आज विंग येथे केंद्रीय मंत्री अमित शाह यांची अतुलबाबांच्या प्रचारार्थ सभा पार पडली यावेळी डॉ अतुल भोसलेंनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याजवळ काही महत्वाच्या मागण्या केल्या त्यामध्ये ऊस शेती संबंधी अमित शाह यांनी रद्द केलेल्या एफ आर पी वरील इन्कम टॅक्स चा उल्लेख करत अतुलबाबांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच सिंचनाच्या प्रश्नावर देखील त्यांनी शाह यांचे लक्ष वेधले त्याच बरोबर कराडातील आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या बंगल्याला लागून असणाऱ्या पाटण कॉलनीतील झोपडपट्टीसह मलकापूर व स्टेडियम जवळ असणाऱ्या झोपडपट्टीचे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पुनर्वसन करण्यासाठी आग्रह धरला
यावेळी अमित शाह यांनी येत्या वर्षात या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पक्की घरे आपण या लोकांना उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले
दरम्यान पृथ्वीराज चव्हाण हे केंद्र सरकारने केलेला उड्डाणपूल मी केला म्हणून सांगतात... अहो केंद्रात भाजप ची सत्ता आहे...या सगळ्या गोष्टींशी तुमचा काय संबंध ? नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हे पूल होत आहेत... आणि तुम्ही पूल केला म्हणून काय सांगता...? तुम्हाला पाटण कॉलनी मधील तुमच्या घराला लागून असणाऱ्या झोपडपट्टी चे घरकुल करता आले नाही...तुम्ही मुख्यमंत्री होता...त्यापूर्वी केंद्रात होता... तुमच्या 3 पिढ्या 50 वर्षे सत्तेत होत्या...तरी तुम्हाला साधे घरकुल करता आले नाही...अनेकवर्षं ती झोपडपट्टी तशीच तिथे आहे...मात्र, तुमच्या घराच्या भिंतीला लागुन ती झोपडपट्टी आहे म्हणून तुम्ही स्वतःच्या घराची उंची वाढवून घेतलीत...आणि...उड्डाणपूल केला म्हणून सांगता...? असा घणाघात डॉ अतुल भोसले यांनी आ पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केला होता ...
राज्यात सत्तेत संधी मिळाल्यास त्याठिकाणचे पुनर्वसन करून तिथे घरकुल उभे करण्याचे काम आपण करणार प्राधान्याने करणार असल्याचा शब्दही त्यांनी त्यावेळी दिला होता त्याचाच धागा पकडून आज आपल्या भाषणात अतुल भोसलेंनी हा विषय पुन्हा मंत्री अमित शाह यांच्या कानावर घालून तेथे झोपडपट्टीचे पुनर्वसन होऊन तेथील लोकांना पक्की घरे मिळतील असे मंत्री अमित शाह यांच्याकडून शब्द घेतला
मलकापूर तसेच कराडच्या स्टेडियम च्या मागील राहणाऱ्या लोकांना देखील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत त्याठिकाणी पक्की घरे मिळणार आहेत असे आश्वासन देखील अतुल भोसले यांनी अमित शाह यांच्याकडून आज घेतले
No comments:
Post a Comment