Monday, December 20, 2021

...अन्यथा, शेतकरी ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथील समुद्रात जलसमाधी घेतील ; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा...

वेध माझा ऑनलाईन
कराड
सरकारने शेती पंपाला दिवसा आठ तास मोफत वीजपुरवठा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान, संपूर्ण कर्जमाफी, दुधाची खरेदी किलोमध्ये व लिटरमध्ये केल्यास त्याप्रमाणे पावती व बिल द्यावे आणि राज्यात गुंठेवारी खरेदी-विक्रीला परवानगी या गोष्टींवर सरकारने 23 डिसेंबर पर्यंत निर्णय जाहीर करावा. अन्यथा, शेतकरी ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात जलसमाधी घेतील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.

      बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. यासंदर्भात येथील शासकीय विश्रामगृहात आज सोमवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

No comments:

Post a Comment