वेध माझा ऑनलाइन।
कराड-उत्तरचे भाजप उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ कराड तालुक्यातील पाल येथे आज जाहीर सभा पडली. यावेळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत महत्वाचे विधान केले. “देवेंद्रजी एवढं काम करत असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात. आपण त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. आपण त्यांच्या पाठिशी उभं नाही, राहायचं तर कोणाच्या पाठिशी उभं राहायचं?” असे उदयनराजे भोसले यांनी म्हटल
कराड तालुक्यातील पाल येथे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम उपस्थित होते. यावेळी खा. उदयराजे भोसले म्हणाले, महायुतीची प्रगती सुरु आहे. चांगल्या योजना राबवल्या आहेत. जो काम करतो त्याला ठेस लागते. हे लोक फक्त नाकार्तेपणा लपवण्यासाठी चिखल फेक करतात, व्यक्ती दोषावर बोलतात. देवेंद्र फडणवीस एवढं काम करत असताना त्यांना धमक्या मिळतात. जीवे मारण्याच्या धमक्या येतात. आपण यांच्या पाठीशी उभे रहायचे नाही तर कोणाच्या समोर उभे रहायचे?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण नुसतं विकास करुन थांबलो नाही, तर शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. आता सरकारने शेतकऱ्यांचे बिल भरणयाचा निर्णय घेतला. आता शून्य बिल येते. सौर उर्जाही सुरु केली आहे. चोविस तास वीज देणार आहोत. रात्री शेतकऱ्यांना जायची गरज लागणार नाही. शेतकऱ्यांचा टॅक्स माफ केला. अमित शाह यांनी 10 हजार कोटी रुपयांचा इनकमटॅक्स रद्द केला. सरकार आले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.
No comments:
Post a Comment