वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील हे त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे प्रचलित आहेत. त्यांनी आपल्या विरोधकांवरदेखील फार टोकाची टीका केली असेल असं क्वचितच घडलं असेल. पण शांत आणि संयमी जंयत पाटील यांना आज अखेर कोर्टाची पायरी चढावी लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामागे कारणही अगदी तसंच आहे. जयंत पाटील यांच्याविरोधात एका प्रकरणी इस्लामपूर न्यायालयाने वॉरंट काढलं होतं. त्यामुळे पाटील यांना आज कोर्टात हजर राहावं लागलं.
नेमकं प्रकरण काय ?
जयंत पाटील यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाच वर्षांपुर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देवूनही ते न्यायालयात हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधात वॉरंट काढण्यात आले होते. आमदार जयंत पाटील यांनी न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीनाची पुर्तता केली आहे. जयंत पाटील यांच्या राजकीय जीवनात प्रथमच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्यांना जामीनासाठी स्वतः न्यायालयात हजर राहण्याची वेळ आली आहे.
No comments:
Post a Comment