वेध माझा ऑनलाइन ।
विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र, त्या यशानंतर आता मुख्यमंत्री पदाचा आणि नाराजीनाट्याचा सुर राज्यभरात दिसून येत आहे. अशातच महायुतीच्या यशानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, अशातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात असतानाच एकनाथ शिंदे नाराज झाल्याच्या चर्चा सुरू आहेत.
यादरम्यान त्यांनी बोलणं आणि भेटणं देखील टाळलं आहे. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या आमदार, खासदार यांच्या भेटी देखील त्यांनी टाळल्या आहेत, त्यांनी भेटी का टाळल्या त्याचबरोबर त्यांनी मौन का बाळगलं आहे, याचं नेमके कारण समजू शकलं नसलं तरीदेखील एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.
No comments:
Post a Comment