त्यामूळे व्यापार पेठेतील उद्योग धंद्यावर या परिस्थितीमुळे आज परिणाम झाल्याच्या प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी दिल्या सायंकाळी देखील पावसाची रिपरिप चालूच होती अनेकठिकानी पावसामुळे काहीकाळ लाईटही गेली होती